शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यात ६० स्वयंचलित हवामान केंद्रे सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 05:13 IST

पावसाचा आणि हवामानाचा अंदाज नक्षत्रावरून बांधून शेतकरी पिकांचे नियोजन करतात, परंतु अनेकदा हे अंदाज चुकल्याने पिकाचे नुकसान होते.

- जयंत धुळपअलिबाग - पावसाचा आणि हवामानाचा अंदाज नक्षत्रावरून बांधून शेतकरी पिकांचे नियोजन करतात, परंतु अनेकदा हे अंदाज चुकल्याने पिकाचे नुकसान होते. यावर मात करून शेतकऱ्यांना अचूक हवामान अंदाज आणि त्या आधारे कृषी सल्ला देण्याकरिता कृषी विभागाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील १५ तालुक्यांत एकूण ६० स्वयंचलित हवामान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. यंदाच्या खरीप हंगामात स्वयंचलित केंद्राचा वापर प्रायोगिक तत्त्वावर करण्यात येत असल्याची माहिती रायगड जिल्हा कृषी अधीक्षक पांडुरंग शेळके यांनी दिली आहे. उपग्रहाशी संलग्न ६० स्वयंचलित हवामान केंद्रात दर १० मिनिटांनी हवामानविषयक नोंदी संकलित केल्या जातात. त्यानुसार अचूक हवामान अंदाज बांधून त्यावर आधारित कृषीसल्ला शेतकºयांना देण्यात येत आहे.रायगड जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती एकसमान नाही. परिणामी किनारीभागात पडणारा पाऊस आणि पूर्वेकडील डोंगरी भागातील पाऊस यामध्ये तफावत असते. महाड-पोलादपूरमध्ये अतिवृष्टी होवून सावित्री नदीला पूर येतो. त्याच वेळी उरण, पनवेल, खालापूर तालुक्यांत पावसाचे प्रमाण अत्यल्प असते. परिणामी सध्याच्या प्रचलित मंडळ स्तरावर असलेल्या पर्जन्यमापकातून प्राप्त पावसाच्या नोंदींची सरासरी काढून जिल्ह्यातील शेतकºयांकरिता देण्यात येणारा कृषी सल्ला अचूक असेलच असे सांगता येत नाही. परिणामी अनेकदा शेतकºयांच्या पिकाचे नुकसान झाल्याचे प्रसंग यापूर्वी अनेक घडले आहेत.दर १० मिनिटांनी घेतल्या जातात नोंदीया हवामान केंद्राकडून प्रत्येक तालुक्यातील ४ वेगवेगळ्या ठिकाणची दर १० मिनिटांची पर्जन्यमानाच्या नोंदीबरोबरच वाºयाचा वेग, वातावरणातील आर्द्रता ही माहितीही उपलब्ध होत आहे. याशिवाय हवामानाचे पूर्वानुमान, कीडरोगांची पूर्वसूचना यासारख्या बाबींसाठी या केंद्रांची मोठी मदत होणार आहे. लहरी पर्जन्यराज्याचा पूर्वअंदाज घेऊन आता शेती करता येणार असल्याने, पिकांच्या नुकसानीचे प्रमाण कमी होणार असल्याचा विश्वास कृषी विभागाचा आहे.

टॅग्स :weatherहवामानRaigadरायगड