शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

रेवदंड्यात अरुंद रस्त्यामुळे पर्यटनावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 23:55 IST

रायगड जिल्हा म्हटले की पर्यटकांना किल्ले, लेण्या, अभयारण्ये, विविध प्राचीन मंदिरे, जलदुर्ग व सर्वात महत्त्वाचे म्हणजे विविध ठिकाणचे समुद्रकिनारे. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा हे गाव अलिबाग शहरापासून सुमारे १७ कि.मी. अंतरावर वसले आहे.

- अभय आपटेरेवदंडा : रायगड जिल्हा म्हटले की पर्यटकांना किल्ले, लेण्या, अभयारण्ये, विविध प्राचीन मंदिरे, जलदुर्ग व सर्वात महत्त्वाचे म्हणजे विविध ठिकाणचे समुद्रकिनारे. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा हे गाव अलिबाग शहरापासून सुमारे १७ कि.मी. अंतरावर वसले आहे. गावाला ऐतिहासिक महत्त्व आहेच शिवाय आध्यात्मिक क्षेत्र म्हणून ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यामुळे या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रायगडची किनारपट्टी सुरक्षित असली तरी येथील रस्ते मात्र पर्यटनास मारक ठरत आहेत. अरुंद रस्त्यांमुळे होणाºया वाहतूककोंडीमुळे अनेकदा पर्यटक त्रस्त होत असल्याचे दिसते.मुंबई-ठाण्यापासून दळणवळणास सोयीचे, शांत आणि परवडणारे असल्याने अनेक जण सेकंडहोम म्हणून या शांत परिसराला पसंती देतात. वीकेण्ड, वन डे पिकनिकसाठी अनेक जण रेवदंडा, अलिबागला पसंती देतात. मात्र, जाण्याऐवजी वन-डे पिकनिक होण्यासारखी ही ठिकाणे असल्याने पर्यटकांची संख्या वाढत आहे. मात्र, अरुंद रस्त्यामुळे परिसरात नेहमीच वाहतूककोंडीची समस्या उद्भवते. अनेक ठिकाणी दोन वाहने एका वेळी जाऊच शकत नाहीत. त्यामुळे पर्यटक रेवदंड्याला येण्याचे टाळत असल्याने पर्यटन व्यवसायावरही परिणाम होत आहे. परिणामी, स्थानिकांच्या रोजगाराच्या संधी निर्माण होताना दिसत नाही.साधारण १९८५ पर्यंत रेवदंडा हे अलिबाग तालुक्याचे रस्ता वाहतुकीसाठी शेवटचे टोक होते. कुंडलिका खाडीवर पूल झाला आणि अलिबाग, रोहा व मुरु ड-जंजिरा तालुके रस्ता वाहतुकीने जोडले गेले. त्यात रेवदंडा हे मध्यवर्ती ठिकाण बनले. पुढे १९८६ च्या सुमारास साळावमध्ये लोखंड शुद्धीकरणाचा प्रकल्प आला. मुरुडमधील फणसाड अभयारण्य, काशिदचा किनारा पर्यटकांच्या पसंतीस उतरले आणि औद्योगिक वसाहत असलेला रोहा तालुक्यातील वाहनांची वर्दळ रेवदंडा बाजारपेठेतून होऊ लागली, त्यामुळे रेवदंडामध्ये वाहतूककोंडी होऊ लागली. रस्त्यावरील हातगाड्या, फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे रस्ता आणखीनच अरुंद झाला आहे. पर्यटकांच्या वाहनांसाठी व अवजड वाहनांसाठी बाह्यवळण मार्ग असला तरी धोकादायक वळणांमुळे पर्यटक बाजारपेठेतील रस्त्याला पसंती देतात.काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने किनारी भागात दिशादर्शक फलक लावले. मात्र, याच ठिकाणी दर्शनी भागात मच्छीमार्केट थाटल्याने पर्यटक हा मार्ग टाळू लागले. पारनाका, जुनी देना बँक या ठिकाणी दोन वाहने एका वेळी जाऊ शकत नाहीत, इतका अरुंद रस्ता असल्याने पर्यटक पाठ फिरवत आहेत. पर्यटनाला चालना देण्यासाठी परिसरात रस्ता रुंदीकरण व पार्किंग व्यवस्था होणे गरजेचे असल्याचे मत परिसरातील उपाहारगृह व्यावसायिकाने व्यक्त केले आहे.रेवदंड्यात लवकरच नवे मच्छीमार्केट उभारण्यात येणार आहे. त्यामुळे किनाºयावर जाणारा रस्ता मोकळा होईल. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विद्युत व्यवस्था, आसनव्यवस्था केली जात आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे.- मनीषा चुनेकर, सरपंच

टॅग्स :Raigadरायगड