शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

‘त्या’ बोटी परतल्या, रायगड जिल्ह्यातील २४२ बोटी परतल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 02:28 IST

‘ओखी’ वादळाच्या तडाख्याने केरळ आणि तामिळनाडूमधील १११ बोटी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या समुद्र किनाºयावर आढळल्या आहेत. ‘ओखी’ वादळाचा तडाखा बसण्याआधीच रायगड जिल्ह्यातील २५० पैकी २४२ बोटी या माघारी परतल्या आहेत

‘ओखी’ वादळाच्या तडाख्याने केरळ आणि तामिळनाडूमधील १११ बोटी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या समुद्र किनाºयावर आढळल्या आहेत. ‘ओखी’ वादळाचा तडाखा बसण्याआधीच रायगड जिल्ह्यातील २५० पैकी २४२ बोटी या माघारी परतल्या आहेत, तर उर्वरित आठ बोटींशी संपर्क न झाल्याने त्या समुद्रामध्येच अडकल्या आहेत. उंच लाटांमुळे उरण तालुक्यातील पाच बोटींमध्ये पाणी भरून त्या बुडाल्या होत्या. मात्र, त्यामध्ये कोणतीच जीवित हानी झालेली नाही.अलिबाग : केरळ, तामिळनाडूनंतर ‘ओखी’ वादळाने आपला मोर्चा महाराष्ट्र राज्याकडे वळवला आहे. या वादळाचा फटका कोकणसह मुंबईला बसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागाने खबरदारी घेतली आहे.सोमवार आणि मंगळवार अशा सलग दोन दिवस वादळाचा सामना करावा लागणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यानुसार सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्याचप्रमाणे वातावरणामध्ये काही अंशी तापमान वाढल्याचे जाणवत होते. समुद्राला आलेल्या भरतीच्या कालावधीमध्ये लाटा जोराने उसळत होत्या. मंगळवारी देखील वादळाचे सावट कायम राहणार असल्याने पुढील २४ तास फारच महत्त्वाचे ठरणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.रायगड जिल्ह्यातील २५० बोटी या मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रामध्ये गेल्या होत्या. त्यातील १९९ बोटी रविवारी, तर सोमवारपर्यंत ४३ अशा एकूण २४२ बोटी परतल्या आहेत. अद्यापही आठ बोटींशी संपर्क न झाल्याने त्या परतलेल्या नाहीत. आठपैकी चार बोटी या दिघी, तर उर्वरित चार बोटी या उत्तर रायगडमधील आहेत. समुद्रामध्ये खूप अंतरावर त्या मासेमारीसाठी गेल्याने त्या कव्हरेज क्षेत्रात उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यांच्याशी संपर्क साधण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त अविनाश नाखवा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून समुद्र शांत आहे. प्रवासी बोटी, मासेमारी बोटी, वॉटर स्पोर्ट्स बंद करण्यात आले आहेत. पर्यटकांना समुद्रात पोहण्यास मनाई करण्यात आली आहे. किनारी भागात सागरी पोलीस बंदोबस्त ठेवला असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झाली आहे.