शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

घारापुरी बेटाला पाणी पुरवठा करणाऱ्या एकमेव धरणाने डिसेंबरलाच गाठला तळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2023 14:16 IST

तीन गावे, व्यावसायिक, देशी-विदेशी हजारो पर्यटकांवर पाणी टंचाईचे गंभीर संकट, बोटीने पाणी पुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची ग्रामपंचायतीची मागणी 

मधुकर ठाकूर

उरण : यावर्षी पडलेल्या अपुऱ्या पावसामुळे घारापुरी बेटावरील तीन गावे, व्यावसायिक आणि दररोज बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी हजारो पर्यटकांना मे महिन्यापर्यंत पाणी पुरवठा करणाऱ्या एकमेव धरणाच्या पाण्याची पातळी डिसेंबर महिन्यातच पुरती खालावली आहे. परिणामी जग प्रसिद्ध घारापुरी बेटावर डिसेंबरपासूनच पाणी टंचाईचे संकट उभे ठाकले आहे. पर्यटक, बेटवासियांची पाणी टंचाईची समस्या दूर करण्यासाठी समुद्रमार्गे इतर ठिकाणाहून बोटीतून पाणी पुरवठा करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी घारापुरी ग्रामपंचायतीने राजिप ग्रामीण पाणीपुरवठा विभाग,  गटविकास अधिकारी, तहसीलदार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटावर राजबंदर, मोराबंदर,शेतबंदर अशी तीन गावे आहेत. या बेटावरील जगप्रसिध्द कोरीव लेण्या पाहण्यासाठी दररोज हजारो तर वर्षभरात देशी-विदेशी लाखो पर्यटक येतात. पर्यटक आधारित बेटावर स्थानिकांचे कॅन्टीन, रेस्टॉरंट आदी लघुउद्योग आहेत.या सर्वांना पाणी पुरवठा करणारे जुने एकमेव धरण आहे. धरणात साठलेले पाणी बेटावरील तीन गावे, व्यावसायिक आणि दररोज बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी हजारो पर्यटकांना ग्रामपंचायतीमार्फत पुरविण्याला जातो. दरवर्षी पाणी पुरवठा करणाऱ्या या धरणात मे महिन्याच्या अखेरपर्यंत पाणीसाठा उपलब्ध असतो. मात्र यावर्षी पावसाचे प्रमाण कमी झाले. त्यामुळे धरणात पाणीसाठाही मर्यादित शिल्लक राहिलेला आहे.

दरवर्षी मे महिन्याच्या अखेरपर्यंत शिल्लक राहणारा पाणीसाठा कमी पावसामुळे डिसेंबर महिन्याअखेरच धरणाच्या पाण्याच्या पातळीने तळ गाठला आहे. जेमतेम पुढील दोन महिने पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक असल्याने तीन गावे, व्यावसायिक आणि दररोज बेटावर येणाऱ्या देशी-विदेशी हजारो पर्यटकांना पाणी पुरवठा कसा करावा असा गंभीर प्रश्न आता घारापुरी ग्रामपंचायतीला पडला आहे. घारापुरी हे बेट असल्याने टॅकरने पाणी पुरवठा करणे शक्य नाही. ग्रामपंचायतीकडेही पाणी पुरवठा करण्यासाठी पुरेसा निधी नाही. बेटावरील पाणी टंचाई दूर करण्यासाठी समुद्रमार्गे बोटीने पाणी पुरवठा करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे बेटावरील पाणी टंचाईचे संकट दूर करण्यासाठी अत्यावश्यक सेवा म्हणून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी  घारापुरी ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच मीना भोईर, उपसरपंच बळीराम ठाकूर यांनी राजिप ग्रामीण पाणीपुरवठा विभाग,उरण गटविकास अधिकारी,उरण तहसीलदार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

टॅग्स :Waterपाणी