शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

जिल्ह्यात केवळ दोनच भातखरेदी केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 02:54 IST

शेतकरी चिंताग्रस्त : एकूण २४ केंद्रांना सरकारकडून मंजुरी

अलिबाग : आधारभूत किमतीत भात खरेदी योजनेअंतर्गत जिल्हा मार्के टिंग फेडरेशनच्या माध्यमातून भातखरेदी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, जिल्ह्यातील २४ केंद्रांपैकी केवळ दोनच भातखरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. या दोन केंद्रांवर केवळ ६४ क्विंटल भाताची खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांकडील भात लवकरात लवकर खरेदी करणे गरजेचे आहे. १७७० रुपये प्रति क्विंटल असा भातखरेदी दर निश्चित करण्यात आला असून, शेतकºयांची आॅनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे.

रायगड जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत खरीप व रब्बी पणन हंगाम २०१८-१९ मध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, खालापूर, कर्जत, सुधागड, महाड, माणगाव, रोहा, श्रीवर्धन, पोलादपूर या तालुक्यांतील मंजूर धानखरेदी केंद्रावर खरेदी केंद्र सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गेल्या २६ आॅक्टोबर रोजी दिल्या आहेत. जिल्हा मार्केटिंग अधिकारी रायगड यांच्याकडील कर्जत तालुक्यात नेरळ, कशेळे, कळंब, कर्जत, वैजनाथ, कडाव, श्रीवर्धन-रानिवली, पनवेल-पनवेल, पेण-पेण, वाशी, वडखळ, महाड-वसाप, पोलादपूर-पोलादपूर, खालापूर-चौक, माणगाव-माणगाव, तळेगाव, सुधागड-पाली, परळी, पेडली, झाप, नांदगाव, अलिबाग-शिरवली, रोहा-यशवंतखार, रोहा अशा २४ केंद्रांवर भात खरेदी होणार आहे. त्यासाठी शेतकºयांना आॅनलाइन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे. २६ आॅक्टोबर रोजी सूचना दिल्या असल्या, तरी केवळ सुधागड तालुक्यातील परळी आणि पाली या दोनच भात खरेदी-विक्री कें द्रांवर भात खरेदी प्रत्यक्ष सुरू झाली आहे.परळी येथील भातखरेदी केंद्रावर चार शेतकºयांनी ४१ क्विंटल ९१ किलो तर पाली भातखरेदी कें द्रावर तीन शेतकºयांनी २२ क्विंटल ९३ किलो भातविक्रीसाठी आणले होते. अद्यापपर्यंत केवळ ६४ क्विंटल ८४ किलो भाताची खरेदी झाली आहे. पेण येथे लवकरच भातखरेदी सुरू होणार आहे, असे असले तरी जिल्ह्यात खरीप हंगामातील भाताच्या राशी शेतकºयांच्या अंगणात साठत आहेत. कमी पावसामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकºयांच्या भाताची तातडीने खरेदी होऊ न त्यांना त्यांच्या भाताचा योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील भातखरेदी केंद्रे तातडीने सुरू होण्याची आवश्यकता आहे, अन्यथा शेतकºयांना अल्पदरात भात व्यापाºयांना विकण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.रामराजमध्ये हवे भातखरेदी केंद्रच्अलिबाग तालुक्यातील रामराज परिसरात मोठ्या प्रमाणात भाताचे उत्पादन होते. मात्र, या भागात एकही भात खरेदी केंद्र नाही. अलिबाग तालुक्यात खारेपाटातील शिरवली हे एकमेव भात खरेदी केंद्र आहे.च् रामराज ते शिरवली यांच्यात सुमारे ३० ते ४० किलोमीटरचे अंतर आहे. रामराज परिसरातील शेतकºयांकरिता भात खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी काही शेतकºयांनी प्रयत्न सुरू केले आहेत. 

टॅग्स :alibaugअलिबागRaigadरायगड