शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

शासकीय कार्यालयाचे कामकाज ठप्प नागरिकांची गैरसोय

By वैभव गायकर | Updated: March 17, 2023 19:28 IST

जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह अनेक मागण्यांसाठी पनवेलसह रायगड जिल्ह्यामध्ये सरकारी कर्मचार्‍यांसह शिक्षकांनी संप पुकारला आहे.

पनवेल: जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह अनेक मागण्यांसाठी पनवेलसहरायगड जिल्ह्यामध्ये सरकारी कर्मचार्‍यांसह शिक्षकांनी संप पुकारला आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे.पंचायत समिती,प्रांत कार्यालय,तहसील कार्यालयाचे कामकाज पूर्ण ठप्प झाले आहे.

पनवेल महानगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनी या संघातुन माघार घेतल्याने पालिकेचे कामकाज सुरळीत सुरु आहे.कृषी, महसूल, शैक्षणिक अशा वेगवेगळ्या कामांसाठी अलिबागमधील विविध सरकारी कार्यालयात हजारोंच्या संख्येने नागरिक येत असतात; पण विविध मागण्यांसाठी कर्मचारी, शिक्षकांनी मंगळवारी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे सर्व कामकाज ठप्प झाल्याचे दिसून आले. त्यामुळे या आंदोलनाचा फटका तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांसह विद्यार्थ्यांनाही बसला आहे.

सरकारी कर्मचार्‍यांच्या प्रमुख मागण्या पेन्शन योजना लागू करावी, कंत्राटी कर्मचार्‍यांना नियमित करावे, रिक्त पदे अग्रक्रमाने भरा, चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांची पदे निरसित करू नका, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांना सेवांतर्गत आश्‍वासित प्रगती योजनेचा लाभ द्या, अशा अनेक मागण्या प्रलंबित राहिल्यामुळे कर्मचारी व शिक्षकांमध्ये नाराजी आहे. या मागण्यांसाठी ठिकठिकाणी रॅली काढण्यात आली होती. 

यावेळी आंदोलकांनी निदर्शनासह घोषणाबाजी केली.महसूल, वन, आरोग्य, शिक्षण, कृषी इत्यादी सर्व विभागांतील राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्राम पंचायत, विविध प्राधिकरण, निमसरकारी कर्मचारी, जिल्हा सामान्य रुग्णालय, सर्व उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र येथील परिचारिका व कर्मचारी, सर्व माध्यमिक व प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, सर्व चतुर्थ श्रेणी (गट ड) कर्मचारी, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, नगर पंचायतमधील सर्व कर्मचारी, सफाई कामगार, सर्व शासकीय कार्यालयातील अंशकालीन, रोजंदारी व कंत्राटी कर्मचारी, महिला परिचर विभागातील वाहनचालक अशा 62 विभागांत 15 हजारांपेक्षा अधिक कर्मचारी जिल्ह्यातून या संपत सहभागी आहेत.14 मार्च पासुन पुकारलेल्या संप दिवसेंदिवस चिघळत चालला असुन नागरिकांची कामे यामुळे रखडली आहेत.

 

टॅग्स :panvelपनवेलRaigadरायगडTeacherशिक्षक