शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये हिमस्खलनात सात जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
2
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
3
फक्त २००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल 'कोट्यधीश'; कंपाऊंडिंगचे गणित समजून घ्या
4
'घोळ कुणी घातला आणि फायदा कुणाला झाला, हे आता लपवणं शक्यच नाही'; राज ठाकरेंच्या आमदाराचं थेट मुद्द्यावर बोट
5
१ कोटींचा पगार, ६० सेकंदात व्हिसा रिजेक्ट; इंजिनिअरने धक्कादायक अनुभव सांगितला, ते तीन प्रश्नही केले शेअर
6
आजीला ‘हार्ट अटॅक’...घरच्यांनी लपवली गोष्ट; भारताच्या लेकीनं फिल्डिंगच्या जोरावर फिरवली मॅच!
7
Railway Accident: मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी दोन इंजिनिअरवर गुन्हा दाखल, एफआरआयमध्ये काय?
8
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
9
'गप्पू आणि चप्पूपासून बिहारला वाचवायचे आहे'; 'पप्पू-टप्पू-अप्पू'च्या टीकेनंतर अखिलेश यादवांचा पलटवार
10
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
11
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
12
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
13
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
14
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
15
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
16
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
17
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
18
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
19
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
20
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!

रेवदंड्यात अरुंद रस्त्यामुळे पर्यटनावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2019 23:55 IST

रायगड जिल्हा म्हटले की पर्यटकांना किल्ले, लेण्या, अभयारण्ये, विविध प्राचीन मंदिरे, जलदुर्ग व सर्वात महत्त्वाचे म्हणजे विविध ठिकाणचे समुद्रकिनारे. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा हे गाव अलिबाग शहरापासून सुमारे १७ कि.मी. अंतरावर वसले आहे.

- अभय आपटेरेवदंडा : रायगड जिल्हा म्हटले की पर्यटकांना किल्ले, लेण्या, अभयारण्ये, विविध प्राचीन मंदिरे, जलदुर्ग व सर्वात महत्त्वाचे म्हणजे विविध ठिकाणचे समुद्रकिनारे. अलिबाग तालुक्यातील रेवदंडा हे गाव अलिबाग शहरापासून सुमारे १७ कि.मी. अंतरावर वसले आहे. गावाला ऐतिहासिक महत्त्व आहेच शिवाय आध्यात्मिक क्षेत्र म्हणून ज्येष्ठ निरूपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्यामुळे या ठिकाणी येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. रायगडची किनारपट्टी सुरक्षित असली तरी येथील रस्ते मात्र पर्यटनास मारक ठरत आहेत. अरुंद रस्त्यांमुळे होणाºया वाहतूककोंडीमुळे अनेकदा पर्यटक त्रस्त होत असल्याचे दिसते.मुंबई-ठाण्यापासून दळणवळणास सोयीचे, शांत आणि परवडणारे असल्याने अनेक जण सेकंडहोम म्हणून या शांत परिसराला पसंती देतात. वीकेण्ड, वन डे पिकनिकसाठी अनेक जण रेवदंडा, अलिबागला पसंती देतात. मात्र, जाण्याऐवजी वन-डे पिकनिक होण्यासारखी ही ठिकाणे असल्याने पर्यटकांची संख्या वाढत आहे. मात्र, अरुंद रस्त्यामुळे परिसरात नेहमीच वाहतूककोंडीची समस्या उद्भवते. अनेक ठिकाणी दोन वाहने एका वेळी जाऊच शकत नाहीत. त्यामुळे पर्यटक रेवदंड्याला येण्याचे टाळत असल्याने पर्यटन व्यवसायावरही परिणाम होत आहे. परिणामी, स्थानिकांच्या रोजगाराच्या संधी निर्माण होताना दिसत नाही.साधारण १९८५ पर्यंत रेवदंडा हे अलिबाग तालुक्याचे रस्ता वाहतुकीसाठी शेवटचे टोक होते. कुंडलिका खाडीवर पूल झाला आणि अलिबाग, रोहा व मुरु ड-जंजिरा तालुके रस्ता वाहतुकीने जोडले गेले. त्यात रेवदंडा हे मध्यवर्ती ठिकाण बनले. पुढे १९८६ च्या सुमारास साळावमध्ये लोखंड शुद्धीकरणाचा प्रकल्प आला. मुरुडमधील फणसाड अभयारण्य, काशिदचा किनारा पर्यटकांच्या पसंतीस उतरले आणि औद्योगिक वसाहत असलेला रोहा तालुक्यातील वाहनांची वर्दळ रेवदंडा बाजारपेठेतून होऊ लागली, त्यामुळे रेवदंडामध्ये वाहतूककोंडी होऊ लागली. रस्त्यावरील हातगाड्या, फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे रस्ता आणखीनच अरुंद झाला आहे. पर्यटकांच्या वाहनांसाठी व अवजड वाहनांसाठी बाह्यवळण मार्ग असला तरी धोकादायक वळणांमुळे पर्यटक बाजारपेठेतील रस्त्याला पसंती देतात.काही वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीने किनारी भागात दिशादर्शक फलक लावले. मात्र, याच ठिकाणी दर्शनी भागात मच्छीमार्केट थाटल्याने पर्यटक हा मार्ग टाळू लागले. पारनाका, जुनी देना बँक या ठिकाणी दोन वाहने एका वेळी जाऊ शकत नाहीत, इतका अरुंद रस्ता असल्याने पर्यटक पाठ फिरवत आहेत. पर्यटनाला चालना देण्यासाठी परिसरात रस्ता रुंदीकरण व पार्किंग व्यवस्था होणे गरजेचे असल्याचे मत परिसरातील उपाहारगृह व्यावसायिकाने व्यक्त केले आहे.रेवदंड्यात लवकरच नवे मच्छीमार्केट उभारण्यात येणार आहे. त्यामुळे किनाºयावर जाणारा रस्ता मोकळा होईल. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विद्युत व्यवस्था, आसनव्यवस्था केली जात आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यांचीही दुरुस्ती करण्यात येणार आहे.- मनीषा चुनेकर, सरपंच

टॅग्स :Raigadरायगड