शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षांच्या हंगामामुळे पर्यटक रोडावले

By admin | Updated: March 11, 2017 02:17 IST

दहावी, बारावी, तसेच शालेय परीक्षांचा हंगाम सुरू झाल्याने जिल्ह्यातील पर्यटनस्थळे ओस पडू लागली आहेत. पर्यटनस्थळांकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे

अलिबाग : दहावी, बारावी, तसेच शालेय परीक्षांचा हंगाम सुरू झाल्याने जिल्ह्यातील पर्यटनस्थळे ओस पडू लागली आहेत. पर्यटनस्थळांकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे पर्यटन व्यवसाय थंडावला आहे. त्याचा थेट परिणाम रोजगारावर होऊन आर्थिक संकट ओढावले आहे.रायगड जिल्ह्यातील अलिबाग, माथेरान, मुरुड, श्रीवर्धन अशा महत्त्वाच्या ठिकाणी पर्यटकांचा नेहमीच राबता असतो. ऐतिहासिक, धार्मिक, जंगल, कृषी पर्यटनासाठी मुंबई-पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटकांची येथे रीघ लागलेली असते. विदेशी पर्यटकांनाही येथील पर्यटन स्थळांची भुरळ पडलेली आहे. येथे होणाऱ्या विविध फेस्टिव्हल, पर्यटन महोत्सवामध्ये त्यांनी हजेरी लावलेली आहे. या पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्यात करोडो रुपयांची उलाढाल झाली आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. समुद्रकिनारे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले आहे. त्या ठिकाणी पर्यटकांना मौजमजा करायला मिळते, त्याचप्रमाणे समुद्र सफर, विविध मनोरंजनाच्या साधनांवर स्वार होण्याचा आनंदही लुटता येतो. दहावी, बारावी आणि शाळेच्या परीक्षा आता सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. नेहमीच पर्यटकांनी गजबजलेले अलिबाग शांत आहे. पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे स्थानिकांच्या रोजगारावर विपरीत परिणाम झाला आहे. घोडा-गाडी, उंटाची सफर, बाइक राइड, एटीव्ही राइड, बोटिंग अशा विविध मनोरंजनाच्या साधनांना ब्रेक लागला आहे.परीक्षांचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे विविध व्यवसायावर नक्कीच परिणाम झाला असल्याचे बोटिंग व्यावसायिक प्रकाश भगत यांनी ‘लोकमत’ला सांगितले. नोटाबंदीनंतर काही प्रमाणात व्यवसायाला सुरुवात झाली होती. मात्र परीक्षा सुरू झाल्याने त्यामध्ये खंड पडला आहे. सुट्यांचा हंगाम सुरू झाल्यावर पुन्हा पर्यटन व्यवसायाला झळाळी प्राप्त होईल, असा विश्वासही भगत यांनी व्यक्त केला.परीक्षा सुरू असल्याने पर्यटकांची संख्या रोडावली आहे. पर्यटक येण्याचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे रोजचा खर्च निघणेही मुश्कील झाले आहे, असे नागाव येथील मोरे कॉटेजचे संतोष मोरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पर्यटन स्थळांमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. समुद्रकिनारे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले आहे. त्या ठिकाणी पर्यटकांना मौजमजा करायला मिळते, त्याचप्रमाणे समुद्र सफर, विविध मनोरंजनाच्या साधनांवर स्वार होण्याचा आनंदही लुटता येतो. दहावी, बारावी आणि शाळेच्या परीक्षा आता सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.