शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
2
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
3
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
4
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
5
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
6
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
7
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
8
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
9
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
10
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
11
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
12
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
13
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
14
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
15
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
16
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
17
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
18
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू
19
Garud Puran: मृत्यूनंतर मोक्ष मिळेल का माहीत नाही, पण जिवंतपणी 'या' उपायांनी मिळू शकेल!
20
परप्रांतीयांना भाड्याने घरं देऊ नका, पंजाबमध्ये ठिकठिकाणी आवाहन; यूपी-बिहारींना हाकलण्याची मागणी

अचानक उडाला भडका, अलिबागमध्ये दोन बोटी आगीत भस्मसात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 08:38 IST

आरसीएफ कंपनीच्या अग्निशमन दलाला मांडवा पोलिसांनी पाचारण केले

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग :  समुद्रकिनाऱ्यावरील बंधाऱ्यावरील दोन बोटींना अचानक आग लागून खाक झाल्याची घटना सारळ येथील किनाऱ्यावर घडली. या दुर्घटनेत सुदैवाने  कोणीही जखमी झाले नसले तरी बोट जळाल्याने २५ लाखांच्या साहित्याची हानी झाली आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले. 

मच्छीमारीसाठीच्या दोन बोटी सारळ येथील किनाऱ्यावर  लावल्या होत्या. दोन्ही बोटींचे काम सुरू होते. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास अचानक जुन्या बोटीत भडका उडून आग लागली. काहीवेळातच आगीच्या ज्वाळा  सर्वत्र पसरल्या. बाजूची दुसरी बोटही त्याच्या  विळख्यात  सापडली. बोटीतील कर्मचारी तातडीने बाहेर पडल्याने ते बचावले. 

 आरसीएफ कंपनीच्या अग्निशमन दलाला मांडवा पोलिसांनी पाचारण केले.  जवानांनी ४० मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत दोन्ही बोटी जळून खाक झाल्या होत्या. दोन्ही बोटी नितीन पाटील यांच्या मालकीच्या असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग