शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

रेवदंड्यात अरुंद रस्त्यामुळे पर्यटनावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 23:55 IST

रायगड जिल्हा म्हटले की पर्यटकांना किल्ले, लेण्या, अभयारण्ये, विविध प्राचीन मंदिरे, जलदुर्ग व सर्वात महत्त्वाचे म्हणजे विविध ठिकाणचे समुद्रकिनारे. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा हे गाव अलिबाग शहरापासून सुमारे १७ कि.मी. अंतरावर वसले आहे.

- अभय आपटेरेवदंडा : रायगड जिल्हा म्हटले की पर्यटकांना किल्ले, लेण्या, अभयारण्ये, विविध प्राचीन मंदिरे, जलदुर्ग व सर्वात महत्त्वाचे म्हणजे विविध ठिकाणचे समुद्रकिनारे. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा हे गाव अलिबाग शहरापासून सुमारे १७ कि.मी. अंतरावर वसले आहे. गावाला ऐतिहासिक महत्त्व आहेच शिवाय आध्यात्मिक क्षेत्र म्हणून ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यामुळे या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रायगडची किनारपट्टी सुरक्षित असली तरी येथील रस्ते मात्र पर्यटनास मारक ठरत आहेत. अरुंद रस्त्यांमुळे होणाºया वाहतूककोंडीमुळे अनेकदा पर्यटक त्रस्त होत असल्याचे दिसते.मुंबई-ठाण्यापासून दळणवळणास सोयीचे, शांत आणि परवडणारे असल्याने अनेक जण सेकंडहोम म्हणून या शांत परिसराला पसंती देतात. वीकेण्ड, वन डे पिकनिकसाठी अनेक जण रेवदंडा, अलिबागला पसंती देतात. मात्र, जाण्याऐवजी वन-डे पिकनिक होण्यासारखी ही ठिकाणे असल्याने पर्यटकांची संख्या वाढत आहे. मात्र, अरुंद रस्त्यामुळे परिसरात नेहमीच वाहतूककोंडीची समस्या उद्भवते. अनेक ठिकाणी दोन वाहने एका वेळी जाऊच शकत नाहीत. त्यामुळे पर्यटक रेवदंड्याला येण्याचे टाळत असल्याने पर्यटन व्यवसायावरही परिणाम होत आहे. परिणामी, स्थानिकांच्या रोजगाराच्या संधी निर्माण होताना दिसत नाही.साधारण १९८५ पर्यंत रेवदंडा हे अलिबाग तालुक्याचे रस्ता वाहतुकीसाठी शेवटचे टोक होते. कुंडलिका खाडीवर पूल झाला आणि अलिबाग, रोहा व मुरु ड-जंजिरा तालुके रस्ता वाहतुकीने जोडले गेले. त्यात रेवदंडा हे मध्यवर्ती ठिकाण बनले. पुढे १९८६ च्या सुमारास साळावमध्ये लोखंड शुद्धीकरणाचा प्रकल्प आला. मुरुडमधील फणसाड अभयारण्य, काशिदचा किनारा पर्यटकांच्या पसंतीस उतरले आणि औद्योगिक वसाहत असलेला रोहा तालुक्यातील वाहनांची वर्दळ रेवदंडा बाजारपेठेतून होऊ लागली, त्यामुळे रेवदंडामध्ये वाहतूककोंडी होऊ लागली. रस्त्यावरील हातगाड्या, फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे रस्ता आणखीनच अरुंद झाला आहे. पर्यटकांच्या वाहनांसाठी व अवजड वाहनांसाठी बाह्यवळण मार्ग असला तरी धोकादायक वळणांमुळे पर्यटक बाजारपेठेतील रस्त्याला पसंती देतात.काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने किनारी भागात दिशादर्शक फलक लावले. मात्र, याच ठिकाणी दर्शनी भागात मच्छीमार्केट थाटल्याने पर्यटक हा मार्ग टाळू लागले. पारनाका, जुनी देना बँक या ठिकाणी दोन वाहने एका वेळी जाऊ शकत नाहीत, इतका अरुंद रस्ता असल्याने पर्यटक पाठ फिरवत आहेत. पर्यटनाला चालना देण्यासाठी परिसरात रस्ता रुंदीकरण व पार्किंग व्यवस्था होणे गरजेचे असल्याचे मत परिसरातील उपाहारगृह व्यावसायिकाने व्यक्त केले आहे.रेवदंड्यात लवकरच नवे मच्छीमार्केट उभारण्यात येणार आहे. त्यामुळे किनाºयावर जाणारा रस्ता मोकळा होईल. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विद्युत व्यवस्था, आसनव्यवस्था केली जात आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे.- मनीषा चुनेकर, सरपंच

टॅग्स :Raigadरायगड