शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
2
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
3
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
4
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
5
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
6
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
7
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
8
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
9
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
10
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
11
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
12
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
13
'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माचं खरं नाव माहितीये? वेगळं नाव का वापरावं लागलं? म्हणाली...
14
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...
15
IAS Pawan Kumar : आईने विकले दागिने, वडिलांनी मजुरी करून शिकवलं; लेकाने IAS होऊन कष्टाचं सोनं केलं
16
"गोंद्या आला रे...पुष्पा आला रे...", बोगस मतदान रोखण्यासाठी मनसेचा कोडवर्ड; अविनाश जाधव, राजू पाटलांनी सांगितला प्लान!
17
एका घोटाळ्यामुळे ११७ वर्षांचा इतिहास संपुष्टात! 'हा' शेअर बाजार कायमचा बंद होणार; सेबीची विक्रीला मंजुरी
18
फक्त टार्गेट वाढतं, पगार नाही; कर्मचाऱ्याचा राजीनामा होतोय तुफान व्हायरल, कंपनी म्हणते...
19
"आम्ही ९ ते ५ जॉब करणाऱ्यांपेक्षा जास्त मेहनत करतो...", काजोल बरळली, म्हणाली- "आम्हाला १२-१४ तास..."
20
Raj Thackeray: तो मतदार आला की पकडलाच म्हणून समजा...! मनसेने रचला सापळा; राज ठाकरेंचे घणाघाती भाषण...

जिल्ह्याच्या विकासकामांना निधी कमी पडणार नाही - ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 00:55 IST

पंचायत समिती इमारतीचा लोकार्पण सोहळा

म्हसळा : रायगड जिल्ह्यातील विकास कामांसाठी निधीची कमतरता पडणार नाही. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या पाठीमागे हिमालयासारखा खंबीरपणे उभा राहीन असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पंचायत समिती इमारतीचा लोकार्पण सोहळा आज येथे पार पडला. त्याप्रसंगी ते बाेलत हाेते.नवीन इमारतीला माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांचे नाव देण्याची मागणी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केली. तातडीने प्रस्ताव पाठवा त्याला लगेचच मंजुरी दिली जाईल अशी ग्वाहीही मुश्रीफ यांनी दिली.

विधानसभेत भाजप आणि शिवसेना यांचे मिळून १६१ आमदार निवडून आल्याने याही वेळी विराेधी बाकावर बसून काम करावे लागेल असे वाटले हाेते, परंतु राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी राज्याची सूत्रे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात दिली. त्याला काँग्रेसनेही मान्यता दिली. हे सरकार पाच वर्षे टिकेल याची खात्री देताना नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवरून सिद्ध झाले असल्याचे आवर्जून सांगितले.जिल्ह्यात आरोग्य सेवेसाठी कमीत कमी २० नवीन रुग्णवाहिका मंजूर करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे मुख्याधिकारी डॉ.पाटील यांना सूचित केले. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीना उजाळा दिला. हसन मुश्रीफ हे आघाडी सरकारमधील अभ्यासू,वजनदार आणि खास करून पवार यांच्या मर्जीतील मंत्री आहेत.गरिबांना सेवा कशी द्यावी याचा त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. त्यांच्याकडून आमच्या मोठ्या अपेक्षा आहेत, असे खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात जलजीवन कार्यक्रमांतर्गत ६०० योजनांच्या कामांना मंजुरी मिळण्यासाठी प्रस्ताव ठेवले असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार अनिकेत तटकरे, अलि कौचाली,महमदभाई मेमन,तालुकाध्यक्ष समीर बनकर,राजीप कृषी सभापती बबन मनवे,महिला व बालकल्याण सभापती गीता जाधव, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील,प्रांताधिकारी अमित शेटगे आदी उपस्थित होते.

काेराेनामुळे गेले वर्ष विकासाविना वाया गेले आहे. व्यवसाय, व्यवहार पूर्णपणे थांबले. त्यामुळे कर वसुली थांबली आणि राज्याचा अर्थसहाय्य खोळंबला. जो निधी गोळा होत होता त्यावर सरकारने आरोग्यासाठी आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी खर्च केला आहे. आता हळूहळू परिस्थिती सुधारत आहे असे मुश्रीफ यांनी सांगितले. नवीन सरकारी इमारतीत सर्वसामान्यांना सेवा मिळायला हवी आम्ही मंजूर केलेल्या नवीन योजनांचा लाभ देता येईल असे काम करावे अशा सूचना त्यांनी केल्या. कोरोना कालावधीत लोकांची खरी सेवा सरकार आणि सरकारी रुग्णालयांतील डॉक्टर,परिचारिका,वाॅर्ड बॉय,अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यासारख्या वीरांनी मेहनत घेतल्याचेही त्यांनी अधाेरेखित केले.

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफAditi Tatkareअदिती तटकरे