शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात गोंडा खातोय भाव, खरेदीसाठी झुंबड

By निखिल म्हात्रे | Updated: September 25, 2022 20:03 IST

शहरी आणि ग्रामीण भागात सध्या नवरात्रौ उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. यात्यामुळे जिल्ह्यातील निरनिराळ्रा बाजारपेठांमध्ये विविध प्रकारची फुल खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. नवरात्रात फुलांना मागणी वाढली आहे.

अलिबाग - कोणताही सण-उत्सव असो की कार्यक्रम, यामध्ये फुलांना अनन्यसाधारण महत्त्व असते. त्यातही शोभिवंत फुले विशेष ‘भाव’ खातात. नवरात्रौत्सवात झेंडू फुलांबरोबर पिवळा गोंडा, पिवळी-पांढरी-जांभळी-दांडी शेवंती, गुलछडी, सूर्यफूल, गुलाब पाकळ्यांना अधिक मागणी असते. गेल्या वर्षी कोरोना टाळेबंदीमुळे फूल बाजार ओस पडला होता. परंतु, यंदा निर्बंध शिथिल झाल्याने बाजारात उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे बाजारपेठेत पुन्हा बहर आला आहे. त्यात झेंडूच्या फुलांबरोबरच शोभीवंत फुलांचीही मागणी वाढली आहे.

शहरी आणि ग्रामीण भागात सध्या नवरात्रौ उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. यात्यामुळे जिल्ह्यातील निरनिराळ्रा बाजारपेठांमध्ये विविध प्रकारची फुल खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. नवरात्रात फुलांना मागणी वाढली आहे. याबरोबर फुलांच्या किंमती देखील वाढत आहेत. फुलांचे दर वाढल्यामुळे हारांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे ग्राहकांचा स्वस्त हार खरेदी करण्याकडे कल अधिक आहे. वाढत्या उन्हाच्या झालांमुळे माल खराब होत असल्याने मोजकाच माल आणावा लागत आहे. एकंदरीत बाजारपेठेतील अर्थचक्र किही प्रमाणात गतीमान झाले आहे.

जिल्ह्यात ठिकठिकाणी फुलांचा पुरवठा उपलब्ध करण्यासाठी फुल विक्रेत्यांना दररोज धावपळ करावी लागत आहे. वेळेचे बंधन देखील सांभाळावे लागत आहे. फुलांपासून विविध प्रकारच्या वस्तू तयार कराव्या लागतात यासाठी वेळच्यावेळी कच्चा माल तयार करावा लागतो. या सर्व वस्तूंच्या किंमती वाढल्या आहेत. फुल विक्रीसाठी उभारण्यात आलेलेल्या स्टॉलसाठी जो विद्युत पुरवठा होतो याच्या दारात वाढ झाली आहे. याचा फटका विक्रेत्यांना बसला आहे. फुलांचा अधिक दिवस साठा करून ठेवणे शक्य नाही. मागील वर्षी गोंड्याची किंमत ही 60 रु. होती, आता किंमत 100 रु. झाली आहे. लहान हार गेल्या वर्षी 10रु. होता तो 25 रु. पर्यंत गेला आहे. तर 25 रुपयांची वेणी 30 रुपयांवर गेली आहे.

फुलांच्या किंमतीमध्ये वाढ झाली असली तरी छोट्या- मोठ्या स्वरूपात हा फुल विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या फुल विक्रेत्यांना सरकारने झुकते माप देणे गरजेचे आहे. सरकारी रोजनांचा लाभ त्यांना मिळणे गरजेचे आहे. याचबरोबर सरकारने महागाई कमी करण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना केली, तर फुलांच्या किंमती देखील नियंत्रणात ठेवणे शक्य होईल, असे फुल विक्रेत्यांचे म्हणणे आहे. 

टॅग्स :Navratriनवरात्रीFlowerफुलंMarketबाजार