शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

जिल्ह्याच्या विकासकामांना निधी कमी पडणार नाही - ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 00:55 IST

पंचायत समिती इमारतीचा लोकार्पण सोहळा

म्हसळा : रायगड जिल्ह्यातील विकास कामांसाठी निधीची कमतरता पडणार नाही. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या पाठीमागे हिमालयासारखा खंबीरपणे उभा राहीन असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पंचायत समिती इमारतीचा लोकार्पण सोहळा आज येथे पार पडला. त्याप्रसंगी ते बाेलत हाेते.नवीन इमारतीला माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांचे नाव देण्याची मागणी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केली. तातडीने प्रस्ताव पाठवा त्याला लगेचच मंजुरी दिली जाईल अशी ग्वाहीही मुश्रीफ यांनी दिली.

विधानसभेत भाजप आणि शिवसेना यांचे मिळून १६१ आमदार निवडून आल्याने याही वेळी विराेधी बाकावर बसून काम करावे लागेल असे वाटले हाेते, परंतु राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी राज्याची सूत्रे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात दिली. त्याला काँग्रेसनेही मान्यता दिली. हे सरकार पाच वर्षे टिकेल याची खात्री देताना नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवरून सिद्ध झाले असल्याचे आवर्जून सांगितले.जिल्ह्यात आरोग्य सेवेसाठी कमीत कमी २० नवीन रुग्णवाहिका मंजूर करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे मुख्याधिकारी डॉ.पाटील यांना सूचित केले. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीना उजाळा दिला. हसन मुश्रीफ हे आघाडी सरकारमधील अभ्यासू,वजनदार आणि खास करून पवार यांच्या मर्जीतील मंत्री आहेत.गरिबांना सेवा कशी द्यावी याचा त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. त्यांच्याकडून आमच्या मोठ्या अपेक्षा आहेत, असे खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात जलजीवन कार्यक्रमांतर्गत ६०० योजनांच्या कामांना मंजुरी मिळण्यासाठी प्रस्ताव ठेवले असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार अनिकेत तटकरे, अलि कौचाली,महमदभाई मेमन,तालुकाध्यक्ष समीर बनकर,राजीप कृषी सभापती बबन मनवे,महिला व बालकल्याण सभापती गीता जाधव, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील,प्रांताधिकारी अमित शेटगे आदी उपस्थित होते.

काेराेनामुळे गेले वर्ष विकासाविना वाया गेले आहे. व्यवसाय, व्यवहार पूर्णपणे थांबले. त्यामुळे कर वसुली थांबली आणि राज्याचा अर्थसहाय्य खोळंबला. जो निधी गोळा होत होता त्यावर सरकारने आरोग्यासाठी आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी खर्च केला आहे. आता हळूहळू परिस्थिती सुधारत आहे असे मुश्रीफ यांनी सांगितले. नवीन सरकारी इमारतीत सर्वसामान्यांना सेवा मिळायला हवी आम्ही मंजूर केलेल्या नवीन योजनांचा लाभ देता येईल असे काम करावे अशा सूचना त्यांनी केल्या. कोरोना कालावधीत लोकांची खरी सेवा सरकार आणि सरकारी रुग्णालयांतील डॉक्टर,परिचारिका,वाॅर्ड बॉय,अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यासारख्या वीरांनी मेहनत घेतल्याचेही त्यांनी अधाेरेखित केले.

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफAditi Tatkareअदिती तटकरे