शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
3
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
4
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
5
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
6
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
7
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
8
येत्या ११ नोव्हेंबरला प्रभागात कोणाची लागणार लॉटरी? मुंबईकरांसह सर्वपक्षीय नगरसेवकांचे लक्ष
9
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
10
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
11
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
12
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
13
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
14
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
15
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
17
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
18
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
19
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
20
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...

हिंदू-मुस्लीम एकात्मतेच्या संगमाचे प्रतीक; अलिबागची ग्रामदेवता काळंबा देवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:32 IST

आंग्रेकालीन काळंबा देवी ही केवळ अलिबागची ग्रामदेवताच नाही तर अलिशाह दर्गा, प्राचीन बालाजी मंदिर आणि काळंबादेवी मंदिर अशा अनोख्या हिंदू-मुस्लीम एकात्मतेच्या संगमाची प्रचिती देणारे हे स्थान आहे.

- जयंत धुळपअलिबाग : आंग्रेकालीन काळंबा देवी ही केवळ अलिबागची ग्रामदेवताच नाही तर अलिशाह दर्गा, प्राचीन बालाजी मंदिर आणि काळंबादेवी मंदिर अशा अनोख्या हिंदू-मुस्लीम एकात्मतेच्या संगमाची प्रचिती देणारे हे स्थान आहे. सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांची असीम श्रद्धा असलेली आणि आंग्रे घराण्याची कुलदेवता काळंबा देवी ही अलिबागकरांची रक्षणकर्ती असल्याची पूर्वापार श्रद्धा येथे आहे.काळंबादेवीचा रोचक इतिहास सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या नवव्या पिढीचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी उलगडला. मूळ काळंबादेवी हिराकोट किल्ल्यामध्ये होती. ब्रिटिश राजवट अलिबागमध्ये आल्यावर या किल्ल्याचे रूपांतर कारागृहात झाले. तेव्हा देवीच्या पूजा, उत्सव, दर्शनाच्या निमित्ताने मराठ्यांचा किल्ल्यात वावर नको, या हेतूने ब्रिटिशांनी किल्ल्यातील काळंबादेवीची शिळा किल्ल्याबाहेर काढण्याचा निर्णय घेतला.थळच्या समुद्रातून आली काळंबादेवीदेवीने दृष्टांत देवून मी थळजवळच्या समुद्रात असल्याचा दृष्टांत दिला. तत्कालीन कोळी बांधवांनी समुद्रात शोध घेतला तेव्हा जाळ्यात काळंबादेवीची रेखीव पाषाणी मूर्ती सापडली. हिराकोट किल्ल्यातील देवीची शिळा आणि थळच्या समुद्रात सापडलेली काळंबादेवीची मूर्ती यांची अलिबाग शहराच्या तत्कालीन सीमेवर आणि आजच्या बालाजी नाक्यावर मंदिर बांधून सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांनी स्थापना केली.दूरदृष्टीचा एकात्मता संगमसरखेल कान्होजीराजे आंग्रे यांनी काळंबादेवीच्या मंदिराकरिता हीच जागा निवडण्यामागे मोठी दूरदृष्टी होती. अलिशाह दर्ग्याशेजारीच काळंबादेवीचे देऊळ झाले तर अलिबागमधील हिंदू आणि मुस्लीम बांधवांची नियमित भेट होईल, संवाद होईल आणि धार्मिक एकोपा निर्माण होईल, अशी त्यामागची कल्पना होती. जी खऱ्या अर्थाने वास्तवात उतरून अलिशाह दर्गा आणि काळंबादेवीचा हा बालाजी नाका अलिबागमधील हिंदू-मुस्लीम बांधवांचा गेल्या कित्येक पिढ्यांचा एकात्मतेच्या संगमाचा नाका बनला आहे.काळंबा देवीचा नवरात्रौत्सवअलिबाग सीमेवरील काळंबादेवीच्या चारही बाजूने अलिबाग शहर विस्तारत गेले. आंग्रे सरकारच्या काळात सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांनी मंदिरास इनाम दिले आणि त्यातून मंदिराचे कामकाज सुव्यवस्थित चालत असे. क्रमवंत हे त्याकाळी मंदिराचे मुख्य उपाध्याय होते तर त्यांच्या हाताखाली रामनाथ येथील गुरवांची नियुक्ती करण्यात आली होती. आजही गुरव परंपरा अखंड सुरू असून त्यांच्या माध्यमातून नवरात्रीत मंदिरात घटस्थापना करण्यात येते.

टॅग्स :Navratriनवरात्री