शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

गड-किल्ल्यांवर पर्यटकांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 00:57 IST

संबंधितांनी लक्ष द्यावे : विद्रूपीकरण, पावित्र्य भंग करण्याचा प्रकार

कर्जत : महाराष्ट्रातील गडकोट हे इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्याचे पावित्र्य राखले पाहिजे. मात्र, पर्यटक येथे दारू पिऊन मज्जा मस्ती करणे, अश्लीश चाळे करणे, तलाव व पाण्याच्या टाक्यात पोहणे, तोफांवर बसणे असे प्रकार करत आहेत, त्यामुळे येथे विद्रूपीकरण होत आहे, याची दखल संबंधितांनी घ्यावी, अशी मागणी सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत करण्यात आली आहे.

आज जरी गड-किल्ले संरक्षित किंवा असंरक्षित स्मारक असले तरी त्याचे पावित्र्य बिघडविण्याचे काम हौशी पर्यटकांकडून होत आहे. संरक्षित स्मारकावर राज्य आणि केंद्र पुरातत्त्व विभागाने जिथे २५ रुपये एवढा तिकीट दर आकारला जातो तेथे त्यांनी गड-किल्ल्यांच्या वास्तूंची होणारी हानी व विटंबना याकडे लक्ष दिले पाहिजे. लोहगडावर पुरातत्त्व विभागाने सुरक्षारक्षक वाढवावे आणि गडावर चारही बाजूला फिरत राहावे, अशी मागणी सह्याद्री प्रतिष्ठान करत आहे. त्यामुळे पर्यटक किल्ल्यात अवघड ठिकाणी जाऊन अपघात होत असतात त्यावरही तोडगा निघेल आणि लोकांचे प्राण वाचतील. सध्या हे प्रकार मोठ्या प्रमाणावर किल्ल्यांवर होत आहेत. २१ जुलै रोजी लोहगडावरील त्रंबक तलाव व पाण्याच्या टाक्यात पर्यटक पोहत व लघुशंका करत होते. या तलावातील पाण्याने तलावाशेजारी आलेल्या महादेव मंदिरात शिवलिंगावर जल अभिषेक केला जातो, तसेच गडावरील तलाव व पाण्याचे टाके यातील पाणी हिवाळा व उन्हाळ्यात पिण्यासाठी वापरले जाते. गेल्या महिन्यात कोथळीगडावर दारूची पार्टी करत होते. राजगडावर एका प्रेमीयुगलाकडून अश्लीश चाळे करण्याचा फोटो सोशल मीडियावर आला. तर विसापूर किल्ल्यावर पर्यटक अवघड ठिकाणी अडकले होते. पावसाळ्यात मज्जा मस्ती आणि पर्यटन करण्यासाठी हौशी पर्यटक हे गड-किल्ल्यांवर जातात, त्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी आहे.निवेदनाद्वारे तक्रारच्पुरातत्त्व विभागाने लक्ष घातले नाही तर केंद्र पुरातत्त्व विभागाच्या विरोधात सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला असून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, मुंबई सर्कल यांना, स्थानिक पोलीस, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देऊन तक्रार करण्यात आली आहे.

टॅग्स :RaigadरायगडFortगड