शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rains: मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
इराणनंतर लागणार पाकिस्तानचा नंबर...! इस्रायल हल्ल्यानंतर काय म्हणाले पाकिस्तानी 'एक्सपर्ट्स'? बसलीय RAW ची दहशत
3
मुंबईतील प्रतिष्ठित कॉलेजमध्ये विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू, कुटुंबीयांचा गंभीर आरोप
4
इराणसाठी इस्लामिक देश बनले काळ, अमेरिकेने रचला चक्रव्यूह; ४० हजार जवान अलर्टवर
5
IND vs ENG : आम्ही बुमराहला घाबरत नाही! तो सर्वोत्तम गोलंदाज असला तरी... मॅच आधी काय म्हणाला बेन स्टोक्स?
6
यम' समोरून फक्त बघूनच गेले! बोलेरो गाडी हवेत ४ वेळा पलटी झाली; पाहा व्हायरल व्हिडीओ
7
IND vs ENG: पहिल्यांदाच कसोटी कर्णधार म्हणून खेळणाऱ्या शुबमन गिलला रवी शास्त्रींचा मोलाचा सल्ला, म्हणाले...
8
'देशात लवकरच इंग्रजीत बोलणाऱ्यांना लाज वाटायला लागेल'; अमित शाह यांचे विधान, काय म्हणाले?
9
इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्...
10
अमेरिकेच्या एन्ट्रीची शक्यता! इराण-इस्रायल युद्धाने जगाची चिंता वाढवली, पेट्रोल-डिझेल महागणार?
11
सोन्याची झळाळी झाली कमी; चांदी एका झटक्यात ₹२०६९ नं स्वस्त, पाहा काय आहेत नवे दर
12
इस्रायलविरोधात एकही मुस्लिम देश इराणच्या बाजूने नाही; आता खमेनी सरकारपुढे कोणता मार्ग?
13
ज्येष्ठ योगिनी एकादशी: ‘असे’ करा व्रतपूजन, समस्यांतून व्हाल मुक्त; अपार यश-प्रगती लाभेल!
14
४० जणांच्या जमावाकडून घरावर हल्ला, दगडविटांचा केला वर्षाव, महिला, लहान मुले कुणालाच सोडलं नाही  
15
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
16
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
17
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
18
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
19
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
20
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?

‘भाजपाला धडा शिकवा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 00:19 IST

भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास लोकशाही धोक्यात येईल. घटना बदलून मतदानाचा हक्कदेखील हिरावून घेतला जाईल.

अलिबाग : भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास लोकशाही धोक्यात येईल. घटना बदलून मतदानाचा हक्कदेखील हिरावून घेतला जाईल. त्यामुळे येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा सरकारला धडा शिकवा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा काँगे्रस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी येथे केले.भाजपा सरकारने गेल्या साडेचार वर्षांमध्ये फक्त घोषणांचा पाऊस पाडला आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यामुळे जनता त्रस्त आहे. महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय. मात्र, सरकार उपाययोजना करत नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांच्या हक्कांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काँग्रेस पक्षाने काढलेली जनसंघर्ष यात्रा बुधवारी अलिबागमध्ये दाखल झाली. बॅ. अंतुले भवन येथे झालेल्या कार्यक्रमात चव्हाण बोलत होते.शिवसेना आणि भाजपाचा संसार म्हणजे बाहेरून कीर्तन आणि आतून तमाशा आहे, अशी खिल्ली चव्हाण यांनी उडवली. काँग्रेसशासित राज्याने सत्तेवर येताच शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. मात्र, महाराष्ट्रातील देवेंद्र सरकारचा अभ्यास अजूनही सुरूच आहे. देशातील आणि राज्यातील वाहणाºया वाºयांनी आता दिशा बदलली आहे. त्यामुळे या पुढे काँग्रेसचीच लाट येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी बी. एम. संदीप, सचिन सावंत, भाई जगताप, माणिक जगताप, माजी आमदार मधुकर ठाकूर, रूपाली सावंत, श्रद्धा ठाकूर, राजा ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.भाजपा ज्या रामनामाचा जप करते, तो त्यांचा खरा राम नाही. त्यांचा खरा राम हा नथुराम गोडसेच आहे, असा घणाघाती हल्ला माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. देशातील आणि राज्यातील जनता भाजपाला मते देऊन फसली आहे. आता जनता सावध झाली असून आगामी निवडणुकीत भाजपाला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.