शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
2
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
3
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
4
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
5
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
6
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
7
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
8
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
9
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
10
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
11
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
12
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
13
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
14
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
15
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
16
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
17
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
18
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
19
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
20
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत

रबाळे वाहतूक पोलिसांच्या कारवाईवर संशय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2018 03:00 IST

वाहतूक पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होवू लागला आहे. खासगी व्यक्तींचा वापर होत असल्याचाही संशय आहे

नवी मुंबई : वाहतूक पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कारवाईत भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप होवू लागला आहे. खासगी व्यक्तींचा वापर होत असल्याचाही संशय आहे. भाजपाचे दिघा तालुका अध्यक्ष त्रिभुवन सिंह यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली आहे.अवैधरीत्या रस्त्यावर उभ्या केल्या जाणाºया वाहनांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाईचा धडाका सुरू आहे. संपूर्ण शहरात अशा प्रकारे मोठ्या संख्येने कारवाया होत आहेत. मात्र दिघा वाहतूक पोलिसांकडून अशा कारवाया होत असताना खासगी व्यक्तींमार्फत भ्रष्टाचार केला जात असल्याचा आरोप होवू लागला आहे. भाजपाचे दिघा तालुका अध्यक्ष त्रिभुवन सिंह यांनी यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग तसेच वाहतूक पोलीस उपआयुक्तांकडे तक्रार केली आहे. काही दिवसांपूर्वी सिंह यांची मोटारसायकल रस्त्यालगत उभी असताना वाहतूक पोलिसांनी टोविंग करून नेली होती. ही मोटारसायकल सोडवण्यासाठी ते रबाळे वाहतूक शाखेत गेले असता, तिथे अगोदरच थांबलेल्या खासगी व्यक्तीने त्यांच्याकडे दुचाकी सोडवण्यासाठी १३०० रुपयांची मागणी केली. यावेळी सिंह यांनी त्यांना प्रतिसाद न देता तिथल्या वाहतूक पोलिसाकडे चौकशी केली असता, त्याने देखील खासगी व्यक्तीकडे बोट दाखवून त्याने सांगितलेली रक्कम त्याच्याकडे द्या व वाहन सोडवून न्या असा सल्ला दिल्याचे सिंह यांचे म्हणणे आहे. परंतु टोविंग केलेली मोटारसायकल सोडवण्यासाठी १३०० रुपये कसे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला असता, खासगी व्यक्तीने त्यांच्याकडे वाहनाच्या कागदपत्रांची मागणी केली. अखेर आपल्याकडे तेवढी रक्कम नसल्याचे सांगितल्यानंतर ५०० रुपयांवर तडजोड करून पावती न देता दुचाकी सोडून दिल्याचेही सिंह यांचे म्हणणे आहे.