शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

एसटीच्या सवलतीने खाजगी प्रवासी वाहतूक व्यवसायावर कुऱ्हाड

By निखिल म्हात्रे | Updated: March 1, 2024 16:56 IST

खाजगी प्रवासी वाहतुकीला चालना मिळाल्याने व्यवसायाचे नवीन साधन निर्माण झाले.

अलिबाग - महिलांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत लागू केल्याने एस टी च्या प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. सवलतीच्या दरात प्रवास करायला मिळत असल्याने महिला वर्गात समाधानाचे वातावरण असले तरी याचा खाजगी प्रवासी वाहतूक दारांच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. कुटुंबाचा उदर निर्वाह कसा करायचा असा प्रश्न  त्यांना पडला आहे.

एस टी ही ग्रामीण महाराष्ट्राची जीवन वाहिनी समजली जाते. काही वर्षा पूर्वी पर्यंत ग्रामीण जनतेसाठी एस टी हे एकमेव प्रवासाचे साधन होते. दुर्गम डोंगराळ भागात जिथं जिथं रस्ता पोहोचला तिथं तिथं एस टी ची प्रवासी वाहतूक सुरू झाली आणि ग्रामीण जनतेची पायपीट थांबली. पुढे खाजगी प्रवासी वाहतुकीचा पर्याय उपलब्ध झाला आणि एस टी ची प्रवासी संख्या घटली. त्याचा एस टीच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला. एस टीच्या फेऱ्या मर्यादित असल्याने ग्रामीण प्रवाशांची पावले रिक्षा, मिनीडोअर सारख्या खाजगी वाहनाकडे वळली. आणि एस टी चा प्रवास तोट्याच्या दिशेने सुरू झाला.

खाजगी प्रवासी वाहतुकीला चालना मिळाल्याने व्यवसायाचे नवीन साधन निर्माण झाले. ग्रामीण भागात प्रवासी वाहतूक करणाऱ्या तीन आणि सहा आसनी वाहनांची संख्या वाढली. अनेकांनी कर्ज काढून या व्यवसायात उडी घेतली. किमान कुटुंबाचे गुजराण करता येईल इतकी कमाई या व्यवसायातून होत होती. कोरोना सारख्या जागतिक महामारीचा फटका रिक्षा, मिनीडोअर  चालकांना बसला. लोकांना घराबाहेर पडणे मुश्किल झाले आणि हा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला. यात अनेक वाहतूक दारानी कर्ज काढून गाड्या घेतल्या होत्या कर्जाचे हप्ते फेडणे कठीण झाले. शासनाकडून देखील कुठलीच मदत किंवा सवलत मिळाली नाही त्यामुळे या व्यावसायिकांचे कंबरडेच मोडले.

कोरोना महामारीची साथ संपल्यानंतर हा व्यवसाय हळूहळू पूर्व पदावर आला असतानाच या व्यवसायावर नवीन आपत्ती येवून कोसळली. राज्य सरकारने महिला सन्मान योजने अंतर्गत महिलांना एस टी च्या प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत जाहीर केली. त्याचा विपरीत परिणाम रिक्षा मिनीडोअर व्यवसायावर झाला. एस टी च्या लाल परीला महिलांची पसंती मिळू लागली. रिक्षा मिनी डोअर कडील ओढा कमी झाला. प्रवासी संख्या घटल्याने त्यांचा व्यवसाय डबघाईला आला. अनेकांनी कर्ज काढून रिक्षा घेतल्या होत्या त्यांना कर्जाचे हप्ते फेडणे जड जाऊ लागले आहे. त्यातच डिझेलच्या दरात झालेली वाढ त्रासदायक ठरते आहे. दरवाढीमुळे प्रवासी भाड्यात वाढ करणे अपरिहार्य झाले असून प्रवाशांचा ओढा एस टी कडे वाढतो आहे. अशा स्थितीत व्यवसाय कसा सुरू ठेवायचा असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.राज्‍य सरकारने एसटी प्रवास भाडयात महिलांना ५० टक्‍के सवलत दिली आहे. त्‍यामुळे रायगडच्‍या महिलांना लालपरी अधिक लाडकी झाली आहे. रायगड जिल्‍हयात एसटीने प्रवास करणारया महिलांच्‍या संख्‍येत जवळपास ५० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. मागील साडेचार महिन्यात जिल्‍हयात  ७९ लाख ६ हजार ९२ इतक्या महिला प्रवाशांनी  या सवलत योजनेचा लाभ घेत प्रवास केला आहे.मी बँकेचे कर्ज काढून मिनीडोअर घेतली. सुरुवातीला व्यवसाय चांगला चालत होता. परंतु महिलांना एस टी प्रवासात सवलत दिल्या पासून आमच्या व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. अनेकदा डिझेलचे पैसेदेखील निघत नाहीत. बँकेचे हप्ते फेडताना नाकीनऊ येत आहेत.- प्रणव दळवी, मिनीडोअर चालक

टॅग्स :alibaugअलिबाग