शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
5
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
6
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
7
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
8
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
9
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
10
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
11
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
12
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
13
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
14
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
15
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
16
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
17
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
18
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
19
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
20
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध

पर्यटकांनी घेतला कोरोनाचा धसका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 01:21 IST

दोन आठवड्यांत ६५ टक्के पर्यटक घटले; हॉटेल व लॉजिंग व्यावसायिक चिंतेत

संजय करडे

मुरुड : रायगड जिल्ह्याला ३२० किलोमीटरचा सागरी किनारा लाभला आहे. उंच नारळ सुपारीच्या बागा या पर्यटकांना नेहमीच भुरळ घालत असतात. मुंबईपासून अवघ्या १६० किलोमीटर अंतरावर तर सागरी प्रवासाने जवळ असे अंतर झाल्याने येथे दर शनिवार-रविवारी पर्यटकांची मोठी रेलचेल असते.रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील दिवेगार, हरिहरेश्वर, बागमांडला, मुरुड येथील जंजिरा किल्ला, काशीद समुद्र किनारा, अलिबाग येथील कुलाबा किल्ला, किहीम बीच, ऐतिहासिक स्थळे अशी अनेक ठिकाणे पर्यटकांना नेहमीच लुभावत असतात. त्यामुळे संपूर्ण रायगड जिल्ह्यात फक्त शनिवार व रविवार या दोन दिवसात एक लाखापेक्षा जास्त लोक येऊन जात असतात. दोन दिवसात पर्यटक स्थानिकांना मोठा रोजगार उपलब्ध करून देतात. हजारो हॉटेल व्यावसायिक व लॉजिंग सर्वत्र हाऊसफुल्ल असतात; परंतु मागील दोन आठवड्यांपासून पर्यटकांची संख्या कमालीची रोडवल्याने हॉटेल व लॉजिंग व्यवसायाची चिंता वाढली आहे. सर्व लॉजच्या रूम फुल्ल असावयाच्या; परंतु आता फक्त किमान दोन रूमच जात आहेत. तेच चित्र हॉटेलवाल्यांचेसुद्धा दिसून येत आहे. भोजनाचे सर्व बेंच फुल असायचे. असंख्य पर्यटक वेटिंगवर असावयाचे; परंतु आता येथेसुद्धा खूप कमी पर्यटक येत असून, बेंच उपलब्ध आहेत; परंतु पर्यटक नाहीत.

कंटाळलेले हौशी पर्यटक कामात बदल म्हणजे विश्रांती, या सूत्रानुसार चार दिवस आरामात निसर्गाच्या सान्निध्यात व्यतीत करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील अलिबाग, किहीम, काशिद बीच, मुरुड जंजिरा, दिवेआगर, हरि हरेश्वर या ठिकाणी  पर्यटक गर्दी करीत असत. मागील दोन आठवड्यांपासून पर्यटकांचा ओघ कमी झाल्यामुळे सर्वच व्यावसायिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. १ मार्च पूर्वीच कोरोना वाढण्याच्या पार्श्वभूमीवर पुणे, मुंबई येथे रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आल्याने शासनाने पुन्हा लॉकडाऊन आणला तर विनाकारण अडकून पडू, या अनामिक भीतीमुळे लोकांनी घराबाहेर न पडण्याची भूमिका घेतल्याचे चित्र आहे.

मागील दोन आठवड्यात पर्यटकांची संख्या कमालीची रोडावली आहे. त्यामुळे व्यवसायात मोठी घट आली आहे. वास्तविक पहाता मुरुड तालुका हा कोरोनामुक्त आहे. येथे कोणतेही रुग्ण नाहीत. त्यामुळे पर्यटकांनी मुरुडला कोणतीही भीती न बाळगता आले पाहिजे.- विनायक धुमाळ, हॉटेल-लॉजिंगचे मालक

टीव्हीवर कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहून पर्यटक बाहेर पडणे टाळत आहेत. आमच्याकडे आगाऊ बुकिंग होती; परंतु त्या अचानक रद्द करण्यात आलेल्या आहेत. मागील दोन आठवड्यात २५ टक्केसुद्धा व्यवसाय झालेला नाही.-मनोहर बैले, लॉज मालक

मुरुड शहरात पर्यटकांची गर्दी फेब्रुवारी अखेर मोठ्या संख्येने होती. स्वाभाविक स्थानिक व्यावसायिकांची कमाई चांगली होती. समुद्र किनाऱ्यावरील पाव-वडा सेंटर, शहाळे पाणी, स्नॅक्स, पाणीपुरी, भेलपुरी, उपहारगृहे विशेषतः शुक्रवार, शनिवार आणि रविवार फुलून गेल्याने पर्यटन व्यवसाय तेजीत होता.

पर्यटकांनी पर्यटनस्थळाला भेट न दिल्याने पर्यटन व्यवसायाला अचानक ब्रेक लागल्याची स्थिती पहावयास मिळते आहे. समुद्र किनारी असणारे वॉटर स्पोर्ट, घोडागाडी, उंट सफर, बोटींग व्यवसाय थंड पडले आहेत. त्यातूनच दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आल्याने लॉकडाऊनच्या अनिश्चिततेमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यास बुडाल्याने पालक घरात राहून मुलांचा अभ्यास घेत आहेत.

जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांची संख्या ७० टक्के घटलीnऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर गेल्या आठवड्यापासून पर्यटकांची संख्या ७० टक्के घटली असून, राजपुरी बंदरातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या शिडाच्या होड्यांना पर्यटकांची प्रतीक्षा करावी लागत आहे. nप्रवासी बोटचालक संघटनेचे पदाधिकारी जावेद कारबारी यांना विचारले असता, ते म्हणाले की, प्रत्येक शुक्रवारी पर्यटकांच्या बोटीतून जाण्यासाठी उड्या पडतात; मात्र या शुक्रवार, शनिवार व रविवारी १४ शिडाच्या होडीला पर्यटकांअभावी रिकामे परतावे लागले. इतकी पर्यटकांची संख्या रोडावल्याचे त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Raigadरायगड