शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
2
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
3
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
4
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
5
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
6
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
7
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
8
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
9
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
10
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
11
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
12
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
13
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
14
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
15
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
16
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
17
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
18
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
19
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
20
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!

जीवरक्षकांनी वाचवले सात जणांचे प्राण, गौरी-गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गेले होते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 02:24 IST

श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील कोळीवाडा भागाच्या समुद्रकिनारी बोर्ली पंचतन येथील गौरी-गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गेलेले बोर्ली पंचतन येथील सात तरुण समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडत असल्याचे किनारी

बोर्ली पंचतन : श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर येथील कोळीवाडा भागाच्या समुद्रकिनारी बोर्ली पंचतन येथील गौरी-गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गेलेले बोर्ली पंचतन येथील सात तरुण समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्याने बुडत असल्याचे किनारी उभ्या असलेल्या दिघी सागरी पोलीस ठाण्याच्या कर्मचाºयांना समजले. त्यांनी तत्काळ समुद्रकिनाºयावर हजर असलेल्या जीवरक्षक प्रीतम भुसाणे व सागरी रक्षक लाया चोगले, मनोहर रघुवीर यांना सांगितले. त्यावर या तिघांनीही कोणताही विचार न करता बुडत असलेल्या सात जणांना सुखरूप बाहेर काढले. जीवरक्षक प्रीतम भुसाणे व सागरी रक्षक लाया चोगले, मनोहर रघुवीर या तिघांचेही सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.बोर्ली पंचतन येथील गणपती विसर्जन हे काही वर्षांपासून दिवेअगार कोळीवाडा भागातील समुद्रकिनारी करण्यात येते. दीड दिवसाच्या गणपतींचे विसर्जन सुरक्षित पार पडल्यानंतर गुरुवारी गौरी-गणपतींचे विसर्जन करण्यासाठी सायंकाळी ५ नंतर बोर्ली पंचतन येथून जवळपास ५०० गणेशमूर्ती दिवेआगर समुद्रकिनारी पोहचल्या. मागील काही दिवस पावसाने कहर केल्याने समुद्रामध्ये वादळाचे वातावरण होते. गणेश विसर्जनाच्या वेळी देखील समुद्र थोडा खवळलेल्या स्थितीमध्ये होता. येथील स्थानिक मच्छीमारांच्या अंदाजानुसार समुद्र शांत झालेला नसल्याचे सांगण्यात आले. विसर्जनस्थळी दिघी सागरी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचाºयांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.बोर्ली पंचतन येथे गणपतीचे समुद्रामध्ये विसर्जन करण्यासाठी संदेश म्हसकर, दिनेश म्हसकर, केशव गायकर, ओमकार गायकर, यशवंत गायकर, गजानन गायकर, विनोद धनावडे असे सात जण गेले. समुद्राच्या आलेल्या लाटेने त्यांना आत खेचून घेतले व त्यांची बाहेर पडण्यासाठी धडपड सुरू झाली . हे पाहून दिघी सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार कृष्णा जागडे व उपस्थित काहींनी तत्काळ समुद्रकिनारी असणाºया प्रीतम भुसाणे या जीवरक्षकास व सागरी रक्षक मनोहर गोपाळ रघुवीर व लाया लखमा चोगले यांना बोलाविले. यांनी क्षणात आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्याचा अंदाज घेत सर्व सात जणांना सुरक्षित बाहेर काढले. संदेश म्हसकर व दिनेश म्हसकर यांना डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले.गणपती विसर्जन घाटाची दुरवस्थाबोर्ली पंचतन येथील छोट्या नदीवर गणेश विसर्जन करण्यात येत असे. यासाठी ग्रामपंचायतीच्या निधीमधून गणपती विसर्जन घाट देखील बांधण्यात आला आहे, परंतु विसर्जन घाट नदीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये माती साचल्याने व तेथील पाणी दुर्गंधीयुक्त असल्याने याठिकाणी गणेश विसर्जन कसे होणार या कारणामुळे बोर्ली पंचतन येथील सर्व गणपतींचे विसर्जन नजीकच्या काही वर्षांपासून २ किलोमीटरवर असलेल्या दिवेआगर समुद्रकिनारी करण्यात येत आहे.यासाठी ग्रामपंचायत देखील मूर्ती वाहून नेण्यासाठी गाड्या उपलब्ध करते, तसेच गणेशभक्त देखील विसर्जन चांगल्या पध्दतीने होण्यासाठी ५०० ते १००० रुपयांपर्यंत खर्च करीत गणेशमूर्तींसह दिवेआगरचा किनारा गाठतात. बोर्ली पंचतन येथील विसर्जन घाट सुशोभित व गणेश विसर्जनासाठी चांगला तयार केला असता तर बोर्लीकरांना दिवेआगर येथे विसर्जनासाठी जाण्याचे कारणच नव्हते व जर सात जणांचे यात काही बरेवाईट झाले असते तर त्यास जबाबदार कोण होते, अशा निराशाजनक प्रतिक्रि या उमटत आहेत.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव