शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

मुरुड तालुक्यातील पर्यटनस्थळे गजबजली, दोन लाख पर्यटक दाखल झाल्याचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 04:12 IST

थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी मुरुड तालुक्यातील समुद्रकिनारी पर्यटकांनी तुफान गर्दी केली आहे. तालुक्यातील पर्यटन स्थळे, हॉटेल, रेस्टॉरंट गेल्या आठवड्यापासूनच गजबजले आहेत.

- गणेश चोडणेकरआगरदांडा : थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी मुरुड तालुक्यातील समुद्रकिनारी पर्यटकांनी तुफान गर्दी केली आहे. तालुक्यातील पर्यटन स्थळे, हॉटेल, रेस्टॉरंट गेल्या आठवड्यापासूनच गजबजले आहेत. सुमारे दोन लाख पर्यटक याठिकाणी दाखल झाल्याचा अंदाज व्यक्त होत असून त्यामुळे लाखो रु पयांची आर्थिक उलाढाल अपेक्षित आहे.सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी समुद्रकिनारच्या हॉटेल, रेस्टॉरंट, लॉजिंग व फार्महाउसवर पसंती दिली आहे. मुरुड तालुक्यातील ऐतिहासिक जंजिरा किल्ला, काशीद, कोर्लई किल्ला, चिकणी, बारशीव, सवतकडा, दत्तमंदिर, गारंबीअशा तालुक्यातील विविध पर्यटनस्थळांवर गर्दी केली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी हॉटेल, रेस्टॉरंटच्या मालकांनी विद्युत रोषणाई व डीजे नाईट पार्टीची सोय केली आहे. समुद्रकिनारी असणाऱ्या हॉटेलमध्येही पर्यटकांना विविध मनोरंजनाचे खेळ, आॅर्केस्ट्राची व्यवस्था तसेच कोकणी, गोमांतक, कोळी, आगरी अशा मांसाहारी पदार्थांची मेजवानी ठेवली आहे. समुद्रकिनारी पर्यटकांना विविध बाइक , घोडे, एटीव्ही राइड, उंट सवारी यांचा मनमुराद आनंद लुटत यावा यासाठी त्या त्या मालकांनी जय्यत तयारी केली आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी मुरुड-जंजिरा नगरपरिषद तीन दिवस पर्यटन महोत्सव साजरा करणार आहे.तालुक्यात लाखोंच्या संख्येने पर्यटक दाखल झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुरुड पोलीस निरीक्षक किशोर साळे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पोलीस उपनिरीक्षक व २० पोलीस कर्मचारी आणि १० होमगार्ड यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विविध चेकपोस्ट वाहनांची तसेच मद्यपान करून वाहन चालविणाºयांची तपासणी केली जाणार आहे.किनाºयावर आतापर्यंत आलेल्या पर्यटकांसानी सुचनांचे पालन करावे यासाठी प्रशासनाने जागोजागी सुचनाफलक लावलेले आहेत. रूग्णवाहीकाही तैनात करण्यात आल्या आहेत. एकूणच कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत.या आठवड्यात पर्यटकांच्या गर्दीत दुपट्टीने भर पडली असून, समुद्र किना-यावरील छोट्या व्यावसायिकांच्या गल्ल्यातही भर पडली असून, त्यांच्यासाठीही एक पर्वणीच आहे.दरवर्षीप्रमाणेच या वर्षीही मुरूड तालुक्यातील समुद्र किनारे गर्दीने फुलले असून, पर्यटकांमध्येही उत्साह पहायला मिळत आहे. किनाºयांसोबतच अनेक पर्यटन स्थळेही खुली ठेवण्यात आली आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

टॅग्स :tourismपर्यटनRaigadरायगड