शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

अवैध रेती उत्खननावर कारवाईचा बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 01:16 IST

रायगड जिल्ह्यातील रेतीमाफियांवर जिल्हा खनिकर्म विभागाने वक्रदृष्टी करून ९२ प्रकरणात ४३ लाख ३५ हजार ८८२ रुपयांचा दंड वसूल केला आहे.

आविष्कार देसाई अलिबाग : रायगड जिल्ह्यातील रेतीमाफियांवर जिल्हा खनिकर्म विभागाने वक्रदृष्टी करून ९२ प्रकरणात ४३ लाख ३५ हजार ८८२ रुपयांचा दंड वसूल केला आहे. यासंदर्भात १९ गुन्हे दाखल करताना २६ आरोपींना अटक करण्यात आली, तर ३५ वाहने जप्त करण्यात आली होती. रेतीचे अवैध उत्खनन करणाºयांवर जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या पथकाकडून धाडी टाकण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हा खनिकर्म विभागाच्या प्रमुख महिला अधिकारी अफरोज बेग यांनी दिला आहे.सरकारची रॉयल्टी बुडवून नैसर्गिक साधन संपत्तीची विल्हेवाट लावणाºयांवर कारवाईचा आसूड ओढण्यात येणार आहे.जिल्ह्यातील उरण, पनवेल, खालापूर या तालुक्यांमध्ये विकासकामे सुरू आहेत. त्याचप्रमाणे लगतच्या नवी मुंबई, पुणे जिल्ह्यातही विकास सुरू आहे. त्यामुळे बांधकामासाठी लागणारी रेती ही रायगड जिल्ह्यातून पुरवली जाते. जिल्ह्यमध्ये हे रॅकेट मोठे असल्याने बोलले जात आहे. आधीही विविध अधिकाºयांना रेतीमाफियांकडून मारहाण, अंगावर वाहन नेणे, काही अधिकाºयांना तर गन पॉइंटवरही घेतल्याची उदाहरणे जिल्ह्यात घडली आहेत. त्याचप्रमाणे रेती उत्खनन करणाºयांमध्ये मतभेद होऊन वाद झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.जिल्हा खनिकर्म विभागाने रेतीचा लिलाव पुकारला होता मात्र त्याला प्रतिसादच आला नाही.अवैध रेती उत्खननाने सरकारला फार मोठा आर्थिक फटका बसत आहे. तसेच नैसर्गिक साधन संपत्तीचीही लूट होत आहे, असे बेग यांनी सांगितले. पारंपरिक पध्दतीने रेती उत्खनन करणाºयांसाठी प्रशासनाने रीतसर परवानगी दिलेली आहे. त्यामध्ये तळा आणि रोहा तालुक्याचा समावेश आहे. तेथे प्रत्येकी ६०० ब्रासची परवानगी देण्यात आल्याचे बेग यांनी सांगितले.२०१७-१८ या कालावधीत ९२ प्रकरणात ४३ लाख ३५ हजार ८८२ रुपयांचा दंड वसूल केला आहे. १९ गुन्हे दाखल करताना २६ आरोपींना अटकही करण्यात आली, तर ३५ वाहने जप्त करण्यात आली होती. त्यामध्ये महाड तालुक्यातील सर्वाधिक १६ प्रकरणांचा समावेश आहे. त्यामध्ये १२ लाख ३२ हजार ६२५ रुपयांचा दंड वसूल करण्यात आला होता. तीन गुन्हे दाखल केले होते. दोन बोटी उद्ध्वस्त करण्यात आल्या होत्या, तर तीन संक्शन पंप नदीच्या पाण्यात बुडवण्यात आले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.