शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

राजापुरी बंदर परिसरात तीन होड्यांना आग; मच्छीमार जाळीही खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 22:52 IST

चंद्रकांत बाळोजी आंबटकर यांची ‘धनसागर’ ही सहा सिलिंडरची बोट नादुरुस्त झाल्याने दुरुस्तीकरिता किनाºयावर उभी होती

आगरदांडा : मुरूड तालुक्यातील जंजिरा किल्ल्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या राजापुरी बंदराजवळ दुरुस्तीसाठी बोटी किनाºयावर उभ्या करण्यात आल्या होत्या. मात्र यातील तीन बोटींना तसेच मच्छीमार जाळ्यांना आग लागून तब्बल ३७,२८,००० रुपयांचे नुकसान झाल्याने मच्छीमारांवर आर्थिक संकट ओढावले आहे.

राजापुरी बंदराजवळ ‘सागरकन्या’, ‘जयवंती’, ‘धनसागर’ या तीन बोटी नादुरुस्त झाल्याने दुरस्तीकरिता किनाºयावर आणल्या होत्या. त्या तीनही होड्यांना व बाजूला असणारे जाळे यांना बुधवारी मध्यरात्री २.४५ च्या सुमारास अचानक आग लागली. यात बोटी, जाळी खाक झाली असून लाखोंचे नुकसान झाले आहे.

मुरूड राजापुरी ग्रामपंचायत हद्दीत राहणारे पद्मा बाळोजी दिघीकर यांच्या नावावर असणारी ‘सागरकन्या’ ही सहा सिलिंडरची बोट नादुरुस्त झाल्याने दुरुस्तीकरिता किनाºयावर आणली होती. दुरुस्तीचे काम सुरू असताना, मध्यरात्री अचानक आग लागल्याने तब्बल ७,५०,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. याच बोटीच्या बाजूला गोविंद केशव मढवी यांची ‘जयवंती’ ही दोन सिलिंडरची बोट दुरुस्तीकरिता आणली होती. ही बोटही खाक झाल्याने २,६८,००० रुपयांचे नुकसान झाले आहे.

चंद्रकांत बाळोजी आंबटकर यांची ‘धनसागर’ ही सहा सिलिंडरची बोट नादुरुस्त झाल्याने दुरुस्तीकरिता किनाºयावर उभी होती. त्याच दरम्यान त्या बोटीला आग लागून ५,००,००० रुपयांचे नुकसान झाले आहे.

या सर्व बोटींच्या खालच्या बाजूस जयेश गजानन भटीकर, चंद्रकांत पद्मा मोनाक, चिंतामण पांडुरंग बाणकोटकर, विलास पद्मा मोनाक, दामोदर रामचंद्र बाणकोटकर, दीनानाथ चांग्या नागुटकर, प्रकाश मधुकर मोने, भास्कर बाळोजी कुडगावकर, गुरूदास चांग्या नागुटकर, हेमंत लक्ष्मण आंबटकर, प्रदीप रामचंद्र पाटील याची मासेमारीसाठी वापरण्यात येणारी निरनिराळी जाळीही आगीत भस्मसात झाली आहेत.रात्रीची वेळ असल्याने किती ग्रामस्थांचे नुकसान झाले, हे नेमके समजले नसून आकडा वाढण्याची शक्यता आहे. महादेव दिघीकर यांनी मुरूड पोलीस ठाण्यात तक्रार केली असून साहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार तपास करीत आहेत. ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने अवघ्या काही मिनिटांत तीन बोटी आणि लाखो रुपये किमतीची जाळी भस्मसात झाली.

 

टॅग्स :fireआग