शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
4
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
5
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
6
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
7
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
8
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
9
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
10
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
11
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
12
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
13
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
14
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
15
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
16
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
17
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
18
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
19
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं

गड-किल्ल्यांवर पर्यटकांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 00:57 IST

संबंधितांनी लक्ष द्यावे : विद्रूपीकरण, पावित्र्य भंग करण्याचा प्रकार

कर्जत : महाराष्ट्रातील गडकोट हे इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्याचे पावित्र्य राखले पाहिजे. मात्र, पर्यटक येथे दारू पिऊन मज्जा मस्ती करणे, अश्लीश चाळे करणे, तलाव व पाण्याच्या टाक्यात पोहणे, तोफांवर बसणे असे प्रकार करत आहेत, त्यामुळे येथे विद्रूपीकरण होत आहे, याची दखल संबंधितांनी घ्यावी, अशी मागणी सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत करण्यात आली आहे.

आज जरी गड-किल्ले संरक्षित किंवा असंरक्षित स्मारक असले तरी त्याचे पावित्र्य बिघडविण्याचे काम हौशी पर्यटकांकडून होत आहे. संरक्षित स्मारकावर राज्य आणि केंद्र पुरातत्त्व विभागाने जिथे २५ रुपये एवढा तिकीट दर आकारला जातो तेथे त्यांनी गड-किल्ल्यांच्या वास्तूंची होणारी हानी व विटंबना याकडे लक्ष दिले पाहिजे. लोहगडावर पुरातत्त्व विभागाने सुरक्षारक्षक वाढवावे आणि गडावर चारही बाजूला फिरत राहावे, अशी मागणी सह्याद्री प्रतिष्ठान करत आहे. त्यामुळे पर्यटक किल्ल्यात अवघड ठिकाणी जाऊन अपघात होत असतात त्यावरही तोडगा निघेल आणि लोकांचे प्राण वाचतील. सध्या हे प्रकार मोठ्या प्रमाणावर किल्ल्यांवर होत आहेत. २१ जुलै रोजी लोहगडावरील त्रंबक तलाव व पाण्याच्या टाक्यात पर्यटक पोहत व लघुशंका करत होते. या तलावातील पाण्याने तलावाशेजारी आलेल्या महादेव मंदिरात शिवलिंगावर जल अभिषेक केला जातो, तसेच गडावरील तलाव व पाण्याचे टाके यातील पाणी हिवाळा व उन्हाळ्यात पिण्यासाठी वापरले जाते. गेल्या महिन्यात कोथळीगडावर दारूची पार्टी करत होते. राजगडावर एका प्रेमीयुगलाकडून अश्लीश चाळे करण्याचा फोटो सोशल मीडियावर आला. तर विसापूर किल्ल्यावर पर्यटक अवघड ठिकाणी अडकले होते. पावसाळ्यात मज्जा मस्ती आणि पर्यटन करण्यासाठी हौशी पर्यटक हे गड-किल्ल्यांवर जातात, त्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी आहे.निवेदनाद्वारे तक्रारच्पुरातत्त्व विभागाने लक्ष घातले नाही तर केंद्र पुरातत्त्व विभागाच्या विरोधात सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला असून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, मुंबई सर्कल यांना, स्थानिक पोलीस, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देऊन तक्रार करण्यात आली आहे.

टॅग्स :RaigadरायगडFortगड