शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

ओलमणमधील जलयुक्तची पाहणी

By admin | Updated: December 27, 2016 02:37 IST

रायगड जिल्ह्यात जलसंधारणाची कामे पाहायला जिल्ह्याबाहेरची टीम येणे हे तसे दुरापास्त. परंतु कर्जत तालुक्यात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून ओलमणसारख्या डोंगराळ

कर्जत : रायगड जिल्ह्यात जलसंधारणाची कामे पाहायला जिल्ह्याबाहेरची टीम येणे हे तसे दुरापास्त. परंतु कर्जत तालुक्यात जलयुक्त शिवारच्या माध्यमातून ओलमणसारख्या डोंगराळ भागात साठविलेले पाणी हे तसे आश्चर्य समजले जात आहे. त्या भागातील जलयुक्त शिवारच्या माध्यमातून साठविलेले पाणी आणि माहिती घेण्यासाठी हिमाचल प्रदेशमधील तज्ज्ञ वरिष्ठ अधिकाऱ्यांनी येथेपाहणीकेली. जलयुक्त शिवार अभियान जिल्ह्याबाहेर नाही तर राज्याबाहेर पोहचले आहे. पाणी मुबलक असलेल्या हिमाचल प्रदेशातही राज्य जलसंधारण कार्यक्र म राबविण्यास सुरु वात करणार आहे. त्यासाठी त्यांच्या टीमने राज्यात केवळ कर्जत तालुक्यातील ओलमण गावातील कामांची पाहणी केली.कर्जत तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या ओलमण गावात २०१५ पासून जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. तेथे मोठ्या प्रमाणात कृषी विभाग आणि वन विभागाने जलसंधारणची कामे जलयुक्त शिवार अभियानात केली आहेत. त्यात मातीचे बांध, सिमेंट नाला बांध आणि सिमेंट बंधारे बांधण्यात आले. वन विभागाने २०० हेक्टर जंगल भागात वन खंदक खोदून पावसाचे पाणी जमिनीत जिरविण्याचा प्रयत्न केला आहे. त्या सर्वांचा परिणाम ओलमणसारख्या डोंगरात वसलेल्या गावातील जमिनीची भूजल क्षमता वाढली आहे. त्याबद्दल जलयुक्त शिवार अभियानाला धन्यवाद देत आहेत. गावाच्या शिवारात अजूनही दोन सिमेंट नाला बांध यांची कामे अपूर्ण आहेत, परंतु चांगले काम पावसाळ्यापूर्वी झालेल्या नेहमी पाणीटंचाईच्या झळा सोसत असलेल्या आदिवासी लोकांची वस्ती असलेल्या गावातील जलसंधारणाची कामे पाहण्यासाठी शेजारच्या गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, शेजारच्या जिल्ह्यातील नाहीतर परराज्यातील तज्ज्ञांची टीम ओलमण येथे पोहचली आहे.डोंगर रांगात वसलेल्या ओलमणमध्ये पाटबंधारे विभागाने बांधलेला सिमेंट बंधारा आणि कृषी विभागाच्या माध्यमातून बांधलेले सिमेंट नाला बांध यांची यशोगाथा आता देशात पोहचली आहे. हिमाचल प्रदेशात मोठ्या प्रमाणात असलेल्या डोंगराळ भागात तेथील राज्य सरकारकडून जलसंधारणाची कामे केली जाणार आहेत. तेथील जमिनीत पावसाचे पाणी जिरविण्याची पद्धत जाणून घेण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी, हिमाचल प्रदेशच्या नियोजन समितीचे प्रमुख असलेले अवतार सिंग यांच्या नेतृत्वाखाली पथकाने राज्यातील ओलमण या एकमेव गावाला भेट दिली. त्या पथकात भारतीय फॉरेस्ट सेवेतील अधिकारी अनिल कुमार यांच्यासह पाच वरिष्ठ अधिकारी देखील होते. हे पथक ओलमणनंतर पुढे राज्याचे कृषी आयुक्त यांच्याशी चर्चा केल्यानंतर गोवा राज्यात पोहचले. हिमाचल प्रदेश राज्यातील नियोजन समितीच्या पथकाला उप विभागीय कृषी अधिकारी पी. डी. शिगेदार, तालुका कृषी अधिकारी अंकुश टकले, मंडळ कृषी अधिकारी वैभव विश्वे आदींनी त्या पथकाला सर्व माहिती दिली. (वार्ताहर)