शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

‘भाजपाला धडा शिकवा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 00:19 IST

भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास लोकशाही धोक्यात येईल. घटना बदलून मतदानाचा हक्कदेखील हिरावून घेतला जाईल.

अलिबाग : भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास लोकशाही धोक्यात येईल. घटना बदलून मतदानाचा हक्कदेखील हिरावून घेतला जाईल. त्यामुळे येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा सरकारला धडा शिकवा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा काँगे्रस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी येथे केले.भाजपा सरकारने गेल्या साडेचार वर्षांमध्ये फक्त घोषणांचा पाऊस पाडला आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यामुळे जनता त्रस्त आहे. महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय. मात्र, सरकार उपाययोजना करत नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांच्या हक्कांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काँग्रेस पक्षाने काढलेली जनसंघर्ष यात्रा बुधवारी अलिबागमध्ये दाखल झाली. बॅ. अंतुले भवन येथे झालेल्या कार्यक्रमात चव्हाण बोलत होते.शिवसेना आणि भाजपाचा संसार म्हणजे बाहेरून कीर्तन आणि आतून तमाशा आहे, अशी खिल्ली चव्हाण यांनी उडवली. काँग्रेसशासित राज्याने सत्तेवर येताच शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. मात्र, महाराष्ट्रातील देवेंद्र सरकारचा अभ्यास अजूनही सुरूच आहे. देशातील आणि राज्यातील वाहणाºया वाºयांनी आता दिशा बदलली आहे. त्यामुळे या पुढे काँग्रेसचीच लाट येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी बी. एम. संदीप, सचिन सावंत, भाई जगताप, माणिक जगताप, माजी आमदार मधुकर ठाकूर, रूपाली सावंत, श्रद्धा ठाकूर, राजा ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.भाजपा ज्या रामनामाचा जप करते, तो त्यांचा खरा राम नाही. त्यांचा खरा राम हा नथुराम गोडसेच आहे, असा घणाघाती हल्ला माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. देशातील आणि राज्यातील जनता भाजपाला मते देऊन फसली आहे. आता जनता सावध झाली असून आगामी निवडणुकीत भाजपाला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.