शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
5
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
6
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
7
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
8
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
9
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
10
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
11
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
12
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
13
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
14
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
15
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
16
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
17
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
18
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
19
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
20
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी

जिल्ह्यात गोंडा खातोय भाव, खरेदीसाठी झुंबड

By निखिल म्हात्रे | Updated: September 25, 2022 20:03 IST

शहरी आणि ग्रामीण भागात सध्या नवरात्रौ उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. यात्यामुळे जिल्ह्यातील निरनिराळ्रा बाजारपेठांमध्ये विविध प्रकारची फुल खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. नवरात्रात फुलांना मागणी वाढली आहे.

अलिबाग - कोणताही सण-उत्सव असो की कार्यक्रम, यामध्ये फुलांना अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यातही शोभिवंत फुले विशेष ‘भाव’ खातात. नवरात्रौत्सवात झेंडू फुलांबरोबर पिवळा गोंडा, पिवळी-पांढरी-जांभळी-दांडी शेवंती, गुलछडी, सूर्यफूल, गुलाब पाकळ्यांना अधिक मागणी असते. गेल्या वर्षी कोरोना टाळेबंदीमुळे फूल बाजार ओस पडला होता. परंतु, यंदा निर्बंध शिथिल झाल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे बाजारपेठेत पुन्हा बहर आला आहे. त्यात झेंडूच्या फुलांबरोबरच शोभीवंत फुलांचीही मागणी वाढली आहे.

शहरी आणि ग्रामीण भागात सध्या नवरात्रौ उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. यात्यामुळे जिल्ह्यातील निरनिराळ्रा बाजारपेठांमध्ये विविध प्रकारची फुल खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. नवरात्रात फुलांना मागणी वाढली आहे. याबरोबर फुलांच्या किंमती देखील वाढत आहेत. फुलांचे दर वाढल्यामुळे हारांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे ग्राहकांचा स्वस्त हार खरेदी करण्याकडे कल अधिक आहे. वाढत्या उन्हाच्या झालांमुळे माल खराब होत असल्याने मोजकाच माल आणावा लागत आहे. एकंदरीत बाजारपेठेतील अर्थचक्र किही प्रमाणात गतीमान झाले आहे.

जिल्ह्यात ठिकठिकाणी फुलांचा पुरवठा उपलब्ध करण्यासाठी फुल विक्रेत्यांना दररोज धावपळ करावी लागत आहे. वेळेचे बंधन देखील सांभाळावे लागत आहे. फुलांपासून विविध प्रकारच्या वस्तू तयार कराव्या लागतात यासाठी वेळच्यावेळी कच्चा माल तयार करावा लागतो. या सर्व वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. फुल विक्रीसाठी उभारण्यात आलेलेल्या स्टॉलसाठी जो विद्युत पुरवठा होतो याच्या दारात वाढ झाली आहे. याचा फटका विक्रेत्यांना बसला आहे. फुलांचा अधिक दिवस साठा करून ठेवणे शक्य नाही. मागील वर्षी गोंड्याची किंमत ही 60 रु. होती, आता किंमत 100 रु. झाली आहे. लहान हार गेल्या वर्षी 10रु. होता तो 25 रु. पर्यंत गेला आहे. तर 25 रुपयांची वेणी 30 रुपयांवर गेली आहे.

फुलांच्या किंमतीमध्ये वाढ झाली असली तरी छोट्या- मोठ्या स्वरूपात हा फुल विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या फुल विक्रेत्यांना सरकारने झुकते माप देणे गरजेचे आहे. सरकारी रोजनांचा लाभ त्यांना मिळणे गरजेचे आहे. याचबरोबर सरकारने महागाई कमी करण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना केली, तर फुलांच्या किंमती देखील नियंत्रणात ठेवणे शक्य होईल, असे फुल विक्रेत्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Navratriनवरात्रीFlowerफुलंMarketबाजार