शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

लाटांनी ओलांडला संरक्षण बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 02:28 IST

१२ ते १७ जुलै असे सहा दिवस समुद्रास मोठे उधाण येऊन ४.९६ मीटर उंचीच्या लाटा समुद्रात उसळतील, असा भारतीय हवामान विभागाने इशारा दिला होता.

अलिबाग : १२ ते १७ जुलै असे सहा दिवस समुद्रास मोठे उधाण येऊन ४.९६ मीटर उंचीच्या लाटा समुद्रात उसळतील, असा भारतीय हवामान विभागाने इशारा दिला होता. शनिवारी रायगड जिल्ह्याच्या किनारीभागात उधाण भरती आली. मोठ्या लाटांमुळे अलिबागमधील समुद्र संरक्षक बंधारा ओलांडून पाणी जेएसएम कॉलेजच्या मैदानापर्यंत आले होते.पर्यटक आणि अलिबाग शहरवासीयांनी मोठ्या लाटांचा थरार अनुभवण्याकरिता समुद्रकिनारी गर्दी केली होती. दरम्यान, अलिबाग तालुक्यातील रेवस, बोडणी आणि खारेपाटातील शहापूर, धेरंड गावांच्या हद्दीतदेखील समुद्र व खाडीचे पाणी शिरले होते; परंतु कोठेही अनुचित प्रकाराची नोंद नाही.अलिबाग समुद्रकिनारी कुलाबा किल्ल्यासमोर पाण्याचा रंग गढूळ झाल्याचे दिसून आले. त्याचबरोबर लाटांचा वेगही जास्त होता. पर्यटकांनी समुद्रात जाऊ नये, अशा सूचना देण्यासाठी अलिबाग नगरपरिषदेचे जीवरक्षक समुद्रकिनारी कार्यरत होते. शुक्रवारी रात्री जाणवलेल्या भूकंपाच्या धक्क्यांचा समुद्राच्या मोठ्या लाटांशी कोणताही संबंध नसल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी दिली.आगामी तीन दिवस म्हणजे १५ ते १७ जुलैपर्यंत समुद्रात ४.९७ मीटर उंचीच्या लाटा येण्याचा इशार भारतीय हवामान विभागाने पूर्वीच दिला असल्याने जिल्ह्यातील किनारी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे पाठक यांनी सांगितले.>मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नयेरायगड पोलीस दलाच्या माध्यमातून जिल्ह्यातील किनारी भागातील सर्व गावांमध्ये कार्यरत सागर रक्षक दलाच्या सदस्यांनाही समुद्रभरतीच्या वेळी सतर्क राहण्याकरिता सूचित करण्यात आले आहे.समुद्र खवळलेल्या असल्याने कोळी बांधवांनी मच्छीमारीकरिता समुद्रात जाऊ नये, असा इशारा मत्स्य विभागाच्या माध्यमातून देण्यात आला आहे.>पावसाच्या उघडीपमुळे उधाण आले नाहीरेवदंडा : किनारपट्टीवर उधाणाचा फटका स्थानिकांना बसू शकतो, अशी स्थिती असताना रेवदंडा, थेंराडा किनारपट्टीवर कुठेही उधाणाने पाण्याची पातळी वाढली किंवा पाणी घरात शिरणे, शेतीचे बांध फुटले, असा प्रकार झाला नाही. उधाणाचे पाणी आले नाही त्याचे कारण पावसाने पूर्णपणे घेतलेली उघडीप हे आहे, असे मत जाणकार नागरिक थेंरोडा-आगल्याचीवाडीमधील हेमंत खंडेराव यांनी सांगितले.>उधाणामुळे पाण्याची पातळी वाढलीकार्लेखिंड : आलिबाग तालुक्याला जवळ जवळ ५० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभला आहे. किनाऱ्यालगत गावांचा मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे. सध्या उधाणाचा इशारा दिल्याने किनारी भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. रेवस, मांडवा, बोडणी, सासवणे हा किनारा वळणाचा असल्यामुळे शनिवारी या ठिकाणी पाण्याला जोर असतो. उधाणाच्या भरतीने रेवस, बोडणी दरम्यान सारळ पूल या रस्त्यावरून पाणी गेले.उधाणाची भरती ही या वर्षातील सर्वात मोठी भरती होती. ४.९७ मीटर एवढे पाणी वाढले होते, अशी माहिती येथील मच्छीमारी व्यवसाय करणारे रूपेश नाखवा यांनी दिली. मच्छीमारी बंद असल्यामुळे कोणही कोळी बांधव समुद्रामध्ये गेलेले नाहीत, अशी माहिती मच्छीमार सोसायटी, बोडणीचे चेअरमन विश्वास नाखवा यांनी दिली. तसेच किनाºयावरील माणकुले गावात नेहमी पाणी शिरते; परंतु रस्त्याच्या बांधकाम आणि भरावामुळे गावात पाणी शिरले नाही. सरकारी सूचना तसेच माहितीमुळे जीवितहानी झालेली नाही.