शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

रायगड जिल्ह्यात दीड लाख कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 23:38 IST

पालकमंत्री आदिती तटकरे यांची माहिती : मुख्यमंत्र्यांनी घेतला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा

लोकमत न्यूज नेटवर्करायगड : जिल्ह्यात ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम गाव पातळीपर्यंत राबविण्यासाठी सर्व प्रशासकीय यंत्रणा समन्वयाने काम करीत आहेत. आतापर्यंत या मोहिमेंतर्गत जिल्ह्यात १ लाख ६४ हजार ३२९ कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. लवकरच या मोहिमेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण होईल, असा विश्वास पालकमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला. शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेबाबत कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या.या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचार करताना, काही अडचण असल्यास कोरोना टास्क फोर्सशी सल्लामसलत करावी. ग्रामपंचायत पातळीवर अधिक लोक सहभागी होतील, याकडे लक्ष द्यावे. प्रचार प्रसिद्धीसाठी विशेष प्रयत्न करावेत, कोरोना दक्षता समित्या कार्यरत राहतील, याकडे लक्ष द्यावे, माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत एकाच समान बोधचिन्हाचा वापर सर्वत्र करावा, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी मास्क वापरणे, हात वारंवार धुणे, सॅनिटायझरचा नियमित वापर करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे या बाबींचे नियमित पालन करावे आणि नागरिकांच्या सहभागाने महाराष्ट्र सदृढ बनविण्याच्या दृष्टीने सतत प्रयत्नशील राहावे, अशा सूचना दिल्या.‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम यशस्वी करण्यासाठी रायगड जिल्ह्यात एकूण १ हजार ५०० पथके नेमली आहेत. रायगड जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये किमान २ बेड राखीव ठेवून कोविड कॉर्नर निर्माण करण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील आॅक्सिजन बेड वाढविण्यासाठी, तसेचजवळपास १२० व्हेटिंलेटर्स उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.कोविड १९ मधून बरे झालेल्या रुग्णांच्या इतरांना प्रोत्साहन व बळ मिळेल, अशा मुलाखती प्रसारमाध्यमांद्वारे सर्वत्रप्रसिद्ध केल्या जाणार आहेत असेस्पष्ट केले.याप्रसंगी, मुख्य कार्यकारी अधिकारी किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, पनवेल महानगरपालिका आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे उपस्थित होते.साडेसात लाख घरांच्या सर्वेक्षणाचे उद्दिष्ट‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत रायगड जिल्ह्यात एकूण ७ लाख ७५ हजार २२५ घरांचे सर्वेक्षण करण्याचे उद्दिष्ट आहे. आजपर्यत १ लाख ६४ हजार ३२९ घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. सर्वेक्षण पथकाला आरोग्य सुरक्षाविषयक सर्व प्रकारची आवश्यक साधनसामुग्री पुरविण्यात आली आहेत, असे जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले.आरोग्य केंद्रांना सक्षम करणे गरजेचेप्राथमिक आरोग्य केंद्रांना अधिक सक्षम करणे गरजेचे आहे. तसे झाल्यास मृत्युदराचे प्रमाण कमी होण्यास निश्चितच मदत होईल, असे सांगून हे सर्वेक्षण सर्वांसाठी आहे. या भावनेने लोकप्रतिनिधींच्या सक्रिय सहभागान ही मोहीम जिल्ह्यात सर्वस्तरावर यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस