शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
3
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
4
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
5
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
6
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
7
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
8
Mumbai Local Train Update: वांगणी-शेलू स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड; CSMT कडे जाणारी लोकलसेवा ठप्प
9
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
10
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
11
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
12
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
13
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
14
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
15
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग
16
नोव्हेंबरमध्ये जन्मलेल्या व्यक्ती म्हणजे प्रेमाचा सागर, पण पोटात ज्वालामुखी; वाचा गुण दोष!
17
Rakhi Sawant : "मी दोन्ही किडन्या विकल्या, सलमानसाठी सोन्याची अंगठी घेतली"; राखी सावंतचा धक्कादायक दावा
18
सौदी अरेबियाने घेतला मोठा निर्णय! लाखों भारतीय मुस्लिमांवर होणार थेट परिणाम; नेमकं प्रकरण काय?
19
ट्रम्पना ठेंगा! भारतात परत येतेय 'ही' ऑटो कंपनी; ४ वर्षांपूर्वी बंद केलेली फॅक्ट्री परत होणार सुरू
20
वेगाची राणी...! महाराष्ट्राची लेक, डायना पंडोले इतिहास रचणार; फेरारी क्लब चॅलेंजमध्ये भाग घेणारी पहिली भारतीय महिला रेसर

राजापुरी बंदर परिसरात तीन होड्यांना आग; मच्छीमार जाळीही खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 22:52 IST

चंद्रकांत बाळोजी आंबटकर यांची ‘धनसागर’ ही सहा सिलिंडरची बोट नादुरुस्त झाल्याने दुरुस्तीकरिता किनाºयावर उभी होती

आगरदांडा : मुरूड तालुक्यातील जंजिरा किल्ल्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या राजापुरी बंदराजवळ दुरुस्तीसाठी बोटी किनाºयावर उभ्या करण्यात आल्या होत्या. मात्र यातील तीन बोटींना तसेच मच्छीमार जाळ्यांना आग लागून तब्बल ३७,२८,००० रुपयांचे नुकसान झाल्याने मच्छीमारांवर आर्थिक संकट ओढावले आहे.

राजापुरी बंदराजवळ ‘सागरकन्या’, ‘जयवंती’, ‘धनसागर’ या तीन बोटी नादुरुस्त झाल्याने दुरस्तीकरिता किनाºयावर आणल्या होत्या. त्या तीनही होड्यांना व बाजूला असणारे जाळे यांना बुधवारी मध्यरात्री २.४५ च्या सुमारास अचानक आग लागली. यात बोटी, जाळी खाक झाली असून लाखोंचे नुकसान झाले आहे.

मुरूड राजापुरी ग्रामपंचायत हद्दीत राहणारे पद्मा बाळोजी दिघीकर यांच्या नावावर असणारी ‘सागरकन्या’ ही सहा सिलिंडरची बोट नादुरुस्त झाल्याने दुरुस्तीकरिता किनाºयावर आणली होती. दुरुस्तीचे काम सुरू असताना, मध्यरात्री अचानक आग लागल्याने तब्बल ७,५०,००० रुपयांचे नुकसान झाले आहे. याच बोटीच्या बाजूला गोविंद केशव मढवी यांची ‘जयवंती’ ही दोन सिलिंडरची बोट दुरुस्तीकरिता आणली होती. ही बोटही खाक झाल्याने २,६८,००० रुपयांचे नुकसान झाले आहे.

चंद्रकांत बाळोजी आंबटकर यांची ‘धनसागर’ ही सहा सिलिंडरची बोट नादुरुस्त झाल्याने दुरुस्तीकरिता किनाºयावर उभी होती. त्याच दरम्यान त्या बोटीला आग लागून ५,००,००० रुपयांचे नुकसान झाले आहे.

या सर्व बोटींच्या खालच्या बाजूस जयेश गजानन भटीकर, चंद्रकांत पद्मा मोनाक, चिंतामण पांडुरंग बाणकोटकर, विलास पद्मा मोनाक, दामोदर रामचंद्र बाणकोटकर, दीनानाथ चांग्या नागुटकर, प्रकाश मधुकर मोने, भास्कर बाळोजी कुडगावकर, गुरूदास चांग्या नागुटकर, हेमंत लक्ष्मण आंबटकर, प्रदीप रामचंद्र पाटील याची मासेमारीसाठी वापरण्यात येणारी निरनिराळी जाळीही आगीत भस्मसात झाली आहेत.रात्रीची वेळ असल्याने किती ग्रामस्थांचे नुकसान झाले, हे नेमके समजले नसून आकडा वाढण्याची शक्यता आहे. महादेव दिघीकर यांनी मुरूड पोलीस ठाण्यात तक्रार केली असून साहाय्यक पोलीस निरीक्षक रंगराव पवार तपास करीत आहेत. ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीची तीव्रता अधिक असल्याने अवघ्या काही मिनिटांत तीन बोटी आणि लाखो रुपये किमतीची जाळी भस्मसात झाली.

 

टॅग्स :fireआग