शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

बचतगटाच्या माध्यमातून कापडी पिशव्यांचा उद्योग, पर्यावरण -हास रोखणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 03:43 IST

प्लास्टिकचा भस्मासुर दिवसेंदिवस वाढतच आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाला हानी पोहोचून निर्सगाला संकटात लोटण्याचे काम सध्या सुरू आहे; परंतु वेळ आली की, निर्सग आपल्यावर काहीच घेत नाही.

- आविष्कार देसाई ।अलिबाग : प्लास्टिकचा भस्मासुर दिवसेंदिवस वाढतच आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाला हानी पोहोचून निर्सगाला संकटात लोटण्याचे काम सध्या सुरू आहे; परंतु वेळ आली की, निर्सग आपल्यावर काहीच घेत नाही. आपत्ती, भूकंप, त्सुनामी, वादळ, ज्वालामुखी अशा विविध माध्यमांतून तो मानवाला त्याची परतफेड करत असतो, हे रोखायचे कसे? या विचारात असतानाच एका मैत्रिणीने कापडी पिशव्या माझ्या पुढ्यात ठेवल्या आणि बस्स... उपाय सुचला, असे फॅशन डिझायनर असलेल्या अलिबागमधील प्रार्थना नागवेकर यांनी सांगितले.ड्रेस डिझायनिंगचा व्यवसाय करायचा सोडून कापडी पिशव्या बनवण्याचा उद्योग त्यांनी सुरू केला आहे. प्लास्टिकला रोखायचे असेल, तर त्याला कापडी पिशवी हाच पर्याय असल्याचे त्यांना उमगले. त्यांनी प्रार्थना जेएलजी या नावाने महिलांचा बचतगट स्थापन केला.अलिबाग येथे त्यांनी सुरू केलेल्या छोटेखानी कारखान्यामध्ये १४ महिलांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. त्या महिलांना स्वाभिमानाने जगण्याला व्यासपीठ दिले आहे. स्वत:चा कोणताच आर्थिक स्रोत नसणाºया या महिला आता महिन्याला पाच हजार रुपये कमवतात. ड्रेस डिझायनर म्हणून त्यांना या क्षेत्रामध्ये बक्कळ पैसा कमावता आला असता. मात्र, पैसा हे एकच ध्येय न ठेवता राष्ट्रहितासाठी प्लास्टिकला हद्दपार करण्याचा त्यांचा प्रयत्न वाखणण्या सारखाच असल्याचे दिसून येते.प्रार्थना यांची मैत्रीण अर्पणा पाटील यांनी त्यांच्यासमोर अचानकपणे एके दिवशी कापडी पिशव्या समोर ठेवल्या. त्यानंतर त्यांनी या माध्यमातूनच प्लास्टिकला पर्याय देण्याची तयारी सुरू केली. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने ते निर्सगाला आणि पर्यायाने मानवालाही घातक आहे. आपल्या लहानपणी दळण आणण्यासाठी आई कापडी पिशवीच देत होती. त्या वेळी सर्रासपणे आपण कापडी पिशव्यांचाच वापर करायचो, असे प्रार्थना यांनी सांगितले.विविध आकाराच्या, रंगाच्या, चैन लावलेल्या, हॅण्डल असलेल्या कापडी पिशव्यांची निर्मिती करण्यावर भर दिला. दीड रुपयांपासून ते साडेचार रुपयांपर्यंत पिशव्या उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. महिन्याला पाच हजार पिशव्या बनवल्या जातात; परंतु हा आकडा ज्या वेगाने मार्केटमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या येतात त्यापेक्षा किती, तरी कमी आहे. जनजागृतीच्या माध्यमातून प्लास्टिकचा वापर निश्चितच कमी करता येण्यासारखा असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रहितासाठी प्लास्टिक वापरणार नाही, याची खुणगाठ प्रत्येकाने आपल्या मनाशी बांधल्यास निसर्गाच्या प्रकोपापासून आपण वाचू शकतो.

टॅग्स :Raigadरायगड