शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

तीन तालुक्यांत नुकसानीचा सर्व्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 00:16 IST

यंदाच्या खरीप हंगामात परतीच्या पावसाने भात पिकांना फटका दिला.

- जयंत धुळप अलिबाग : यंदाच्या खरीप हंगामात परतीच्या पावसाने भात पिकांना फटका दिला. दुष्काळी गावांचे सत्यमापन (ग्राउंड ट्रूथ) करण्याच्या सूचना राज्याच्या कृषी विभागाला देण्यात आल्या असून राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत कळवले आहे. रायगड जिल्ह्यातील माणगाव आणि सुधागड या दोन तालुक्यांना तर शेजारी रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यास ‘गंभीर स्वरूपाच्या दुष्काळा’ची झळ बसली आहे. श्रीवर्धन तालुक्यास मध्यम स्वरूपाच्या दुष्काळाची झळ बसली आहे.शासनाच्या महाराष्ट्र सुदुर संवेदन यंत्रणेकडून (एमआरएसएसी) राज्याच्या कृषी आयुक्तालयास प्राप्त झालेल्या सप्टेंबर २०१८ अखेरच्या अहवालानुसार दुष्काळाची दुसरी झळ लागू झालेल्या तालुक्यांत राज्यातील ३२ जिल्ह्यातील ११२ तालुक्यांत गंभीर स्वरूपाच्या दुष्काळाची झळ तर ६० तालुक्यांना मध्यम स्वरूपाच्या दुष्काळाची झळ लागू झालीआहे.दुष्काळी परिस्थितीची पाहणीसाठी केंद्र सरकारची महालॅनोबीस नॅशनल सेंटर फॉर क्रॉप फोरकास्टिंग (एमएनसीएफ) ही संस्था कार्यरत आहे. पाहणी पथकास बोलावून रायगडमधील नुकसानीची पाहणी करून जिल्ह्यातील आपदग्रस्त शेतकºयांना अधिकाधिक नुकसानभरपाई मिळावी याकरिता जिल्हा प्रशासनाने पावले उचलावीत, अशी मागणी श्रमिक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयक राजन भगत यांनी पंधरा दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाकडे केली होती.राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करण्याचे निकष शिथिल केले असून, खरीप पेरणीत आॅगस्टअखेर सरासरीपेक्षा ३३.३३ टक्क्यांची घट झाल्यास दुष्काळ तर ५० टक्क्यांपेक्षा कमी पेरणी झाल्यास गंभीर दुष्काळ असा असलेला निकष बदलून आता पेरणीत सरासरीच्या तुलनेत १५ टक्के घट झाली तर दुष्काळ आणि सरासरीच्या तुलनेत २५ टक्के पेक्षा घट झाल्यास गंभीर दुष्काळ असे करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर ही मागणी श्रमिक मुक्ती दलाने केली होती.कृषी आयुक्तालयाकडून आलेल्या आदेशांमुळे या मागणीत तथ्य असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. रायगडमधील माणगाव तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात १३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर ३५ हजार खातेदार शेतकºयांनी पेरणी केली होती. त्यापैकी सुमारे ३५० हेक्टर क्षेत्रातील १२०० शेतकºयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल असल्याची माहिती माणगाव तालुका कृषी अधिकारी पी.बी.नवले यांनी दिली आहे.भातशेती पीक नुकसानीचे संयुक्त पंचनामे कृषी व महसूल विभागाच्या माध्यमातून अद्याप सुरू असून, येत्या आठवडाभरात पंचनामे पूर्ण झाल्यावर नेमकी नुकसानी किती हे स्पष्ट होईल, असे नवले यांनी पुढे सांगितले.>श्रीवर्धनमध्ये पिकांचे नुकसानमध्यम स्वरूपाची दुष्काळ झळ लागून श्रीवर्धन तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात १ हजार ३२४ हेक्टर क्षेत्रात भाताची तर १६८ हेक्टर क्षेत्रावर नाचणीची पेरणी करण्यात आली होती. या क्षेत्रातील एकूण खातेदार शेतकरी ६ हजार आहेत. एकूण पेरणी क्षेत्रापैकी २.६५ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले असून त्याचा फटका आठ शेतकºयांना बसला आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर गावांचे सत्यमापन करण्याच्या प्राप्त आदेशानुसार सुधागड तालुक्यात ८ गावांचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याची माहिती श्रीवर्धन कृषी अधिकारी शिवाजी भांडवलकर यांनी दिली.