शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत झाला ‘पद्मदुर्गचा जागर’, शिवघोषाने दुमदुमला किल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 04:12 IST

छत्रपती शिवाजी महाराज यांनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी पद्मदुर्ग किल्ल्याची निर्मिती केली होती. या किल्ल्यावर हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत जागर कार्यक्रम संपन्न झाला.

- संजय करडेमुरुड-जंजिरा : छत्रपती शिवाजी महाराज यांनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी पद्मदुर्ग किल्ल्याची निर्मिती केली होती. या किल्ल्यावर हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत जागर कार्यक्रम संपन्न झाला. मुरु ड समुद्र किनाऱ्यापासून चार किलोमीटरचे सागरी अंतर पार केल्यानंतर पद्मदुर्ग किल्ल्यावर पोहचता येते. समुद्राच्या मध्यभागी असलेल्या किल्ल्यावर चहू बाजूला सागराच्या विशाल लाटा धडकत असतात.कोकण कडा मित्र मंडळ रायगड, मुरु ड नगरपरिषद, पद्मदुर्ग जागर व संवर्धन समिती, व मराठी संस्कृती प्रतिष्ठान श्रीवर्धन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘पद्मदुर्ग जागर’ कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवप्रेमींनी संपूर्ण गड फुलांनी सजवला होता. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने कार्यक्रमापूर्वी गडाची स्वच्छता करण्यात आली होती.श्रीवर्धनहून आलेली शिवपालखी वाजतगाजत पहाटे गडावर आणण्यात आली. राजपुरोहित प्रकाश स्वामी जंगम यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे राजू किर यांच्या हस्ते शिवप्रतिमेला मुद्रांचा अभिषेक करण्यात आले. मंत्राच्या घोषणेने संपूर्ण परिसर दणाणून गेला.नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांच्या हस्ते गडपूजन करून शिवप्रतिमेला जलाभिषेक केला व इतिहास अभ्यासक पराग बद्रिके यांनी शिवरायांची राजनीती व सर्वधर्मसमभावाच्या वृत्तीचे दर्शन घडविणारे व्याख्यान दिले.शिवप्रतिमेचे पूजन झाल्यावर ढोलताशांच्या गजरात गडाच्या सर्वबुरु जावरून शिवपालखी शिवगर्जनेत नेण्यात आले. कोटेश्वरी मातेचे मूलस्थान हे पद्मदुर्ग किल्ल्यात असल्याने त्याचे पूजन राजपुरोहित प्रकाशस्वामी जंगम त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दांडपट्टा, तलवारबाजी, मलखांब आदी शौर्यखेळ सादर करण्यात आले. 

टॅग्स :Raigadरायगड