शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
4
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
7
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
8
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
9
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
10
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
11
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
12
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
13
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
14
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
15
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
16
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
17
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
18
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
19
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
20
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
Daily Top 2Weekly Top 5

दहा ग्रामपंचायती बिनविराेध; 848 उमेदवारांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 00:21 IST

निकालाआधीच उधळला गुलाल; एक हजार ५८८ जण निवडणूक रिंगणात

लोकमत न्यूज नेटवर्करायगड : जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ८४० जागांसाठी एक हजार ५८८ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. साेमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी तब्बल ८४८ उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. विशेष म्हणजे १० ग्रामपंचायती या बिनविराेध झाल्या आहेत. त्यामुळे निवडणुका हाेण्याआधीच या ठिकाणी गुलाल उधळण्यात आल्याने जल्लाेषाचे वातावरण आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. सुरुवातीला उमेदवारी अर्ज दाखल करताना, ८४ जागांसाठी दाेन हजार ४३६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले हाेते. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या हाेत्या. मात्र, साेमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळी ८४८ उमेदवारांनी माघार घेतली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मदत संपल्यानंतर निवडणूक विभागाचा उमेदवारांना चिन्हवाटप करण्याचा कार्यक्रम होता. मात्र, ऑनलाइन प्रक्रियेमुळे आणि इंटरनेटच्या कासवगती मुळे रात्री उशिरापर्यंत काम सुरू हाेते. ८८ ग्रामपंचायतींपैकी १० ग्रामपंचायती या बिनविराेध झाल्या आहेत. 

ग्रामपंचायतीमध्ये पुरुषांच्या बराेबरीने महिला उमेदवार रिंगणात कायद्याने ५० टक्के महिलांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे. त्यामुळे ८८ ग्रामपंचायतीमध्ये पुरुषांच्या बराेबरीने महिला उमेदवारीही निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या आहेत. राेहा, पनवेल या तालुक्यांमध्ये अनुक्रमे २१ आणि २४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका हाेत आहेत. या ठिकाणी सर्वाधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

राेहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायतीकडे जिल्ह्याचे लक्ष राेहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायतीकडे अधिक लक्ष लागण्याचे कारण म्हणजे रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या मतदार संघातील ग्रामपंचायत आहे. त्याचप्रमाणे, अलिबाग तालुक्यातील पेझारी या ग्रामपंचायतींमध्ये शेकापचेच वर्चस्व आहे, तसेच शेकापच्या बालेकिल्ल्यातील ग्रामपंचायत असल्याने सर्वांचेच लक्ष लागले आहे.

पनवेल, राेहा, कर्जत तालुक्यातून सर्वाधिक उमेदवार पनवेल, राेहा, कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार रिंगणामध्ये आहेत. पनवेल तालुक्यात २४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत २२८ जागांसाठी ४३२ उमेदवार नशीब आजमावत आहेत. राेह्यात २१ ग्रामपंचायतीच्या १९१ जागांसाठी ३७४ उमेदवार रिंगणात आहेत. कर्जतमधील ९ ग्रामपंचायतीमधील ८९ जागांसाठी १८१ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. माणगावमधील देवळी, लाखपाले, टेमपाले, महाड- भेलाेशी, आसनपाेई, पनवेल-आकुर्ली, खानावले, कर्जत-हुमगाव, श्रीवर्धन -कारीवणे, म्हसळा- काेल्टे ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

रायगड जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून ८४८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. १,५८८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १० ग्रामपंचायती या बिनविराेध झाल्या आहेत.-सर्जेराव म्हस्के पाटील, उपजिल्हाधिकारी, रायगड