शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

समुद्रकिनारी संशयित बोट किंवा व्यक्ती आढळल्यास पोलिसांना तात्काळ कळवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 06:49 IST

सर्व सागर रक्षक दलांनी देशाच्या सुरक्षेकरिता समुद्रकिनारी संशयित बोटी किंवा व्यक्ती दिसल्यास त्याच्याकडे लक्ष ठेवून जवळील पोलीस ठाण्यात कळवावे.

आगरदांडा : सर्व सागर रक्षक दलांनी देशाच्या सुरक्षेकरिता समुद्रकिनारी संशयित बोटी किंवा व्यक्ती दिसल्यास त्याच्याकडे लक्ष ठेवून जवळील पोलीस ठाण्यात कळवावे. आपल्या देशावर हल्ले झाले, ते समुद्र मार्गे झाले आहेत, ते पुन्हा होऊ नये त्याकरिता समुद्रकिनारी सुरक्षारक्षकांनी व स्थानिक नागरिकांनी लक्ष ठेवून पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी केले.रायगड जिल्ह्याला सुमारे १७५ किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला असल्याने हा जिल्हा सागरी सुरक्षिततेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील आहे. त्याकरिता सागरी सुरक्षिततेकरिता सागर रक्षक दलाचे सदस्य, मच्छीमार बांधव व एकत्रितपणे प्रभावी काम करण्यासाठी मुरुड पोलीस ठाण्याच्यावतीने काशीद येथे सागर सुरक्षारक्षक सदस्य मेळावा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी साळे बोलत होते. मच्छीमारांनी योग्य चॅनेलचाच वापर करा. सर्र्वांनी जागृत रहा, समुद्रात मच्छीमारी करताना कोणतीही संशयित बोट आढळली तर तात्काळ माहिती देणे. मच्छीमारांनी आपल्या बोटीची कागदपत्रे बोटीमध्ये ठेवावेत असे यावेळी नेव्हीचे डेप्युटी कमांडंट सलमान खान यांनी मच्छीमार बांधवांना सांगितले.ओएनजीसी अधिकारी स्वप्निल म्हात्रे यांनी ओएनजीसीकडून समुद्रालगत असलेल्या गावांना शौचालय बांधणे, शाळेला मदत अशा प्रकारच्या मदत केली जाईल असे स्पष्ट के ले.मच्छीमार बांधव प्रसाद आंबटकर यांनी आम्हाला स्मार्ट कार्ड द्यावेत अशी सूचना केली.कारण आधारकार्ड चेकिंगकरिता नेव्ही अधिकारी यांनी मशीन ठेवाव्यात जेणे करून भारतीय नागरिक असल्याचे तात्काळ ओळखले जावू शकते. परंतु असे न करता आम्हा मच्छीमारांना नाहक त्रास सहन करावा लागतो.यावेळी पोलीस निरीक्षक किशोर साळे, सरपंच नम्रता कासार, नेव्हीचे डेप्युटी कमांडंट सलमान खान,ओएनजीसी अधिकारी स्वप्निल ठाकूर , पोलीस हवालदार विश्वनाथ पाटील, ग्रामपंचायत सदस्य संतोष राणे, मेरीटाईम बोर्डचे अधिकारी राहुल होले आदी उपस्थित होते.