शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

जाळ्यात अडकून कासवांचा मृत्यू ; कासव संरक्षक व संवर्धकांत चिंतेचा विषय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 03:50 IST

मोठ्या मच्छीमार बोटींच्या मासे पकडण्याच्या नायलॉनच्या जाळ््यात अडकून आणि बोटींच्या पंख्यांत (इम्पेलर) जखमी होऊन दुर्मीळ प्रजातीची ‘आॅलिव्ह रिडले’ कासवांचा मृत्यू होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कासव संरक्षण व संवर्धनाच्या चळवळीत सक्रिय असणाऱ्या पर्यावरणप्रेमींकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

- जयंत धुळपअलिबाग : मोठ्या मच्छीमार बोटींच्या मासे पकडण्याच्या नायलॉनच्या जाळ््यात अडकून आणि बोटींच्या पंख्यांत (इम्पेलर) जखमी होऊन दुर्मीळ प्रजातीची ‘आॅलिव्ह रिडले’ कासवांचा मृत्यू होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे कासव संरक्षण व संवर्धनाच्या चळवळीत सक्रिय असणाऱ्या पर्यावरणप्रेमींकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे.गेल्या २० मार्च रोजी रत्नागिरीतील दापोली तालुक्यात सागरकिनारी पाच, तर अलिबाग जवळच्या वरसोली सागरकिनारी शनिवारी एक ‘आॅलिव्ह रिडले’ कासव मृतावस्थेत आढळले. गतवर्षी दिवेआगर सागरकिनारीही दोन मृत कासवे आढळल्याची माहिती वनखात्याच्या दिवेआगर येथील सागरी कासव संरक्षण व संवर्धन प्रकल्पात कार्यरत निसर्गप्रेमी फॉरेस्ट राउंड आॅफिसर हरिश्चंद्र नाईक यांनी दिली.कासवांच्या पिल्लांचा जन्म ज्या सागरकिनारी होतो, त्याच सागरकिनारी ते मोठे झाल्यावर अंडी घालण्याकरिता येतात, हे या आॅलिव्ह रिडले प्रजातीच्या कासवांचे वैशिष्ट्य असल्याचे पर्यावरण अभ्यासक डॉ. वैभव देशमुख सांगतात. आॅलिव्ह रिडले कासवांच्या संरक्षण व संवर्धन मोहिमेतून गेल्या १५ ते १६ वर्षांत त्यांचे प्रमाण वाढले आहे. मात्र, आता त्याच कासवांचे मृत्यू रोखण्याकरिता मच्छीमारांमध्ये जनजागृतीची गरज डॉ. देशमुख यांनी व्यक्त केली.सागरी कासवे श्वसन प्रक्रियेकरिता समुद्राच्या वरच्या भागात येतात, त्यामुळे बºयाचदा ते मासे पकडण्यासाठी असलेल्या जाळ्यात अडकतात. तर अनेकदा बोटींच्या पंख्याने जखमी होतात. वाळू उत्खननामुळे, बंदर उभारणीमुळे, तेल किंवा घातक रसायने सागरातील अपघात, सागरी कासवांचे जगण्याचे प्रमाण केवळ दहा टक्के असल्याचे देशमुख यांनी अखेरीस सांगितले.नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या या सागरी कासवांच्या संरक्षण आणि संवर्धनात रायगड वनविभागाकडून महत्त्वपूर्ण कामगिरी बजावण्यात येत आहे. दिवेआगर, वेळास आणि हरिहरेश्वरच्या किनारपट्टीत सागरी कासवांच्या माद्या अंडी घालण्याकरिता येतात. ही अंडी संरक्षित करून जन्माला येणारी पिल्ले पुन्हा सुरक्षितरीत्या समुद्रात सोडण्याचे काम वनखात्याचे नाईक यांच्या नेतृत्वाखाली त्यांचे सहकारी १० ते १२ वनमजूर आणि निसर्ग व पर्यावरणप्रेमी करीत आहेत. गेल्या वर्षी जानेवारी २०१७मध्ये ३६७ सागरी कासवांच्या अंड्यांचे दिवेआगर परिसरात संवर्धन करून नवजात पिल्लांना पुन्हा समुद्रात सोडण्यात आले. यंदा दिवेआगर सागरकिनारी दहा घरट्यांचे संरक्षण करण्यात आले असून, पैकी पाच घरट्यांतील ५६१ नवजात पिल्ले समुद्रात सोडण्यात यश आले आहे.४० हजार कासवांच्या पिल्लांचे संवर्धनसागरीकिनारपट्टीतील ग्रामस्थांमध्ये कासवाचे महत्त्व, सागरी कासव नष्ट झाले तर समुद्राची होणारी हानी याविषयी जनजागृती करण्यात आली. भाऊ काटदरे, जयंत कानडे, विजय महाबळ, राम मोने आदीं पर्यावरणप्रेमींनी १९९२ मध्ये चिपळूणला निसर्ग संवर्धन व संशोधनासाठी ‘सह्याद्री निसर्गमित्र मंडळ’ या संस्थेची स्थापना केली.- कासवांच्या संवर्धनाकरिता त्यांनी किनारीभागात चळवळच उभी केली. गेल्या १६ वर्षांत सुमारे ४० हजार कासवांच्या पिल्लांचे संवर्धन करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात वेळास, केळशी, अंजर्ला, दाभोळ, कोळथरे, मुरुड तर रायगड जिल्ह्यात दिवेआगर, मारळ, हरिहरेश्वर आदी १५ ते २० ठिकाणी कासव संरक्षण मोहिमेचे तंबू निर्माण करण्यात यश आले आहे.

टॅग्स :Raigadरायगड