शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
3
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
4
कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
5
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
6
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
7
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
8
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
9
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
10
'AQI आणि फुफ्फुसांच्या आजारांमध्ये थेट संबंध नाही...', राज्यसभेत पर्यावरण राज्यमंत्र्यांचे उत्तर
11
बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
12
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
13
गुडन्यूज! 'लाफ्टर क्वीन' भारती सिंह दुसऱ्यांदा झाली आई, 'गोला'नंतर आता मुलगा की मुलगी?
14
"तू घाणेरडे Video बघतोस, आमच्याकडे डेटा...", DCP असल्याचं सांगून तरुणाला ४६ हजारांचा गंडा
15
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
16
जर्मनी दौऱ्यात राहुल गांधींना Rolls-Royce ची भुरळ; भारतात 'ही' लक्झरी कार कितीला मिळते?
17
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
18
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
19
"उंच भरारी, पण पाय जमिनीवर!" आजारी असताना एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांनी केली मदत; अमृता खानविलकर भारावली
20
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
Daily Top 2Weekly Top 5

‘भाजपाला धडा शिकवा’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 00:19 IST

भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास लोकशाही धोक्यात येईल. घटना बदलून मतदानाचा हक्कदेखील हिरावून घेतला जाईल.

अलिबाग : भाजपा पुन्हा सत्तेत आल्यास लोकशाही धोक्यात येईल. घटना बदलून मतदानाचा हक्कदेखील हिरावून घेतला जाईल. त्यामुळे येऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत भाजपा सरकारला धडा शिकवा, असे आवाहन माजी मुख्यमंत्री तथा काँगे्रस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी येथे केले.भाजपा सरकारने गेल्या साडेचार वर्षांमध्ये फक्त घोषणांचा पाऊस पाडला आहे. महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार यामुळे जनता त्रस्त आहे. महाराष्ट्र दुष्काळात होरपळतोय. मात्र, सरकार उपाययोजना करत नाही. त्यामुळे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांच्या हक्कांसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी काँग्रेस पक्षाने काढलेली जनसंघर्ष यात्रा बुधवारी अलिबागमध्ये दाखल झाली. बॅ. अंतुले भवन येथे झालेल्या कार्यक्रमात चव्हाण बोलत होते.शिवसेना आणि भाजपाचा संसार म्हणजे बाहेरून कीर्तन आणि आतून तमाशा आहे, अशी खिल्ली चव्हाण यांनी उडवली. काँग्रेसशासित राज्याने सत्तेवर येताच शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. मात्र, महाराष्ट्रातील देवेंद्र सरकारचा अभ्यास अजूनही सुरूच आहे. देशातील आणि राज्यातील वाहणाºया वाºयांनी आता दिशा बदलली आहे. त्यामुळे या पुढे काँग्रेसचीच लाट येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याप्रसंगी बी. एम. संदीप, सचिन सावंत, भाई जगताप, माणिक जगताप, माजी आमदार मधुकर ठाकूर, रूपाली सावंत, श्रद्धा ठाकूर, राजा ठाकूर आदी मान्यवर उपस्थित होते.भाजपा ज्या रामनामाचा जप करते, तो त्यांचा खरा राम नाही. त्यांचा खरा राम हा नथुराम गोडसेच आहे, असा घणाघाती हल्ला माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला. देशातील आणि राज्यातील जनता भाजपाला मते देऊन फसली आहे. आता जनता सावध झाली असून आगामी निवडणुकीत भाजपाला धडा शिकवल्या शिवाय राहणार नाही, असेही त्यांनी सांगितले.