शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

जेएनपीए-मुंबई स्पीड बोटीची प्रतीक्षा कायम; सेवा सुरू झाल्यावर प्रवास किती वेळात होणार? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:23 IST

दूषणविरहीत स्पीडबोटीमुळे प्रवाशांना फक्त जेएनपीए-मुंबईदरम्यान ३५ ते ४० मिनिटांत पोहोचता येणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, उरण : बहुचर्चित जेएनपीए ते गेटवेपर्यंतची सागरी प्रवासी स्पीड बोटसेवा सुरू करण्यास माझगाव डॉक कंपनीकडून तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यामुळे आणखी २०-२२ दिवसांचा कालावधी लागणार आहे. एप्रिल शेवटचा आठवडा अथवा मे महिन्यात प्रवासी वाहतूकसेवेसाठी वाट पाहावी लागणार असल्याची  माहिती जेएनपीए प्रशासन अधिकाऱ्यांनी दिली.

जेएनपीएने लाकडी प्रवासी बोटींना प्रदूषणविरहीत इलेक्ट्रॉनिक बॅटऱ्यांवर चालणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञान व सोयी सुविधांनी सुसज्ज असलेल्या स्पीडबोटींचा पर्याय निवडला आहे. प्रदूषणविरहीत स्पीडबोटीमुळे प्रवाशांना फक्त जेएनपीए - मुंबईदरम्यान ३५ ते ४० मिनिटांत पोहोचता येणार आहे. 

स्पीडबोटींचे महिनाभरापूर्वी प्रात्यक्षिक जेएनपीए ते गेटवे ऑफ इंडिया या सुमारे १० किमी सागरी अंतरापर्यंत दोन बोटींची स्पीडबोट सेवा १० वर्षांपर्यंत पुरविण्याची संपूर्ण जबाबदारी माझगाव डॉक कंपनीवर सोपविण्यात आली आहे. फेब्रुवारी २०२५पर्यंत ही स्पीडबोट प्रवासी सेवा सुरू करण्याचा इरादा जेएनपीएने जाहीर केला होता. त्यानंतर माझगाव डॉक कंपनीकडून स्पीडबोटींचे महिनाभरापूर्वी प्रात्यक्षिकही घेतले होते. मात्र, स्पीडबोट ना वेगावर ना वाहतूकीवर खरी उतरली. 

टॅग्स :Raigadरायगड