शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

आजचे तरु ण क्रांतिकारक बदल घडवू शकतात -कोळंबे

By admin | Updated: January 12, 2017 06:09 IST

युवकांना शिक्षणाबरोबरच सामाजिक जाणीव निर्माण होण्याची खूप मोठी गरज आहे. आज युवकांमध्ये मेरीट असतानाही

कर्जत : युवकांना शिक्षणाबरोबरच सामाजिक जाणीव निर्माण होण्याची खूप मोठी गरज आहे. आज युवकांमध्ये मेरीट असतानाही त्यांना आर्थिक दुर्बल परिस्थितीमुळे पुढे शिक्षण घेता येत नाही. शिक्षणाचे बाजारीकरण झाले आहे. प्रचंड प्रमाणात डोनेशन घेतले जाते. दीडशे वर्षांपूर्वी या देशात वेगळी परिस्थिती होती. एका विशिष्ट वर्गाला शिक्षणाचा अधिकार होता; परंतु ही परिस्थिती उलथून टाकण्याचे काम महापुरुषांनी केले. छत्रपती शिवरायांनी १७व्या शतकात तरु ण वयातच तोरणा किल्ला उभारून रयतेच्या राज्याचे तोरण उभे केले. महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुलेंनी महिलांच्या शिक्षणाची दारे उघडली, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९२३मध्ये तरु णपणातच उच्च शिक्षांच्या पदव्या मिळविल्या आणि वयाच्या३०व्या वर्षी भाई कोतवाल यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. आपल्या जडणघडणीमध्ये या महापुरु षांचा मोठा त्याग आहे. आजचा तरु ण या देशात क्र ांतिकारी बदल घडवून आणू शकतो. आपली आर्थिक परिस्थिती कमजोर आहे किंवा मी ग्रामीण भागातील आहे, ही भावना दूर करून महापुरु षांच्या विचारांतून प्रेरणा घ्यावी, असे रायगडभूषण वसंत कोळंबे म्हणाले.लाइट आॅफ लाइफ ट्रस्ट ही सामाजिक संस्थेच्या वतीने ‘युवा महोत्सव’ या वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्र माचे आयोजन कर्जत येथे करण्यात आले होते. त्यावेळी कोळंबे बोलत होते.‘मी घडलो, आता मी घडवेन’ हा संदेश घेऊन संस्थेच्या विद्यार्थांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता, या महोत्सवाचे उद्घाटन वसंत कोळंबे यांच्या हस्ते करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये युवकांना भारतीय उच्च शिक्षणाची आव्हाने आणि त्याचे देशाच्या आर्थिक राजकीय आणि सामाजिक स्थैर्यावर होणारे परिणाम या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मुलांनी सामाजिक विषयावर नाटक, समूह नृत्य, मूक अभिनय सादर केले. या वेळी नाना नानी फाउंडेशन संस्थापक सिंघानिया, प्रदीप रॉय, संस्थेच्या कमल दमानिया, सुधीरकुमार गजभिये, श्रुती मालगुंडकर, मकरंद पाठक, कांचन थोरवे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्र माचे प्रास्ताविक सहायक प्रकल्प समन्वयक दशरथ देशमुख यांनी केले, तर आभार प्रदर्शन सहायक प्रकल्प समन्वयक पंकज कांबळे यांनी केले. (वार्ताहर)