शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

दहा ग्रामपंचायती बिनविराेध; 848 उमेदवारांची माघार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2021 00:21 IST

निकालाआधीच उधळला गुलाल; एक हजार ५८८ जण निवडणूक रिंगणात

लोकमत न्यूज नेटवर्करायगड : जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत ८४० जागांसाठी एक हजार ५८८ उमेदवार आपले नशीब आजमावणार आहेत. साेमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी तब्बल ८४८ उमेदवारांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. विशेष म्हणजे १० ग्रामपंचायती या बिनविराेध झाल्या आहेत. त्यामुळे निवडणुका हाेण्याआधीच या ठिकाणी गुलाल उधळण्यात आल्याने जल्लाेषाचे वातावरण आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापायला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली आहे. सुरुवातीला उमेदवारी अर्ज दाखल करताना, ८४ जागांसाठी दाेन हजार ४३६ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले हाेते. त्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या हाेत्या. मात्र, साेमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळी ८४८ उमेदवारांनी माघार घेतली. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मदत संपल्यानंतर निवडणूक विभागाचा उमेदवारांना चिन्हवाटप करण्याचा कार्यक्रम होता. मात्र, ऑनलाइन प्रक्रियेमुळे आणि इंटरनेटच्या कासवगती मुळे रात्री उशिरापर्यंत काम सुरू हाेते. ८८ ग्रामपंचायतींपैकी १० ग्रामपंचायती या बिनविराेध झाल्या आहेत. 

ग्रामपंचायतीमध्ये पुरुषांच्या बराेबरीने महिला उमेदवार रिंगणात कायद्याने ५० टक्के महिलांना प्रतिनिधित्व करण्याची संधी दिलेली आहे. त्यामुळे ८८ ग्रामपंचायतीमध्ये पुरुषांच्या बराेबरीने महिला उमेदवारीही निवडणुकीच्या आखाड्यात उतरल्या आहेत. राेहा, पनवेल या तालुक्यांमध्ये अनुक्रमे २१ आणि २४ ग्रामपंचायतीच्या निवडणुका हाेत आहेत. या ठिकाणी सर्वाधिक उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

राेहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायतीकडे जिल्ह्याचे लक्ष राेहा तालुक्यातील वरसे ग्रामपंचायतीकडे अधिक लक्ष लागण्याचे कारण म्हणजे रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या मतदार संघातील ग्रामपंचायत आहे. त्याचप्रमाणे, अलिबाग तालुक्यातील पेझारी या ग्रामपंचायतींमध्ये शेकापचेच वर्चस्व आहे, तसेच शेकापच्या बालेकिल्ल्यातील ग्रामपंचायत असल्याने सर्वांचेच लक्ष लागले आहे.

पनवेल, राेहा, कर्जत तालुक्यातून सर्वाधिक उमेदवार पनवेल, राेहा, कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक उमेदवार रिंगणामध्ये आहेत. पनवेल तालुक्यात २४ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत २२८ जागांसाठी ४३२ उमेदवार नशीब आजमावत आहेत. राेह्यात २१ ग्रामपंचायतीच्या १९१ जागांसाठी ३७४ उमेदवार रिंगणात आहेत. कर्जतमधील ९ ग्रामपंचायतीमधील ८९ जागांसाठी १८१ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. माणगावमधील देवळी, लाखपाले, टेमपाले, महाड- भेलाेशी, आसनपाेई, पनवेल-आकुर्ली, खानावले, कर्जत-हुमगाव, श्रीवर्धन -कारीवणे, म्हसळा- काेल्टे ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.

रायगड जिल्ह्यातील ८८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून ८४८ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहेत. १,५८८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. १० ग्रामपंचायती या बिनविराेध झाल्या आहेत.-सर्जेराव म्हस्के पाटील, उपजिल्हाधिकारी, रायगड