शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

श्रमदानातून समुद्र संरक्षक बंधा-यांना पडलेली 25 मोठी भगदाडे चिखलमातीने बुजवण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2018 22:26 IST

अमावास्येला येणा-या मोठया उधाणाच्या भरतीचे पाणी शेती पार करुन ग्रामस्थांच्या घरात घूसण्याच्या मोठया आपत्तीपासून आपल्या गावांचा बचाव करण्यात हे सर्व ग्रामस्थ शेतकरी यशस्वी झाले आहेत.

अलिबाग - अलिबाग तालुक्यांतील मोठे शहापूर, शहापूर आणि धेरंड या तीन गावांच्या पूर्व व पश्चिम बाजूस असणा-या समुद्र संरक्षक बंधा-यांना गेल्या पौर्णिमेच्या दिवशी समुद्रास आलेल्या मोठया भरतीच्या उधाणाणो पडलेली एकूण 25 ठिकाणी मोठी भगदाडे (खांडी), गेल्या तीन दिवसांपासून तब्बल 56 स्त्री-पुरुष शेतक-यांनी अथक श्रमदान करुन चिखलमातीने बुजवून संरक्षक बंधा-यांची दुरुस्ती करण्यात यश मिळविले असून आता येत्या गुरुवारी 15 फेब्रुवारी रोजीच्या अमावास्येला येणा-या मोठया उधाणाच्या भरतीचे पाणी शेती पार करुन ग्रामस्थांच्या घरात घूसण्याच्या मोठया आपत्तीपासून आपल्या गावांचा बचाव करण्यात हे सर्व ग्रामस्थ शनिवारी संध्याकाळी यशस्वी झाले आहेत.

गेल्या पौर्णिमेला गावांच्या समुद्र संरक्षक बंधा-यांना तब्बल 25 ठिकाणी ही मोठी भगदाडे पडून समुद्राचे खारेपाणी गावच्या भातशेतीत घूसून पूढे गावांत घरांच्या जोत्यांपर्यत पोहोचल्याने मोठया आपत्तीस सर्व ग्रामस्थांना सामोरे जावे लागले. या 25 भगदाडांमध्ये चिखलमाती भरुन ती बुजवून संरक्षक बंधा-यांची दूरुस्ती केली नाही तर येत्या गुरुवारी 15 फेब्रुवारी रोजीच्या अमावास्येला येणा-या मोठय़ा उधाणाच्या भरतीचे पाणी याच 25 भगदाडांतून थेट घूसून पूढे शेती पार करुन ग्रामस्थांच्या घरात घूसून मोठय़ा आपत्तीस सामोरे जावे लागेल अशी परिस्थिती निर्माण झाली होती.आपल्याला वाचायचे असेल तर श्रमदानाला या..या गंभीर परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर नेमकी नैसर्गीक समस्या व शासकीय तांत्रीक मर्यादा लक्षात घेऊन शहापूर गावातील ज्येष्ठ शेतकरी व गाव प्रमुख  अमरनाथ विश्वनाथ भगत.,महादेव सीताराम थळे रामचंद्र भोईर यांनी संपूर्ण गावांला एकत्न करून ‘आपल्याला वाचायचे असेल तर, कुणावर अवलंबून न राहता प्रत्येक घरातील एक पुरु ष व महिला यांनी फूटलेल्या संरक्षक बंधा:यांची दुरुस्तीसाठी (खांडी बुजविण्यासाठी)गुरुवार पासून येण्याचे आवाहन केले. त्यास सर्व ग्रामस्थ शेतक:यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन गावाच्या पूर्वे कडील बाजूस असलेल्या भंगार कोठ्यातील भगदाडे गुरुवारी श्रमदान करुन बांधुन काढण्यास प्रारंभ आणि या सामुहिक श्रमदानास प्रांरभ झाला. अणि तिन दिवसांच्या अथक कष्टाअंती तिस:या दिवशी शनिवारी संध्याकाळी ही 25 मोठी भगदाडे बुजवून संरक्षक बंधारे दुरुस्त करण्यात यश मिळाले असल्याची माहिती अमरनाथ विश्वनाथ भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.

संरक्षक बंधा-यांच्या25 भगदाडांच्या मोजमाप नोंदीशहापूर-धेरंड गावांच्या पूर्व व पश्चिम भागाकडील संरक्षक बंधारे एकूण 25 ठिकाणी फूटले होते.या सर्व 25 भगदाडांची मोजमापे गावांतील तरुण शेतक:यांनी मोजून घेवून त्यांच्या नोंदी करुन ठवल्या आहेत. श्रमदानाने ही भगदाडे बुजवल्यावर देखील दुरुस्तीची मोजमापे देखील घेवून त्यांच्याही रितसर नोंदी करुन ठेवल्या असल्याचे श्रमीक मुक्ती दलाचे जिल्हा समन्वयत राजन भगत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगीतले.