शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

हजारो शेतकरी नुकसानग्रस्त, गतवर्षीची भरपाई अद्याप नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 02:49 IST

अलिबाग : यंदा दिवाळीपर्यंत लांबलेला पाऊस आणि उधाणाच्या भरतीचे खारे पाणी तयार भात शेतीत घुसल्याने कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रातील ५ हजार शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे.

जयंत धुळपअलिबाग : यंदा दिवाळीपर्यंत लांबलेला पाऊस आणि उधाणाच्या भरतीचे खारे पाणी तयार भात शेतीत घुसल्याने कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यातील ३ हजार ५०० हेक्टर क्षेत्रातील ५ हजार शेतक-यांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे क्षेत्र आणि नुकसानग्रस्त शेतकरी हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत भातशेती नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम जिल्ह्यात सुरू आहे. सर्व पंचनामे प्राप्त झाल्यावरच नेमके नुकसानीचे क्षेत्र आणि नुकसानग्रस्त शेतकरी ही आकडेवारी स्पष्ट होऊ शकेल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली आहे.नुकसानग्रस्त शेतकºयांना शासकीय नियमानुसार हेक्टरी ७ हजार ५०० रुपये नुकसानभरपाई देण्यात येते; परंतु गतवर्षी जिल्ह्यातील ४७ हजार हेक्टर भातशेतीचे नुकसान होऊन त्याचा फटका तब्बल ३० हजार शेतकºयांना बसला होता. मात्र, गतवर्षीच्या नुकसानभरपाईकरिता शासकीय निधीच आला नसल्याने अद्याप गतवर्षीची नुकसानभरपाई शेतकºयांना मिळाली नसल्याने शेतकºयांमध्ये नाराजीचा सूर दिसून आला. दरम्यान, यंदा १ लाख २३ हजार हेक्टर क्षेत्रावर भातशेती लागवड करण्यात आली आहे.

पनवेल परिसरात भातकापणी व झोडणीला वेग...पनवेल : लांबलेल्या पावसामुळे उशिरा का होईना भातकापणी आणि झोडणीला आता वेग आला आहे. मान्सूनच्या परतीचा प्रवास संपल्यानंतर मळणीची कामे जोमाने सुरू आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार या वर्षी जोरदार पाऊस पडल्याने भातपीक चांगले आले होते. मात्र, आॅक्टोबरमध्ये पडलेल्या पावसाने काही प्रमाणात शेतीचे नुकसान झाले. जोमदार लोंबी परतीचा पाऊस लांबल्यामुळे खाली कोसळल्या आणि शेतीची हानी झाली. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. तरीही मिळेल तेवढे पीक घरात आणण्यासाठी त्याची लगबग सुरू आहे. त्यामुळे कित्येक ठिकाणी झोडणीची तसेच कापणीची कामे समुहाने सुरू आहेत. वास्तविक, दिवाळीपूर्वी भाताची कापणी आणि मळणी पूर्ण होत असते. या वर्षी मात्र सर्व सणांनी लवकर हजेरी लावल्याने आणि वाढीव पावसाने कापणी व त्यानंतरची कामे लांबली असल्याचे तालुक्यातील पळस्पे येथी शेतकरी चंद्रकांत भगत यांनी सांगितले. दरम्यान, कापणी, झोडणीची कामे सुरू झाल्याने डोंगरदरीत राहणाºया आदिवासींना रोजगार उपलब्ध झाला आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी