शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
3
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
4
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
5
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
6
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
7
पुण्यात आल्यावर मुंबईच्या तरुणीला पटवलं, शरीरसंबंधही ठेवले; नंतर तिच्याच मैत्रिणीसोबत...
8
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
9
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
10
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
11
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
12
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
13
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
14
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
15
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
16
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
17
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
18
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
19
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
20
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?

पेणमध्ये आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना तापाची लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 02:24 IST

पेणच्या वरसई येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यक्रमाच्या अखत्यारीतील आश्रमशाळेतील १७ विद्यार्थ्यांना गुरुवारी दुपारी दीड वाजता पेणच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पेण - पेणच्या वरसई येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यक्रमाच्या अखत्यारीतील आश्रमशाळेतील १७ विद्यार्थ्यांना गुरुवारी दुपारी दीड वाजता पेणच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांमध्ये १३ मुली व ४ मुले असून या सर्वांना तापाची लागण झाली आहे. शालेय परिसरातील अस्वच्छता, दुर्गंधी, पिण्याच्या शुद्घ पाण्याचा अभाव, वाहतुकीच्या रस्त्यांची गैरसोय या सर्व बाबींमुळे परिसरात डासांची उत्पत्ती झाल्याने विद्यार्थ्यांना संसर्ग झाल्याचे बोलले जात आहे. गुरुवारी १७ रुग्णवाहिकेद्वारे आणून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या वेळी विद्यार्थ्यांचे रक्ताचे नमुने अलिबाग येथे पाठवण्यात आले असून, तपासाअंती तापामुळे पेशी कमी झाल्याचे उघड झाले आहे.विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून तापामुळे त्यांना भोवळ येणे, उलटी होणे असे प्रकार सुरू झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एकंदरीत वरसई आश्रमशाळेतील या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या गंभीर प्रश्नावर पेण येथील आदिवासी प्रकल्प कार्यालय प्रकल्प अधिकारी यांनी त्वरित उपाययोजना करण्याची गरज आहे.रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलेल्या विद्यार्थ्यांनी रात्रीचे भात, भाजी, आमटीचे जेवण घेतले. त्यानंतर सकाळी उठल्यानंतर दूध घेतल्यानंतर उलटी होणे, पोटात मळमळणे असे प्रकार जाणवले. यापैकी सर्व विद्यार्थ्यांना दोन दिवसांपूर्वीच बारीक ताप येत होता. त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी अभिजित पाटील व त्यांच्या परिचारिकांनी तातडीने उपचार सुरू केले. त्यांचे रक्ताचे नमुने पेण येथील रक्त तपासणी सेंटर व अलिबाग येथे तातडीने पाठविण्यात आले. मात्र, ताप कोणत्या प्रकारचा आहे याचा अहवाल प्राप्त झालेला नाही.घटनेची माहिती मिळताच पेणचे नगरसेवक व बांधकाम सभापती दर्शन कीर्तीकुमार बाफना यांनी, वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी मोठे सहकार्य केले. याचबरोबर पेण पं.स. सभापती स्मिता पेणकर, नगरसेवक शोमेर पेणकर यांनीही प्रकल्प अधिकाºयांची भेट घेऊन विद्यार्थ्यांसाठी सर्वोतोपरी उपाययोजना राबविण्यासाठी मार्गदर्शन केले. पेण तहसीलदार अजय पाटणे, पोलीस निरीक्षक क्षीरसागर यांनीही रुग्णालयास भेट देऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्याची माहिती घेतली.उपचारार्थ दाखल केलेले विद्यार्थीशर्मिला वामन वाघे (१२) , चित्रा लहू ठोंबरा (८ ), मानसी नारायण दरवडा (११), प्रियंका जयेश ठोंबरा (१३) , अस्मिता बाळू वाघ (७ ), महेश तुकाराम वीर (१३), रोशनी भक्ता (१०), हर्षदा कमळाकर वाघ (१०), दिव्या पांडू दोरे (१७), भारती रामा सुतक (१०), करीना जयेश ठोंबरा (११), विद्या बाळू आवारे (१३), गीता रमेश वाघ (१३), रसिका नाग्या सुतक (१०), जयश्री पांडू माडे (११), मंगळ््या राघ्या जाधव (१०), रोशन नारायण दरवडा (१५).सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून, रुग्णालयातील आरोग्य पथक त्यांच्यावर लक्ष ठेवून असल्याचे डॉ. अभिजित पाटील यांनी सांगितले. वरसई आश्रमशाळेचा परिसर तातडीने स्वच्छ करण्याचे आदेश या घटनेमुळे देण्यात आल्याचे एकात्मिक प्रकल्प विभाग सूत्रांनी सांगितले.शाळेचे प्र. मुख्याध्यापक बी. बी. निवडुंगे व अधीक्षिका याच्यावर प्रकल्प अधिकारी कोणती भूमिका घेतात व विद्यार्थ्यांना सोयी-सुविधांबाबत काय उपाययोजना शालेय स्तरावर केल्या जातात याची माहिती मागविण्यात आलेली आहे.प्रकल्प कार्यालयाचे आनंद पाटील हे या सर्व परिस्थितीची माहिती मुख्याध्यापक बी. बी. निवडुंगे यांच्याकडून घेत असून यापुढे स्वच्छता, पाणीपुरवठा व्यवस्थापन, आरोग्य तपासणीसाठी प्रकल्प कार्यालयाकडून संबंधितांना कडक सूचना दिल्या गेल्या आहेत.विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदत लागल्यास पेणचे लहान मुलांचे डॉक्टर तत्काळ मदतीसाठी उपलब्ध होतील, असे आश्वासन दर्शन बाफना यांनी प्रकल्प अधिकारी आनंद पाटील यांना दिले आहे. विद्यार्थ्यांना वैद्यकीय मदतीसाठी बरेच स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते, नगरसेवक, सभापती व आदिवासी समाजबांधव संस्थेचे, पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Raigadरायगडnewsबातम्या