शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

अचानक उडाला भडका, अलिबागमध्ये दोन बोटी आगीत भस्मसात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2023 08:38 IST

आरसीएफ कंपनीच्या अग्निशमन दलाला मांडवा पोलिसांनी पाचारण केले

लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग :  समुद्रकिनाऱ्यावरील बंधाऱ्यावरील दोन बोटींना अचानक आग लागून खाक झाल्याची घटना सारळ येथील किनाऱ्यावर घडली. या दुर्घटनेत सुदैवाने  कोणीही जखमी झाले नसले तरी बोट जळाल्याने २५ लाखांच्या साहित्याची हानी झाली आहे. आगीचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे अग्निशमन दलाच्या सूत्रांनी सांगितले. 

मच्छीमारीसाठीच्या दोन बोटी सारळ येथील किनाऱ्यावर  लावल्या होत्या. दोन्ही बोटींचे काम सुरू होते. सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास अचानक जुन्या बोटीत भडका उडून आग लागली. काहीवेळातच आगीच्या ज्वाळा  सर्वत्र पसरल्या. बाजूची दुसरी बोटही त्याच्या  विळख्यात  सापडली. बोटीतील कर्मचारी तातडीने बाहेर पडल्याने ते बचावले. 

 आरसीएफ कंपनीच्या अग्निशमन दलाला मांडवा पोलिसांनी पाचारण केले.  जवानांनी ४० मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत दोन्ही बोटी जळून खाक झाल्या होत्या. दोन्ही बोटी नितीन पाटील यांच्या मालकीच्या असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Raigadरायगडalibaugअलिबाग