शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाच्या काहिलीने त्रस्तांना मिळतोय उसाचा रसातून गारवा

By निखिल म्हात्रे | Updated: November 22, 2022 14:31 IST

Sugarcane Juice: डोक्यावर तळपणारे ऊन, त्यामुळे घशाला वारंवार पडणारी कोरड. अशा अंगाची लाहीलाही करणार्‍या अवस्थेत थंडगार शुद्ध उसाचा रस मिळाला तर उन्हाने आलेला शीण कुठल्या कुठे पळून जातो.

- निखिल म्हात्रे अलिबाग - डोक्यावर तळपणारे ऊन, त्यामुळे घशाला वारंवार पडणारी कोरड. अशा अंगाची लाहीलाही करणार्‍या अवस्थेत थंडगार शुद्ध उसाचा रस मिळाला तर उन्हाने आलेला शीण कुठल्या कुठे पळून जातो. उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्यांना उसाचा गोड रस पाजून त्यांची तगमग कमी करणार्‍या उसाच्या रसाच्या चरख सध्या जत्रेमध्ये सर्वत्र दिसू लागले आहेत. अलिबाग तालुक्यातील वरसोली येथे भरलेल्या या जत्रेतून रोजगार मिळत असल्याचे  चरख चालविणारे जितू वर्तक यांनी सांगितले आहे. मात्र या वर्षी मंदिची झळ हि आमच्या व्यवसायाला बसली असल्याचे वर्तक यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

जत्रोस्तवाच्या काळावधीत हातावर हात धरून बसण्यापेक्षा दिड महिन्यांसाठी लागणारे सामानसुमान बांधायचे, रस काढायचे लाकडी गुर्‍हाळ सोबत घ्यायचे आणि टेम्पो भरून जिल्ह्यातील जत्र गाठायची हा त्यांचा दरवर्षीचा ठरलेला नेम.कुटुंबातल्या महिला व मुलेही या कामात बरोबरीने सहभागी होत आहेत. लोखंडी गुर्‍हाळापेक्षा लाकडी गुर्‍हाळात अधिक शुद्ध रसाची हमी असल्याचे जितू वर्तक आवर्जून सांगतात. अनेक वेळा लाकडी गुर्‍हाळात हात अडकण्याची भीती असते. काही जणांची बोटे निकामी झालीही आहेत, मात्र एवढा धोका तर पत्करावाच लागतो, असे सांगताना जीतू यांच्या डोळ्यांत काळजीची छटा चमकून जाते. रस काढण्यासाठी लागणारा ऊस ते पुणा येथून खरेदी करतात. सकाळी दहा ते रात्री बारा वाजेपर्यंत काम करायचे, तेव्हा कुठे त्यांना  ते पाच दिवसात आपल्या कष्टाचे पैसे मिळतात.

जत्रा म्हटली कि सार काही एकाच ठिकाणी मिळून जात. पण याच जत्रेत मिळणारा ऊसाचा रस हा सर्वाांनाच हवाहवासा असतो. जत्रेतील ऊसाचा रस हा आरोग्यास पोषक असल्याने खास तो पिण्यासाठी यात्रेकरू येत असतात. अलिबाग येथील वरसोली येथे सुरु असलेल्या या विठोबाच्या जत्रेतून उसाचे चरख चाविणा-यांना पाच दिवसात यात्रेकरूंकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. जत्रेत 15 फक्त उसाच्या गु-हाळाची दुकाण आहेत. या शुध्द व नैसर्गिक ऊसाचा रस मिळत आहे. यावर्षी 20 रु फुल तर 15 हाफ तर 100 रुपये लिटरने रस विकला जात आहे. मागच्यावर्षी 7 हाजार 500 रुपये टनाने हा उस पोच होत असायचा. मात्र यावर्षी टनामागे 500 रुपये वाढल्याने 8 हाजार रुपये किंमतीने हा ऊस घ्यावा लागला आहे. जिल्ह्यात पार पडणा-या जत्रांपैकी, नागेश्‍वर-आवास, बोंबले विठोबा,वरसोली व थळ दत्त टेकडीवरील जत्रेत पारंपारीक पद्धतीचा माझा उसाचा चरख असून साधारणात: 10 जण कामगार या दिवसात आमच्याकडे काम करीत असल्याचे जितू वर्तक यांनी सांगितले.

टॅग्स :Raigadरायगड