शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या विकासकामांना निधी कमी पडणार नाही - ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 00:55 IST

पंचायत समिती इमारतीचा लोकार्पण सोहळा

म्हसळा : रायगड जिल्ह्यातील विकास कामांसाठी निधीची कमतरता पडणार नाही. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या पाठीमागे हिमालयासारखा खंबीरपणे उभा राहीन असे प्रतिपादन राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या पंचायत समिती इमारतीचा लोकार्पण सोहळा आज येथे पार पडला. त्याप्रसंगी ते बाेलत हाेते.नवीन इमारतीला माजी मुख्यमंत्री दिवंगत बॅरिस्टर ए.आर.अंतुले यांचे नाव देण्याची मागणी रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केली. तातडीने प्रस्ताव पाठवा त्याला लगेचच मंजुरी दिली जाईल अशी ग्वाहीही मुश्रीफ यांनी दिली.

विधानसभेत भाजप आणि शिवसेना यांचे मिळून १६१ आमदार निवडून आल्याने याही वेळी विराेधी बाकावर बसून काम करावे लागेल असे वाटले हाेते, परंतु राष्ट्रीय नेते शरद पवार यांनी राज्याची सूत्रे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातात दिली. त्याला काँग्रेसनेही मान्यता दिली. हे सरकार पाच वर्षे टिकेल याची खात्री देताना नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीवरून सिद्ध झाले असल्याचे आवर्जून सांगितले.जिल्ह्यात आरोग्य सेवेसाठी कमीत कमी २० नवीन रुग्णवाहिका मंजूर करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे मुख्याधिकारी डॉ.पाटील यांना सूचित केले. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीना उजाळा दिला. हसन मुश्रीफ हे आघाडी सरकारमधील अभ्यासू,वजनदार आणि खास करून पवार यांच्या मर्जीतील मंत्री आहेत.गरिबांना सेवा कशी द्यावी याचा त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. त्यांच्याकडून आमच्या मोठ्या अपेक्षा आहेत, असे खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यात जलजीवन कार्यक्रमांतर्गत ६०० योजनांच्या कामांना मंजुरी मिळण्यासाठी प्रस्ताव ठेवले असल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. याप्रसंगी आमदार अनिकेत तटकरे, अलि कौचाली,महमदभाई मेमन,तालुकाध्यक्ष समीर बनकर,राजीप कृषी सभापती बबन मनवे,महिला व बालकल्याण सभापती गीता जाधव, मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.किरण पाटील,प्रांताधिकारी अमित शेटगे आदी उपस्थित होते.

काेराेनामुळे गेले वर्ष विकासाविना वाया गेले आहे. व्यवसाय, व्यवहार पूर्णपणे थांबले. त्यामुळे कर वसुली थांबली आणि राज्याचा अर्थसहाय्य खोळंबला. जो निधी गोळा होत होता त्यावर सरकारने आरोग्यासाठी आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी खर्च केला आहे. आता हळूहळू परिस्थिती सुधारत आहे असे मुश्रीफ यांनी सांगितले. नवीन सरकारी इमारतीत सर्वसामान्यांना सेवा मिळायला हवी आम्ही मंजूर केलेल्या नवीन योजनांचा लाभ देता येईल असे काम करावे अशा सूचना त्यांनी केल्या. कोरोना कालावधीत लोकांची खरी सेवा सरकार आणि सरकारी रुग्णालयांतील डॉक्टर,परिचारिका,वाॅर्ड बॉय,अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्यासारख्या वीरांनी मेहनत घेतल्याचेही त्यांनी अधाेरेखित केले.

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफAditi Tatkareअदिती तटकरे