शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

गणेशोत्सवात कोकणवासीयांचा प्रवास विनाअपघात सुखरूप

By निखिल म्हात्रे | Updated: September 29, 2023 14:57 IST

मुंबई - गोवा महामार्गावरील रस्त्याचे रुंदीकरणाचे काम लांबल्यामुळे गेली १२ वर्षे गणेशोत्सवात भक्तांचा प्रवास त्रासदायक व वेदना दायक ठरत होता. 

अलिबाग - कोकणात गणेशोत्सवासाठी येणाऱ्या लाखो चाकरमान्यांना प्रवासात अपघातांचा वा ट्रॅफीक जॅमचा व्यत्यय येऊ नये या करीता वाहतूक पोलिसांनी मागील १० दहा दिवसांपासून कंबर कसली होती. त्यामुळे यावर्षी कोकणवासीयांचा प्रवास विनाअपघात सुखरूप झाला आहे. त्यामुळे सर्वस्तरातून वाहतूक पोलिसांची मात्र कौतुकाने पाठ थोपाटली जात आहे. मुंबई - गोवा महामार्गावरील रस्त्याचे रुंदीकरणाचे काम लांबल्यामुळे गेली १२ वर्षे गणेशोत्सवात भक्तांचा प्रवास त्रासदायक व वेदना दायक ठरत होता. 

पेण - वडखळ हा साधारणत: सात किलोमीटरचा प्रवास नेहमीच चर्चेत होता; परंतु यंदा गणेशोत्सवाकरिता मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा आणि आता परतीचा प्रवास सुरळीत होण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस दलातील पोलीस अधिकारी व कर्मचारी दिवसरात्र तैनात होते, त्यामुळे हा प्रवास सुरळीत झाला. त्यामुळे परतणाऱ्या गणेशभक्तींनी ही पोलिसांचे मनपुर्वक अभिनंदन केले.महामार्गावरील रस्ते दुरुस्तीला पावसाची उघड मिळाल्यामुळे खड्डेमय रस्त्यांचा त्रास झाला नाही. मात्र ऊन आणि रस्त्यांवरील धूळ याची तमा न बाळगता, पोलीस यंत्रणा, पोलीस मित्र आपले कर्तव्य चोख बजावताना दिसत होते. 

यामुळेच गणेशोत्सवातील प्रवास सर्व कोकणवासीयांना सुखकर वाटला.यावर्षी गणेश भक्तांची वाट सुखकर करण्यासाठी पोलिस प्रशासनाच्या मदतीला १५० स्वयंसेवक धावून आले होते. गणेशोत्सवादरम्यान होणारी वाहतूक कोंडी असो वा इतर उद्भविणारे प्रश्न असो त्यांचे निराकरण करण्यासाठी हे स्वयंसेवक महामार्गावर काम करीत होते. या स्वयंसेवकांना ओळखण्यासाठी पोलिस विभागामार्फत शिटी, पोलिस मित्र असा लोगो असणारी कॅप व टिशर्ट ही देण्यात आली होती. त्यामुळे त्यांना ओळखणे व त्यांनी सांगितलेल्या नियमांचा वाहन चालक पालक करीत असताना ही दिसून येत होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे व अप्पर पोलीस अधीक्षक अतुल ढेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली, रायगड जिल्हा वाहतूक पोलीस शाखेचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल लाड तसेच पोलीस स्टेशन व पोलीस मुख्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी काम केले. गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासातही चांगल्याप्रकारे नियोजन केल्यामुळे या प्रवासात वाहतूककोंडी व अपघातांचे प्रसंग घडले नाहीत. त्यामुळे यावर्षीचा गणेशोत्सव आनंदात साजरा झाला, हे ही तितकेच खरे.

टॅग्स :alibaugअलिबाग