शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
3
आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
4
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
5
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
6
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
7
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
8
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
9
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
10
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
11
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
12
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
13
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
14
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
15
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
16
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
17
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
18
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
19
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
20
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट

हिंदू-मुस्लीम एकात्मतेच्या संगमाचे प्रतीक; अलिबागची ग्रामदेवता काळंबा देवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 00:32 IST

आंग्रेकालीन काळंबा देवी ही केवळ अलिबागची ग्रामदेवताच नाही तर अलिशाह दर्गा, प्राचीन बालाजी मंदिर आणि काळंबादेवी मंदिर अशा अनोख्या हिंदू-मुस्लीम एकात्मतेच्या संगमाची प्रचिती देणारे हे स्थान आहे.

- जयंत धुळपअलिबाग : आंग्रेकालीन काळंबा देवी ही केवळ अलिबागची ग्रामदेवताच नाही तर अलिशाह दर्गा, प्राचीन बालाजी मंदिर आणि काळंबादेवी मंदिर अशा अनोख्या हिंदू-मुस्लीम एकात्मतेच्या संगमाची प्रचिती देणारे हे स्थान आहे. सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांची असीम श्रद्धा असलेली आणि आंग्रे घराण्याची कुलदेवता काळंबा देवी ही अलिबागकरांची रक्षणकर्ती असल्याची पूर्वापार श्रद्धा येथे आहे.काळंबादेवीचा रोचक इतिहास सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्या नवव्या पिढीचे वंशज रघुजीराजे आंग्रे यांनी उलगडला. मूळ काळंबादेवी हिराकोट किल्ल्यामध्ये होती. ब्रिटिश राजवट अलिबागमध्ये आल्यावर या किल्ल्याचे रूपांतर कारागृहात झाले. तेव्हा देवीच्या पूजा, उत्सव, दर्शनाच्या निमित्ताने मराठ्यांचा किल्ल्यात वावर नको, या हेतूने ब्रिटिशांनी किल्ल्यातील काळंबादेवीची शिळा किल्ल्याबाहेर काढण्याचा निर्णय घेतला.थळच्या समुद्रातून आली काळंबादेवीदेवीने दृष्टांत देवून मी थळजवळच्या समुद्रात असल्याचा दृष्टांत दिला. तत्कालीन कोळी बांधवांनी समुद्रात शोध घेतला तेव्हा जाळ्यात काळंबादेवीची रेखीव पाषाणी मूर्ती सापडली. हिराकोट किल्ल्यातील देवीची शिळा आणि थळच्या समुद्रात सापडलेली काळंबादेवीची मूर्ती यांची अलिबाग शहराच्या तत्कालीन सीमेवर आणि आजच्या बालाजी नाक्यावर मंदिर बांधून सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांनी स्थापना केली.दूरदृष्टीचा एकात्मता संगमसरखेल कान्होजीराजे आंग्रे यांनी काळंबादेवीच्या मंदिराकरिता हीच जागा निवडण्यामागे मोठी दूरदृष्टी होती. अलिशाह दर्ग्याशेजारीच काळंबादेवीचे देऊळ झाले तर अलिबागमधील हिंदू आणि मुस्लीम बांधवांची नियमित भेट होईल, संवाद होईल आणि धार्मिक एकोपा निर्माण होईल, अशी त्यामागची कल्पना होती. जी खऱ्या अर्थाने वास्तवात उतरून अलिशाह दर्गा आणि काळंबादेवीचा हा बालाजी नाका अलिबागमधील हिंदू-मुस्लीम बांधवांचा गेल्या कित्येक पिढ्यांचा एकात्मतेच्या संगमाचा नाका बनला आहे.काळंबा देवीचा नवरात्रौत्सवअलिबाग सीमेवरील काळंबादेवीच्या चारही बाजूने अलिबाग शहर विस्तारत गेले. आंग्रे सरकारच्या काळात सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांनी मंदिरास इनाम दिले आणि त्यातून मंदिराचे कामकाज सुव्यवस्थित चालत असे. क्रमवंत हे त्याकाळी मंदिराचे मुख्य उपाध्याय होते तर त्यांच्या हाताखाली रामनाथ येथील गुरवांची नियुक्ती करण्यात आली होती. आजही गुरव परंपरा अखंड सुरू असून त्यांच्या माध्यमातून नवरात्रीत मंदिरात घटस्थापना करण्यात येते.

टॅग्स :Navratriनवरात्री