शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

खारेपाटात इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करणार; आ. जयंत पाटील यांचं प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2022 20:22 IST

नारंगी ग्रामपंचायतीच्या वास्तुचे उद्घाटन, आस विद्यालय अ‍ॅपचा शुभारंभ

अलिबाग - आगरी समाज आणि रायगडचा शैक्षणिक विकास ना.ना.पाटील यांनी केला आहे. तीच परंपरा आपल्याला पुढे चालवायची आहे. त्याच दृष्टीकोनातून खारेपाटात चांगल्या दर्जाच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु करायच्या आहेत असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले. खारेपाटातील नारंगी ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या वास्तूचे उद्घाटन आ. जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी माजी मंत्री मीनाक्षी पाटील, माजी आमदार पंडित पाटील, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा गटनेते अ‍ॅड आस्वाद पाटील, जिल्हा परिषद सदस्य भावना पाटील, पंचायत समितीचे सभापती प्रमोद ठाकूर, शेकाप महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते नरहरी म्हात्रे, तसेच पत्रकार रिद्धी प्रसाद म्हात्रे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

आ. जयंत पाटील आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, खारेपाटाचा एक वेगळा इतिहास आहे. सदैव स्फुर्ती देणारा असा हा खारेपाट आहे. आगरी समाज आहे त्या ठिकाणी विकासाचे वेगळे चित्र दिसते. रायगडच्या आगरी समाजाची इंगजांमध्ये देखील दहशत होती. म्हणूनच इंग्रज रायगडकडे फिरकले देखील नाहीत. या समाजाकडे बुद्धीमत्ता आहे, आक्रमकता आहे. नारंगी ग्रामपंचायतीच्या टिमचे काम उत्कृष्ट चालले असून. मला अभिप्रेत असणारे काम होत असल्याने समाधान वाटते. त्यामुळे मी नारंगीसाठी दुप्पट निधी देईन अशी ग्वाही त्यांनी दिली.

तसेच नारंगी स्वतंत्र ग्रामपंचायत करण्याचे खरे श्रेय हे दातार काकांचे आहे. काम करणार्‍यांकडून चुका होतात. पण प्रामाणिकपणा ठेवला तर त्याला वेगळी धार येते. खारेपाटातील नाट्य संस्कृती टिकवली पाहिजे. भजन स्पर्धांचे आयोजन करुन ग्रामीण भागातील नाट्य संस्कृती शहरात गेली पाहिजे अशी अपेक्षाही जयंत पाटलांनी व्यक्त केली. मते येतात जातात पण आपण केलेले काम कायम राहते. गेल्या काही वर्षात शेकाप पक्षाने अलिबाग तालुक्यात प्रचंड काम केले आहे. त्यामुळे आता काम केले नाही तरी शेकापक्षाचाच आमदार येईल अशी परिस्थिती असल्याचा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला.