शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षांच्या हंगामामुळे पर्यटक रोडावले

By admin | Updated: March 11, 2017 02:17 IST

दहावी, बारावी, तसेच शालेय परीक्षांचा हंगाम सुरू झाल्याने जिल्ह्यातील पर्यटनस्थळे ओस पडू लागली आहेत. पर्यटनस्थळांकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे

अलिबाग : दहावी, बारावी, तसेच शालेय परीक्षांचा हंगाम सुरू झाल्याने जिल्ह्यातील पर्यटनस्थळे ओस पडू लागली आहेत. पर्यटनस्थळांकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे पर्यटन व्यवसाय थंडावला आहे. त्याचा थेट परिणाम रोजगारावर होऊन आर्थिक संकट ओढावले आहे.रायगड जिल्ह्यातील अलिबाग, माथेरान, मुरुड, श्रीवर्धन अशा महत्त्वाच्या ठिकाणी पर्यटकांचा नेहमीच राबता असतो. ऐतिहासिक, धार्मिक, जंगल, कृषी पर्यटनासाठी मुंबई-पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटकांची येथे रीघ लागलेली असते. विदेशी पर्यटकांनाही येथील पर्यटन स्थळांची भुरळ पडलेली आहे. येथे होणाऱ्या विविध फेस्टिव्हल, पर्यटन महोत्सवामध्ये त्यांनी हजेरी लावलेली आहे. या पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्यात करोडो रुपयांची उलाढाल झाली आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. समुद्रकिनारे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले आहे. त्या ठिकाणी पर्यटकांना मौजमजा करायला मिळते, त्याचप्रमाणे समुद्र सफर, विविध मनोरंजनाच्या साधनांवर स्वार होण्याचा आनंदही लुटता येतो. दहावी, बारावी आणि शाळेच्या परीक्षा आता सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. नेहमीच पर्यटकांनी गजबजलेले अलिबाग शांत आहे. पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे स्थानिकांच्या रोजगारावर विपरीत परिणाम झाला आहे. घोडा-गाडी, उंटाची सफर, बाइक राइड, एटीव्ही राइड, बोटिंग अशा विविध मनोरंजनाच्या साधनांना ब्रेक लागला आहे.परीक्षांचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे विविध व्यवसायावर नक्कीच परिणाम झाला असल्याचे बोटिंग व्यावसायिक प्रकाश भगत यांनी ‘लोकमत’ला सांगितले. नोटाबंदीनंतर काही प्रमाणात व्यवसायाला सुरुवात झाली होती. मात्र परीक्षा सुरू झाल्याने त्यामध्ये खंड पडला आहे. सुट्यांचा हंगाम सुरू झाल्यावर पुन्हा पर्यटन व्यवसायाला झळाळी प्राप्त होईल, असा विश्वासही भगत यांनी व्यक्त केला.परीक्षा सुरू असल्याने पर्यटकांची संख्या रोडावली आहे. पर्यटक येण्याचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे रोजचा खर्च निघणेही मुश्कील झाले आहे, असे नागाव येथील मोरे कॉटेजचे संतोष मोरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पर्यटन स्थळांमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. समुद्रकिनारे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले आहे. त्या ठिकाणी पर्यटकांना मौजमजा करायला मिळते, त्याचप्रमाणे समुद्र सफर, विविध मनोरंजनाच्या साधनांवर स्वार होण्याचा आनंदही लुटता येतो. दहावी, बारावी आणि शाळेच्या परीक्षा आता सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.