शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

बाणकोट खाडीपुलाची अजूनही प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2019 01:55 IST

तांत्रिक अडचणी असल्याने आठ वर्षांत काम अपूर्णच : रायगड - रत्नागिरी जिल्हे जोडणारा पूल ठरणार विकासाचा दुवा

गणेश प्रभाळे 

दिघी : श्रीवर्धन तालुक्याचा विकास या दृष्टिकोनातून अनेक विकसित कामाची बांधणी केली गेली आहे. त्याच विचाराने कोकण किनारपट्टीच्या बागमांडला आणि केळशी दरम्यानच्या बाणकोट खाडीवर वरळी-सी लिंकप्रमाणे बांधण्यात येणाऱ्या पुलाची प्रतीक्षा आणखी किती वर्षे करावी लागणार आहे, असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारला जात आहे.

रायगड व रत्नागिरी या दोन जिल्ह्यांना जोडणाºया महत्त्वपूर्ण पुलाची गेली आठ वर्षे या ना त्या कारणाने कामात चालढकल होत आहे. बाणकोट पुलाचे काम सध्या बंद स्थितीत आहे. सुरुवातीला श्रीवर्धन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असणारा हा पूल सध्या ठाणे खाडी विभागाकडे आहे. सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर या कंपनीकडून पूल बांधण्यात येत आहे. या सागरी सेतूचे भूमिपूजन नोव्हेंबर२०१२ मध्ये झाले. मे २०१६ मध्ये या पुलाचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप काम पूर्ण झाले नाही. सर्वात आधी बांधण्यात येणारा बाणकोट खाडीवरील हा सेतूसाठीचा अंदाजित खर्च १८२ कोटी रुपये इतका आहे. सद्यस्थितीत बांधकामाचा कालावधी आणखी वाढल्याने खर्च देखील वाढणार आहे. हा पूल पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आहे.या सेतूमुळे रायगड व रत्नागिरी जिल्हे सागरी मार्गाने जोडले जातील, शिवाय जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय, निर्यात वाढीला चालना मिळणार आहे. कोकण किनारपट्टीलगत सागरी महामार्ग आहे. मात्र, अनेक ठिकाणी आवश्यकतेनुसार पुलांची उपलब्धता नसल्यामुळे वाहतूक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ वरून होते. त्याचा परिणाम मुंबई-गोवा महामार्गावर होतो. वाहतुकीचा बोजा वाढून अपघातांचे प्रमाणही या महामार्गावर वाढले आहे. शिवाय वेळ आणि इंधनाचा अपव्ययही होत आहे. या पुलामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक अधिक सुलभ होणार आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना लाभलेल्या विस्तीर्ण सागरीकिनाºयाला लागून असणाºया महामार्गावर पूल उभारून सागरी महामार्गाचा विस्तार करण्यात येत आहे. प्रामुख्याने या पुलाचा वापर रत्नागिरी जिल्हा, बाणकोट खाडीमार्गे पर्यटक व नागरिकांना श्रीवर्धन, दिवेआगर, मुरुड, अलिबाग या ठिकाणी जाण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे .गेल्या आठ वर्षांतल्या घडामोडीनोव्हेंबर २०१२ मध्ये बाणकोट खाडीपुलाचे भूमिपूजनप्रसंगी सीआरझेड परवानगी नव्हती मात्र, त्यावेळी परवानगी मिळवण्याची प्रक्रिया सुरु होती, परवानगी मिळण्यापूर्वीच भूमिपूजनझाले होते. परवानगी मिळाल्यानंतर बांधकामास सुरुवात झाली. २०१६ मध्ये बाणकोट खाडी पुलाला रॉयल्टीची आडकाठी झाली.महसूलकडून दंडाची नोटीस, अपील पडून, कोट्यवधीचा प्रकल्प लांबणीवर गेला. बाणकोट पुलाचे काम हे पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन होत असल्याने मे २०१६ पासून आणखी मुदतवाढ मिळाली आहे.बाणकोट खाडीवरील या सेतूसाठीचा अंदाजित खर्च १८२ कोटी रुपये इतका आहे. मात्र, बांधकामाचा कालावधी आणखी वाढल्याने खर्च देखील अंदाजे २०० कोटीहून अधिक वाढल्याने काम रखडले.बाणकोट खाडीवरील पुलाचे फायदेच्रायगड-रत्नागिरी जिल्हे सागरी महामार्गाने जोडले जाणार. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड या तालुक्याच्या परिसरातील बाणकोट, केळशी आदी ठिकाणी मिळणारे बॉक्साइड रायगड जिल्ह्यातील दिघी बंदरातून निर्यात करणे शक्य होईल. त्यामुळे परकीय चलनात मोठ्या प्रमाणात वाढ होईल.च्रायगड जिल्ह्यातून रत्नागिरी, सिंधुदुर्गकडे जाणाºया पर्यटकांना मंडणगड, दापोलीमार्गे सर्वात जवळचा पर्यायी मार्ग उपलब्ध होईल. त्यामुळे प्रवासाचे अंतर ६० किमीने कमी झाल्याने प्रवासाच्या वेळेत आणि इंधनामध्ये मोठ्या प्रमाणात बचत होईल.पुलाची वैशिष्ट्येच्पुलाचे मध्यवर्ती गाळ्यांचे बांधकाम बांद्रा-वरळी सी-लिंक पुलासारखे केबल स्टे या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असल्याने पर्यटकांसाठी आकर्षण.च्पुलाची लांबी१३७५ मीटरच्जोडरस्त्यासह पुलाची लांबी १८३७मीटरच्पुलाची रुंदी१२.५० मीटरच्पुलाच्या मध्यवर्ती गाळ्यांमधून नेव्हिगेशन वाहतुकीची सोय.च्पूल पाइल फाउंडेशनवर आधारित आहे.

टॅग्स :Raigadरायगड