शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांच्या समाधीचे पावित्र्य जपण्यात ‘पुरातत्त्व'ची बेफिकिरी

By जमीर काझी | Updated: October 17, 2022 07:50 IST

सुरक्षारक्षकांकडून ओवरीचा वापर चौकीसारखा करणे, कपडे वाळविणे, स्वच्छतागृह उभारल्याने बकालपणा आला आहे.

अलिबाग : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ले रायगडावरील समाधीचे पावित्र्य जपण्यात केंद्रीय पुरातत्त्व विभागाकडून बेफिकिरी होत असल्याचा आक्षेप इतिहास संशोधक व शिवप्रेमींनी नोंदविला आहे.

सायंकाळी सहानंतर गडावर थांबण्यास बंदी आणि ऐतिहासिक ओवरीवर श्वानाच्या पुतळ्याच्या संरक्षणासाठी पोलिसांचे चौकीस्थळ बनविल्याने नाराजी व्यक्त होत आहे. सुरक्षेच्या नावाखाली 'एएसआय' विभागाने महाराजांचा राज्याभिषेक दिन, जयंती, पुण्यतिथी वगळता गडावर राहण्यास बंदी घातली आहे.

सायंकाळी सहानंतर सुरक्षा रक्षकाव्यतिरिक्त अन्य कोणालाही तेथे थांबू दिले जात नाही. त्यामुळे दुसऱ्या दिवशी परत १,७३५ पायऱ्या चढून येणे शक्य होत नाही. त्याचबरोबर रोप वेसाठी माणसी ५०० ते ६०० रुपये खर्च करणे परवडणारे नाही. सुरक्षारक्षकांकडून ओवरीचा वापर चौकीसारखा करणे, कपडे वाळविणे, स्वच्छतागृह उभारल्याने बकालपणा आला आहे. जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी वस्तुस्थितीजनक अहवाल पाठविण्याची गरज आहे.

हा सर्व प्रकार म्हणजे महाराज, शंभुराजेंचा खरा इतिहास पुसण्यासाठीचा एका प्रवृत्तीकडून जाणीवपूर्वक प्रयत्न केला जात आहे. त्याविरुद्ध चळवळ सुरू केली असून, प्रसंगी ते रोखण्यासाठी न्यायालयातही जाण्याचा निर्धार केला आहे.डॉ. इंद्रजित सावंत, इतिहास संशोधक

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजRaigadरायगड