शहरं
Join us  
Trending Stories
1
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
2
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
3
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
4
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
5
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
6
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
7
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
8
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
9
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
10
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
11
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Rohini Acharya : "मला घाणेरड्या शिव्या दिल्या, मारायला चप्पल उचलली, आई-वडिलांना..."; रोहिणी यांची भावुक पोस्ट
13
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
14
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
15
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
16
अ‍ॅसिड फेकलं, छतावरुन ढकललं; 'तो' वाद टोकाला गेला, नवरा थेट बायकोच्या जीवावर उठला
17
Mumbai: वाकोला ते बीकेसी उन्नत मार्गाचे ८० टक्के काम पूर्ण; लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार!
18
गोरखपूरमध्ये उभारलं जातंय जागतिक दर्जाचे विज्ञान उद्यान; योगी सरकारने घेतला मोठा निर्णय
19
National Jamboree: ६१ वर्षांनंतर लखनौत ऐतिहासिक 'राष्ट्रीय जंबोरी'; ३२,००० हून अधिक स्काउट्स होणार सहभागी
20
घरबसल्या पैसे दुप्पट कसे होतील? तेजस्वी प्रकाशने सांगितला फॉर्म्युला, मुलींना दिला आर्थिक सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये पावसाचा तीन दिवसांचा रेड अलर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2020 23:36 IST

रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भाग, नदी किनारील गावे, खाडी किनाऱ्यावरील गावे आणि संभाव्य दरडग्रस्त गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

अलिबाग : मुसळधार पर्जन्यवृष्टी आणि सोसाट्यांचा वारा असा मान्सूनचा झंझावात १४ ते १६ जुलैपर्यंत तीन दिवस असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.रायगड जिल्ह्यातील किनारपट्टी भाग, नदी किनारील गावे, खाडी किनाऱ्यावरील गावे आणि संभाव्य दरडग्रस्त गावांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे. नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि स्थानिक पातळीवरील सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे वातावरण आहे. मंगळवारी सायंकाळी५ वाजल्यानंतर पावसाचा जोर वाढला आहे. पावसाने मुसळधार सुरुवात केली आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार १६ जुलैपर्यंत पावसाचे प्रमाण अधिक असणार आहे. जिल्ह्यातील महत्त्वाच्या सावित्री, पाताळगंगा, कुंडलिका, काळ, भोगावती, उल्हास, गाढी या नद्यांच्या पातळीत वाढ झालेली नव्हती, त्यामुळे धोकादायक स्थिती उशिरापर्यंत नव्हती. रायगड जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी २८.०५ मिमी पाऊस झाला, तसेच १ जूनपासून मंगळवार अखेर एकूण सरासरी ११३८.४५ मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

टॅग्स :Raigadरायगड