शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

‘जेरु सलेम गेट’ होणार पर्यटन स्थळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 01:26 IST

सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी भरकटलेल्या जहाजाद्वारे इस्रायली लोक अलिबाग तालुक्यातील नवगाव येथे आश्रयाला उतरले. भारतात ज्यू लोकांनी पहिल्यांदा ज्या ठिकाणी पाय ठेवले ते नवगाव ज्यू धर्मीयांमध्ये पवित्र ‘जेरु सलेम गेट’ म्हणून ओळखले जाते.

जयंत धुळप अलिबाग : सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी भरकटलेल्या जहाजाद्वारे इस्रायली लोक अलिबाग तालुक्यातील नवगाव येथे आश्रयाला उतरले. भारतात ज्यू लोकांनी पहिल्यांदा ज्या ठिकाणी पाय ठेवले ते नवगाव ज्यू धर्मीयांमध्ये पवित्र ‘जेरु सलेम गेट’ म्हणून ओळखले जाते. याच ‘जेरुसलेम गेट’ स्थळाचा जागतिक पर्यटन स्थळ म्हणून विकास केला जाणार आहे. यासाठी इस्रायलमध्ये गेलेल्या ज्यू बांधवांनी रविवारी मकर संक्रांतीचे औचित्य साधून नवगावला भेट दिली आणि भारतातील पहिल्या आश्रयस्थळाचा विकास करण्याचा संकल्प जाहीर करून, भारत-इस्रायल मैत्रीचा गोडवा वृद्धिंगत केला आहे.रविवारी इस्रायलमधील तब्बल २०० ज्यू नागरिकांनी नवगावला भेट दिली. यामध्ये अमेरिका आणि फ्रान्समध्ये स्थायिक झालेल्या ज्यू बांधवांचाही समावेश होता, अशी माहिती अलिबागेतच लहानाचे मोठे झालेले आणि सध्या इस्रायलमध्ये वास्तव्यास असलेले जोनाथान मोझेस वाक्रुळकर यांनी दिली.ज्यू बांधवांनी नवगाव येथे आ. जयंत पाटील यांच्याशी संवाद साधताना ‘जेरुसलेम गेट’ या पवित्रस्थळाच्या विकासासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. यावेळी आमदार जयंत पाटील यांनी नवगावातील ‘जेरु सलेम गेट’ या स्थळाचा विकास करताना स्मृतिस्तंभाची बांधणी, परिसराचे सुशोभीकरण, विद्युत व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी एक ट्रस्ट स्थापन केला जाणार असून पुरातत्व विभागाच्या तांत्रिक अडचणी येऊ नयेत यासाठी इतिहास तज्ज्ञांचा सल्ला घेतला जाईल, असे आश्वासन दिले. हिंदू-ज्यू संबंध अधिक वृद्धिंगत व्हावेत, यासाठी जगभरातून नवगाव येथे आलेल्या ज्यू बांधवांनी आमदार जयंत पाटील यांना तीळगूळ देवून मैत्रीचा धागा अधिक बळकट केला.रायगडमधून ज्यू लोक जाऊन मोठा कालावधी लोटला आहे, तरीही त्यांनी येथील मातीशी नाते तोडलेले नाही. नवगाव या ठिकाणी दुरवस्थेत असलेले हे स्थळ विकसित केल्यास भारत आणि इस्रायलमधील नातेसंबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास आ.पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.‘जेरु सलेम गेट’ हे जागतिक शांततेचे प्रतीकज्यू धर्मीयांवर जगातील अनेक देशांमध्ये अत्याचार झाले. मात्र, भारतात आलेल्या ज्यू धर्मीयांना सन्मानाची वागणूक मिळाली. दोन हजार वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत हा समाज येथील इतर समाजाशी पूर्णपणे एकरूप झाला. आजच्या घडीला जगभर दहशतवादी हल्ले वाढत असताना ‘जेरुसलेम गेट’ हे जागतिक शांततेचे प्रतीक होईल, अशी भावना इस्रायलमधील ज्येष्ठ ज्यू बांधव जॉनाथॉन सोलमन यांनी व्यक्त केली.पन्नास वर्षांनंतरही आश्रयस्थळाशी नाते कायमज्यू बांधव नवगाव येथून इस्रायलमध्ये गेले त्या घटनेला पन्नास वर्षांपेक्षाही जास्त कालावधी उलटून गेला आहे, तरीही त्यांचे आश्रयस्थळाशी असलेले नाते अजिबात तुटलेले नाही. आलेल्या ज्यू बांधवांपैकी बहुतेकजण उत्तम मराठीतूनच बोलत होते. येथे आल्यानंतर त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्यांचे जुने सहकारी भेटल्याने अनेक जण या जुन्या आठवणीने भारावून गेले होते.