शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ बोटी परतल्या, रायगड जिल्ह्यातील २४२ बोटी परतल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 02:28 IST

‘ओखी’ वादळाच्या तडाख्याने केरळ आणि तामिळनाडूमधील १११ बोटी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या समुद्र किनाºयावर आढळल्या आहेत. ‘ओखी’ वादळाचा तडाखा बसण्याआधीच रायगड जिल्ह्यातील २५० पैकी २४२ बोटी या माघारी परतल्या आहेत

‘ओखी’ वादळाच्या तडाख्याने केरळ आणि तामिळनाडूमधील १११ बोटी रत्नागिरी आणि सिंधुदुर्गच्या समुद्र किनाºयावर आढळल्या आहेत. ‘ओखी’ वादळाचा तडाखा बसण्याआधीच रायगड जिल्ह्यातील २५० पैकी २४२ बोटी या माघारी परतल्या आहेत, तर उर्वरित आठ बोटींशी संपर्क न झाल्याने त्या समुद्रामध्येच अडकल्या आहेत. उंच लाटांमुळे उरण तालुक्यातील पाच बोटींमध्ये पाणी भरून त्या बुडाल्या होत्या. मात्र, त्यामध्ये कोणतीच जीवित हानी झालेली नाही.अलिबाग : केरळ, तामिळनाडूनंतर ‘ओखी’ वादळाने आपला मोर्चा महाराष्ट्र राज्याकडे वळवला आहे. या वादळाचा फटका कोकणसह मुंबईला बसण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असल्याने आपत्ती व्यवस्थापन विभागाने खबरदारी घेतली आहे.सोमवार आणि मंगळवार अशा सलग दोन दिवस वादळाचा सामना करावा लागणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. त्यानुसार सोमवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. त्याचप्रमाणे वातावरणामध्ये काही अंशी तापमान वाढल्याचे जाणवत होते. समुद्राला आलेल्या भरतीच्या कालावधीमध्ये लाटा जोराने उसळत होत्या. मंगळवारी देखील वादळाचे सावट कायम राहणार असल्याने पुढील २४ तास फारच महत्त्वाचे ठरणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.रायगड जिल्ह्यातील २५० बोटी या मासेमारी करण्यासाठी खोल समुद्रामध्ये गेल्या होत्या. त्यातील १९९ बोटी रविवारी, तर सोमवारपर्यंत ४३ अशा एकूण २४२ बोटी परतल्या आहेत. अद्यापही आठ बोटींशी संपर्क न झाल्याने त्या परतलेल्या नाहीत. आठपैकी चार बोटी या दिघी, तर उर्वरित चार बोटी या उत्तर रायगडमधील आहेत. समुद्रामध्ये खूप अंतरावर त्या मासेमारीसाठी गेल्याने त्या कव्हरेज क्षेत्रात उपलब्ध होऊ शकत नाहीत. त्यांच्याशी संपर्क साधण्याचे सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे मत्स्य व्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त अविनाश नाखवा यांनी ‘लोकमत’ला सांगितले.जिल्ह्यात ढगाळ वातावरण असून समुद्र शांत आहे. प्रवासी बोटी, मासेमारी बोटी, वॉटर स्पोर्ट्स बंद करण्यात आले आहेत. पर्यटकांना समुद्रात पोहण्यास मनाई करण्यात आली आहे. किनारी भागात सागरी पोलीस बंदोबस्त ठेवला असल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षाकडून प्राप्त झाली आहे.