शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

गड-किल्ल्यांवर पर्यटकांचा हैदोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 00:57 IST

संबंधितांनी लक्ष द्यावे : विद्रूपीकरण, पावित्र्य भंग करण्याचा प्रकार

कर्जत : महाराष्ट्रातील गडकोट हे इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्याचे पावित्र्य राखले पाहिजे. मात्र, पर्यटक येथे दारू पिऊन मज्जा मस्ती करणे, अश्लीश चाळे करणे, तलाव व पाण्याच्या टाक्यात पोहणे, तोफांवर बसणे असे प्रकार करत आहेत, त्यामुळे येथे विद्रूपीकरण होत आहे, याची दखल संबंधितांनी घ्यावी, अशी मागणी सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत करण्यात आली आहे.

आज जरी गड-किल्ले संरक्षित किंवा असंरक्षित स्मारक असले तरी त्याचे पावित्र्य बिघडविण्याचे काम हौशी पर्यटकांकडून होत आहे. संरक्षित स्मारकावर राज्य आणि केंद्र पुरातत्त्व विभागाने जिथे २५ रुपये एवढा तिकीट दर आकारला जातो तेथे त्यांनी गड-किल्ल्यांच्या वास्तूंची होणारी हानी व विटंबना याकडे लक्ष दिले पाहिजे. लोहगडावर पुरातत्त्व विभागाने सुरक्षारक्षक वाढवावे आणि गडावर चारही बाजूला फिरत राहावे, अशी मागणी सह्याद्री प्रतिष्ठान करत आहे. त्यामुळे पर्यटक किल्ल्यात अवघड ठिकाणी जाऊन अपघात होत असतात त्यावरही तोडगा निघेल आणि लोकांचे प्राण वाचतील. सध्या हे प्रकार मोठ्या प्रमाणावर किल्ल्यांवर होत आहेत. २१ जुलै रोजी लोहगडावरील त्रंबक तलाव व पाण्याच्या टाक्यात पर्यटक पोहत व लघुशंका करत होते. या तलावातील पाण्याने तलावाशेजारी आलेल्या महादेव मंदिरात शिवलिंगावर जल अभिषेक केला जातो, तसेच गडावरील तलाव व पाण्याचे टाके यातील पाणी हिवाळा व उन्हाळ्यात पिण्यासाठी वापरले जाते. गेल्या महिन्यात कोथळीगडावर दारूची पार्टी करत होते. राजगडावर एका प्रेमीयुगलाकडून अश्लीश चाळे करण्याचा फोटो सोशल मीडियावर आला. तर विसापूर किल्ल्यावर पर्यटक अवघड ठिकाणी अडकले होते. पावसाळ्यात मज्जा मस्ती आणि पर्यटन करण्यासाठी हौशी पर्यटक हे गड-किल्ल्यांवर जातात, त्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी आहे.निवेदनाद्वारे तक्रारच्पुरातत्त्व विभागाने लक्ष घातले नाही तर केंद्र पुरातत्त्व विभागाच्या विरोधात सह्याद्री प्रतिष्ठान मार्फत आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला असून भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण, मुंबई सर्कल यांना, स्थानिक पोलीस, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदने देऊन तक्रार करण्यात आली आहे.

टॅग्स :RaigadरायगडFortगड