शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

जिल्ह्यात केवळ दोनच भातखरेदी केंद्र सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 02:54 IST

शेतकरी चिंताग्रस्त : एकूण २४ केंद्रांना सरकारकडून मंजुरी

अलिबाग : आधारभूत किमतीत भात खरेदी योजनेअंतर्गत जिल्हा मार्के टिंग फेडरेशनच्या माध्यमातून भातखरेदी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, जिल्ह्यातील २४ केंद्रांपैकी केवळ दोनच भातखरेदी केंद्रे सुरू झाली आहेत. या दोन केंद्रांवर केवळ ६४ क्विंटल भाताची खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांकडील भात लवकरात लवकर खरेदी करणे गरजेचे आहे. १७७० रुपये प्रति क्विंटल असा भातखरेदी दर निश्चित करण्यात आला असून, शेतकºयांची आॅनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे.

रायगड जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत खरीप व रब्बी पणन हंगाम २०१८-१९ मध्ये रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल, खालापूर, कर्जत, सुधागड, महाड, माणगाव, रोहा, श्रीवर्धन, पोलादपूर या तालुक्यांतील मंजूर धानखरेदी केंद्रावर खरेदी केंद्र सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गेल्या २६ आॅक्टोबर रोजी दिल्या आहेत. जिल्हा मार्केटिंग अधिकारी रायगड यांच्याकडील कर्जत तालुक्यात नेरळ, कशेळे, कळंब, कर्जत, वैजनाथ, कडाव, श्रीवर्धन-रानिवली, पनवेल-पनवेल, पेण-पेण, वाशी, वडखळ, महाड-वसाप, पोलादपूर-पोलादपूर, खालापूर-चौक, माणगाव-माणगाव, तळेगाव, सुधागड-पाली, परळी, पेडली, झाप, नांदगाव, अलिबाग-शिरवली, रोहा-यशवंतखार, रोहा अशा २४ केंद्रांवर भात खरेदी होणार आहे. त्यासाठी शेतकºयांना आॅनलाइन पद्धतीने नोंदणी करावी लागणार आहे. २६ आॅक्टोबर रोजी सूचना दिल्या असल्या, तरी केवळ सुधागड तालुक्यातील परळी आणि पाली या दोनच भात खरेदी-विक्री कें द्रांवर भात खरेदी प्रत्यक्ष सुरू झाली आहे.परळी येथील भातखरेदी केंद्रावर चार शेतकºयांनी ४१ क्विंटल ९१ किलो तर पाली भातखरेदी कें द्रावर तीन शेतकºयांनी २२ क्विंटल ९३ किलो भातविक्रीसाठी आणले होते. अद्यापपर्यंत केवळ ६४ क्विंटल ८४ किलो भाताची खरेदी झाली आहे. पेण येथे लवकरच भातखरेदी सुरू होणार आहे, असे असले तरी जिल्ह्यात खरीप हंगामातील भाताच्या राशी शेतकºयांच्या अंगणात साठत आहेत. कमी पावसामुळे आधीच संकटात सापडलेल्या शेतकºयांच्या भाताची तातडीने खरेदी होऊ न त्यांना त्यांच्या भाताचा योग्य मोबदला मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील भातखरेदी केंद्रे तातडीने सुरू होण्याची आवश्यकता आहे, अन्यथा शेतकºयांना अल्पदरात भात व्यापाºयांना विकण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.रामराजमध्ये हवे भातखरेदी केंद्रच्अलिबाग तालुक्यातील रामराज परिसरात मोठ्या प्रमाणात भाताचे उत्पादन होते. मात्र, या भागात एकही भात खरेदी केंद्र नाही. अलिबाग तालुक्यात खारेपाटातील शिरवली हे एकमेव भात खरेदी केंद्र आहे.च् रामराज ते शिरवली यांच्यात सुमारे ३० ते ४० किलोमीटरचे अंतर आहे. रामराज परिसरातील शेतकºयांकरिता भात खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी काही शेतकºयांनी प्रयत्न सुरू केले आहेत. 

टॅग्स :alibaugअलिबागRaigadरायगड