शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

परीक्षांच्या हंगामामुळे पर्यटक रोडावले

By admin | Updated: March 11, 2017 02:17 IST

दहावी, बारावी, तसेच शालेय परीक्षांचा हंगाम सुरू झाल्याने जिल्ह्यातील पर्यटनस्थळे ओस पडू लागली आहेत. पर्यटनस्थळांकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे

अलिबाग : दहावी, बारावी, तसेच शालेय परीक्षांचा हंगाम सुरू झाल्याने जिल्ह्यातील पर्यटनस्थळे ओस पडू लागली आहेत. पर्यटनस्थळांकडे पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे पर्यटन व्यवसाय थंडावला आहे. त्याचा थेट परिणाम रोजगारावर होऊन आर्थिक संकट ओढावले आहे.रायगड जिल्ह्यातील अलिबाग, माथेरान, मुरुड, श्रीवर्धन अशा महत्त्वाच्या ठिकाणी पर्यटकांचा नेहमीच राबता असतो. ऐतिहासिक, धार्मिक, जंगल, कृषी पर्यटनासाठी मुंबई-पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून पर्यटकांची येथे रीघ लागलेली असते. विदेशी पर्यटकांनाही येथील पर्यटन स्थळांची भुरळ पडलेली आहे. येथे होणाऱ्या विविध फेस्टिव्हल, पर्यटन महोत्सवामध्ये त्यांनी हजेरी लावलेली आहे. या पर्यटन महोत्सवाच्या माध्यमातून जिल्ह्यात करोडो रुपयांची उलाढाल झाली आहे. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. समुद्रकिनारे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले आहे. त्या ठिकाणी पर्यटकांना मौजमजा करायला मिळते, त्याचप्रमाणे समुद्र सफर, विविध मनोरंजनाच्या साधनांवर स्वार होण्याचा आनंदही लुटता येतो. दहावी, बारावी आणि शाळेच्या परीक्षा आता सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. नेहमीच पर्यटकांनी गजबजलेले अलिबाग शांत आहे. पर्यटकांनी पाठ फिरवल्यामुळे स्थानिकांच्या रोजगारावर विपरीत परिणाम झाला आहे. घोडा-गाडी, उंटाची सफर, बाइक राइड, एटीव्ही राइड, बोटिंग अशा विविध मनोरंजनाच्या साधनांना ब्रेक लागला आहे.परीक्षांचा हंगाम सुरू झाला आहे. त्यामुळे पर्यटकांची संख्या रोडावली आहे. त्यामुळे विविध व्यवसायावर नक्कीच परिणाम झाला असल्याचे बोटिंग व्यावसायिक प्रकाश भगत यांनी ‘लोकमत’ला सांगितले. नोटाबंदीनंतर काही प्रमाणात व्यवसायाला सुरुवात झाली होती. मात्र परीक्षा सुरू झाल्याने त्यामध्ये खंड पडला आहे. सुट्यांचा हंगाम सुरू झाल्यावर पुन्हा पर्यटन व्यवसायाला झळाळी प्राप्त होईल, असा विश्वासही भगत यांनी व्यक्त केला.परीक्षा सुरू असल्याने पर्यटकांची संख्या रोडावली आहे. पर्यटक येण्याचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे रोजचा खर्च निघणेही मुश्कील झाले आहे, असे नागाव येथील मोरे कॉटेजचे संतोष मोरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)पर्यटन स्थळांमुळे स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. समुद्रकिनारे पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले आहे. त्या ठिकाणी पर्यटकांना मौजमजा करायला मिळते, त्याचप्रमाणे समुद्र सफर, विविध मनोरंजनाच्या साधनांवर स्वार होण्याचा आनंदही लुटता येतो. दहावी, बारावी आणि शाळेच्या परीक्षा आता सुरू झाल्या आहेत. त्यामुळे पर्यटनस्थळांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे.