शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे हाउसफुल्ल, महानगरात संचारबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 23:24 IST

Tourist : अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन या ठिकाणचे समुद्रकिनारे पर्यटकांनी खचाखच भरले आहेत. मात्र, महानगरीमध्ये रात्री ११ ते सकाळी ६ या कालावधीत संचारबंदी आदेश लागू असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

रायगड : काेराेनाच्या प्रभावानंतर सरकारने आता वाॅटर स्पाेर्ट्स आणि नाैकानयनला परवानगी दिली आहे. नाताळ सणासह थर्टी फर्स्टचा दुहेरी आनंद लुटण्यासाठी जिल्ह्यात माेठ्या संख्येने पर्यटक दाखल हाेत आहेत. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन या ठिकाणचे समुद्रकिनारे पर्यटकांनी खचाखच भरले आहेत. मात्र, महानगरीमध्ये रात्री ११ ते सकाळी ६ या कालावधीत संचारबंदी आदेश लागू असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. मात्र, रायगड जिल्ह्यामध्ये असे आदेश जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी अद्याप दिलेले नसल्याने संभ्रम कायम आहे.काेराेनाचा प्रभाव कमी हाेत असल्याने सरकारने टप्प्याटप्प्याने विविध क्षेत्रे खुली केली आहेत. व्यवहार सुरळीत हाेत असल्याने बाजारांमध्येही काही प्रमाणात तेजी दिसून येत आहे. गेले सातआठ महिने नागरिक आपल्या घराबाहेर पडले नव्हते. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर त्यांना हाेम क्वारंटाइन करून घ्यावे लागले हाेते. सातत्याने घरात राहिल्याने बाहेर पडताच आले नसल्याने जीवन कंटाळवाने झाले हाेते. आता काेराेनाचा उद्रेक बऱ्यापैकी थांबत असल्याने सरकारने पर्यटनाला परवानगी दिली आहे. त्याचप्रमाणे वाॅटर स्पोर्ट्स नाैकानयन आणि मनाेरंजन पार्कचेही टाळे उघडले आहे. काही दिवसांवर नाताळ सण येऊन ठेपला आहे, तर त्यापाठाेपाठ थर्टी फर्स्ट साजरा करण्यात येणार आहे. सरकारने वेळेवर शिथिलता दिल्याने पर्यटक माेठ्या संख्येने दाखल हाेत आहेत. अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन येथील समुद्रकिनारे पर्यटकांनी चांगलेच फुलून गेले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश नाहीत

- हाॅटेल, रेस्टाॅरंट, लाॅजिंग काॅटेजही पर्यटकांनी व्यापली आहेत. काही दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये काेराेनाने आपले रूप बदलल्याचे पुढे आले आहे. ७० टक्के या काेराेना विषाणूचा झपाट्याने प्रसार हाेत असल्याने सर्वच जगासाठी ही धाेक्याची घंटा आहे. नव्या काेराेनापासून बचाव करण्यासाठी परदेशी पर्यटकांवर सरकारने निर्बंध घातले आहेत. - गर्दी हाेऊ नये, यासाठी महानगरमध्ये सरकारने नाताळ सण आणि थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर रात्री ११ ते सकाळी ६ या कालावधीत पाचपेक्षा अधिक नागरिकांना फिरण्यास मनाई केली आहे. रायगड जिल्ह्यामध्ये अद्यापही जिल्हाधिकारी निधी चाैधरी यांनी याबाबतचे आदेश जारी केलेले नाहीत. - महानगरामध्ये नियम लावले आहेत. त्यामुळे एमएमआरडीएमध्येही ते लागू हाेण्याची शक्यता आहे. आदेश नसल्याने व्यापारी, हाॅटेल व्यावसायिक, पर्यटक यांच्यामध्ये मात्र त्यामुळे संभ्रामाचे वातावरण आहे. 

टॅग्स :alibaugअलिबाग