शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
"एवढ्या मोठ्या शुल्कवाढीने..."; ट्रम्प यांनी फोडला H-1B व्हिसा बॉम्ब, भारतानं व्यक्त केली मोठी चिंता!
3
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
4
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
5
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
6
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
7
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
8
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
9
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
10
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
11
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
12
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
13
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
14
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
15
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
16
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
17
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
18
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
19
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
20
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल

रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यात ६० स्वयंचलित हवामान केंद्रे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 05:13 IST

पावसाचा आणि हवामानाचा अंदाज नक्षत्रावरून बांधून शेतकरी पिकांचे नियोजन करतात, परंतु अनेकदा हे अंदाज चुकल्याने पिकाचे नुकसान होते.

- जयंत धुळपअलिबाग - पावसाचा आणि हवामानाचा अंदाज नक्षत्रावरून बांधून शेतकरी पिकांचे नियोजन करतात, परंतु अनेकदा हे अंदाज चुकल्याने पिकाचे नुकसान होते. यावर मात करून शेतकऱ्यांना अचूक हवामान अंदाज आणि त्या आधारे कृषी सल्ला देण्याकरिता कृषी विभागाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांत एकूण ६० स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. यंदाच्या खरीप हंगामात स्वयंचलित केंद्राचा वापर प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येत असल्याची माहिती रायगड जिल्हा कृषी अधीक्षक पांडुरंग शेळके यांनी दिली आहे. उपग्रहाशी संलग्न ६० स्वयंचलित हवामान केंद्रात दर १० मिनिटांनी हवामानविषयक नोंदी संकलित केल्या जातात. त्यानुसार अचूक हवामान अंदाज बांधून त्यावर आधारित कृषीसल्ला शेतकºयांना देण्यात येत आहे.रायगड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती एकसमान नाही. परिणामी किनारीभागात पडणारा पाऊस आणि पूर्वेकडील डोंगरी भागातील पाऊस यामध्ये तफावत असते. महाड-पोलादपूरमध्ये अतिवृष्टी होवून सावित्री नदीला पूर येतो. त्याच वेळी उरण, पनवेल, खालापूर तालुक्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प असते. परिणामी सध्याच्या प्रचलित मंडळ स्तरावर असलेल्या पर्जन्यमापकातून प्राप्त पावसाच्या नोंदींची सरासरी काढून जिल्ह्यातील शेतकºयांकरिता देण्यात येणारा कृषी सल्ला अचूक असेलच असे सांगता येत नाही. परिणामी अनेकदा शेतकºयांच्या पिकाचे नुकसान झाल्याचे प्रसंग यापूर्वी अनेक घडले आहेत.दर १० मिनिटांनी घेतल्या जातात नोंदीया हवामान केंद्राकडून प्रत्येक तालुक्यातील ४ वेगवेगळ्या ठिकाणची दर १० मिनिटांची पर्जन्यमानाच्या नोंदीबरोबरच वाºयाचा वेग, वातावरणातील आर्द्रता ही माहितीही उपलब्ध होत आहे. याशिवाय हवामानाचे पूर्वानुमान, कीडरोगांची पूर्वसूचना यासारख्या बाबींसाठी या केंद्रांची मोठी मदत होणार आहे. लहरी पर्जन्यराज्याचा पूर्वअंदाज घेऊन आता शेती करता येणार असल्याने, पिकांच्या नुकसानीचे प्रमाण कमी होणार असल्याचा विश्वास कृषी विभागाचा आहे.

टॅग्स :weatherहवामानRaigadरायगड