शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
3
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
4
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
5
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
6
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
7
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
8
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
9
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
10
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
11
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
12
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
13
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
14
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
15
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
16
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
17
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
18
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
19
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
20
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज

पाघोळी विहीर योजना

By admin | Updated: July 25, 2015 04:00 IST

रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलस्वराज्य टप्पा - दोन अंतर्गत पाऊस पाणी संकलन म्हणजेच पाघोळी विहीर योजना आखण्यात आली आहे

आविष्कार देसाई,अलिबागरायगड जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी जलस्वराज्य टप्पा - दोन अंतर्गत पाऊस पाणी संकलन म्हणजेच पाघोळी विहीर योजना आखण्यात आली आहे. पेण तालुक्यातील ३४ गावांसाठी सुमारे तीन कोटी ३० लाख रुपयांच्या निधीची १०० टक्के मदत जागतिक बँक करणार आहे. त्यामुळे ६०० पाघोळी विहिरींच्या माध्यमातून सुमारे पाच हजार नागरिकांना शाश्वत पिण्याचे पाणी वर्षभरासाठी उपलब्ध होणार आहे.पाणीटंचाईची सर्वाधिक झळ ही पेण तालुक्याला मोठ्या प्रमाणात बसत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. जिल्ह्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी करोडो रुपयांचा दरवर्षी चुराडा होतो. हजारो मिलीमीटर पावसाची नोंद होऊनही जानेवारीच्या दुसऱ्याच आठवड्यापासून पाणीटंचाईला सुरुवात होते. पाणी ही जीवनावश्यक गरज असल्याने सरकार प्रशासनामार्फत करोडो रुपये खर्च करून नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करते. मात्र हे दुष्टचक्र सातत्याने सुरूच असून ते भेदण्यासाठी ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे सरकारच्या लक्षात आले आहे. जलस्वराज्य टप्पा क्रमांक - दोन अंतर्गत गाव, वाड्या आणि वस्त्यांवर पिण्याचे पाणी देण्यासाठी सरकारने पाऊस पाणी संकलन म्हणजेच पाघोळी विहीर योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेसाठी जागतिक बँक १०० टक्के अर्थसहाय्य करणार आहे.जलस्वराज्य टप्पा क्रमांक - दोन अंतर्गत एकूण ६३ गावांचा समावेश आहे. त्यापैकी पेण तालुक्यातील ३४ गावांचा समावेश पाघोळी विहीर योजनेसाठी करण्यात आला आहे. त्यानंतर इतर टंचाईग्रस्त तालुक्यातील गावांचा समावेश करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी दिली. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी ही योजना उत्तम असून वर्षभर पिण्याचे पाणी याद्वारे उपलब्ध होईल, असे साळुंखे यांनी सांगितले.