शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

समुद्रकिनारी संशयित बोट किंवा व्यक्ती आढळल्यास पोलिसांना तात्काळ कळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 06:49 IST

सर्व सागर रक्षक दलांनी देशाच्या सुरक्षेकरिता समुद्रकिनारी संशयित बोटी किंवा व्यक्ती दिसल्यास त्याच्याकडे लक्ष ठेवून जवळील पोलीस ठाण्यात कळवावे.

आगरदांडा : सर्व सागर रक्षक दलांनी देशाच्या सुरक्षेकरिता समुद्रकिनारी संशयित बोटी किंवा व्यक्ती दिसल्यास त्याच्याकडे लक्ष ठेवून जवळील पोलीस ठाण्यात कळवावे. आपल्या देशावर हल्ले झाले, ते समुद्र मार्गे झाले आहेत, ते पुन्हा होऊ नये त्याकरिता समुद्रकिनारी सुरक्षारक्षकांनी व स्थानिक नागरिकांनी लक्ष ठेवून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी केले.रायगड जिल्ह्याला सुमारे १७५ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असल्याने हा जिल्हा सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे. त्याकरिता सागरी सुरक्षिततेकरिता सागर रक्षक दलाचे सदस्य, मच्छीमार बांधव व एकत्रितपणे प्रभावी काम करण्यासाठी मुरुड पोलीस ठाण्याच्यावतीने काशीद येथे सागर सुरक्षारक्षक सदस्य मेळावा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी साळे बोलत होते. मच्छीमारांनी योग्य चॅनेलचाच वापर करा. सर्र्वांनी जागृत रहा, समुद्रात मच्छीमारी करताना कोणतीही संशयित बोट आढळली तर तात्काळ माहिती देणे. मच्छीमारांनी आपल्या बोटीची कागदपत्रे बोटीमध्ये ठेवावेत असे यावेळी नेव्हीचे डेप्युटी कमांडंट सलमान खान यांनी मच्छीमार बांधवांना सांगितले.ओएनजीसी अधिकारी स्वप्निल म्हात्रे यांनी ओएनजीसीकडून समुद्रालगत असलेल्या गावांना शौचालय बांधणे, शाळेला मदत अशा प्रकारच्या मदत केली जाईल असे स्पष्ट के ले.मच्छीमार बांधव प्रसाद आंबटकर यांनी आम्हाला स्मार्ट कार्ड द्यावेत अशी सूचना केली.कारण आधारकार्ड चेकिंगकरिता नेव्ही अधिकारी यांनी मशीन ठेवाव्यात जेणे करून भारतीय नागरिक असल्याचे तात्काळ ओळखले जावू शकते. परंतु असे न करता आम्हा मच्छीमारांना नाहक त्रास सहन करावा लागतो.यावेळी पोलीस निरीक्षक किशोर साळे, सरपंच नम्रता कासार, नेव्हीचे डेप्युटी कमांडंट सलमान खान,ओएनजीसी अधिकारी स्वप्निल ठाकूर , पोलीस हवालदार विश्वनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य संतोष राणे, मेरीटाईम बोर्डचे अधिकारी राहुल होले आदी उपस्थित होते.