शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

लाटांनी ओलांडला संरक्षण बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 02:28 IST

१२ ते १७ जुलै असे सहा दिवस समुद्रास मोठे उधाण येऊन ४.९६ मीटर उंचीच्या लाटा समुद्रात उसळतील, असा भारतीय हवामान विभागाने इशारा दिला होता.

अलिबाग : १२ ते १७ जुलै असे सहा दिवस समुद्रास मोठे उधाण येऊन ४.९६ मीटर उंचीच्या लाटा समुद्रात उसळतील, असा भारतीय हवामान विभागाने इशारा दिला होता. शनिवारी रायगड जिल्ह्याच्या किनारीभागात उधाण भरती आली. मोठ्या लाटांमुळे अलिबागमधील समुद्र संरक्षक बंधारा ओलांडून पाणी जेएसएम कॉलेजच्या मैदानापर्यंत आले होते.पर्यटक आणि अलिबाग शहरवासीयांनी मोठ्या लाटांचा थरार अनुभवण्याकरिता समुद्रकिनारी गर्दी केली होती. दरम्यान, अलिबाग तालुक्यातील रेवस, बोडणी आणि खारेपाटातील शहापूर, धेरंड गावांच्या हद्दीतदेखील समुद्र व खाडीचे पाणी शिरले होते; परंतु कोठेही अनुचित प्रकाराची नोंद नाही.अलिबाग समुद्रकिनारी कुलाबा किल्ल्यासमोर पाण्याचा रंग गढूळ झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर लाटांचा वेगही जास्त होता. पर्यटकांनी समुद्रात जाऊ नये, अशा सूचना देण्यासाठी अलिबाग नगरपरिषदेचे जीवरक्षक समुद्रकिनारी कार्यरत होते. शुक्रवारी रात्री जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांचा समुद्राच्या मोठ्या लाटांशी कोणताही संबंध नसल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली.आगामी तीन दिवस म्हणजे १५ ते १७ जुलैपर्यंत समुद्रात ४.९७ मीटर उंचीच्या लाटा येण्याचा इशार भारतीय हवामान विभागाने पूर्वीच दिला असल्याने जिल्ह्यातील किनारी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे पाठक यांनी सांगितले.>मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नयेरायगड पोलीस दलाच्या माध्यमातून जिल्ह्यातील किनारी भागातील सर्व गावांमध्ये कार्यरत सागर रक्षक दलाच्या सदस्यांनाही समुद्रभरतीच्या वेळी सतर्क राहण्याकरिता सूचित करण्यात आले आहे.समुद्र खवळलेल्या असल्याने कोळी बांधवांनी मच्छीमारीकरिता समुद्रात जाऊ नये, असा इशारा मत्स्य विभागाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.>पावसाच्या उघडीपमुळे उधाण आले नाहीरेवदंडा : किनारपट्टीवर उधाणाचा फटका स्थानिकांना बसू शकतो, अशी स्थिती असताना रेवदंडा, थेंराडा किनारपट्टीवर कुठेही उधाणाने पाण्याची पातळी वाढली किंवा पाणी घरात शिरणे, शेतीचे बांध फुटले, असा प्रकार झाला नाही. उधाणाचे पाणी आले नाही त्याचे कारण पावसाने पूर्णपणे घेतलेली उघडीप हे आहे, असे मत जाणकार नागरिक थेंरोडा-आगल्याचीवाडीमधील हेमंत खंडेराव यांनी सांगितले.>उधाणामुळे पाण्याची पातळी वाढलीकार्लेखिंड : आलिबाग तालुक्याला जवळ जवळ ५० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. किनाऱ्यालगत गावांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. सध्या उधाणाचा इशारा दिल्याने किनारी भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रेवस, मांडवा, बोडणी, सासवणे हा किनारा वळणाचा असल्यामुळे शनिवारी या ठिकाणी पाण्याला जोर असतो. उधाणाच्या भरतीने रेवस, बोडणी दरम्यान सारळ पूल या रस्त्यावरून पाणी गेले.उधाणाची भरती ही या वर्षातील सर्वात मोठी भरती होती. ४.९७ मीटर एवढे पाणी वाढले होते, अशी माहिती येथील मच्छीमारी व्यवसाय करणारे रूपेश नाखवा यांनी दिली. मच्छीमारी बंद असल्यामुळे कोणही कोळी बांधव समुद्रामध्ये गेलेले नाहीत, अशी माहिती मच्छीमार सोसायटी, बोडणीचे चेअरमन विश्वास नाखवा यांनी दिली. तसेच किनाºयावरील माणकुले गावात नेहमी पाणी शिरते; परंतु रस्त्याच्या बांधकाम आणि भरावामुळे गावात पाणी शिरले नाही. सरकारी सूचना तसेच माहितीमुळे जीवितहानी झालेली नाही.