शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
5
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
6
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
7
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
8
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
9
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
10
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
11
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
12
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
13
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
14
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
15
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
16
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
17
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
18
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
19
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
20
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण

पर्यटक सुरक्षा उपायांची होणार कडक अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 02:51 IST

सुरक्षा उपायांची यंत्रणेने अंमलबजावणी करावी, तसेच पर्यटनस्थळी व सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणा-या तळीरामांवर कडक कारवाई करावी, असे आदेश रायगडचे प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी शुक्रवारी दिले आहेत.

अलिबाग : वर्षा पर्यटन, गडकिल्ले, वनभ्रमंती आणि गिर्यारोहणासाठी जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी व संभाव्य दुर्घटना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयार केलेल्या पर्यटक सुरक्षा उपायांची यंत्रणेने अंमलबजावणी करावी, तसेच पर्यटनस्थळी व सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणा-या तळीरामांवर कडक कारवाई करावी, असे आदेश रायगडचे प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभय यावलकर यांनी शुक्रवारी दिले आहेत.मान्सून पर्यटनाच्या काळात पर्यटक धबधबे, समुद्र किनारे आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणावर येत असतात. उत्साहाच्या भरात पर्यटक नको त्या संकटात सापडून प्रसंगी प्राणाला मुकतात. अशा दुर्घटना रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने काही प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आराखडा तयार केला आहे. त्याची अंमलबजावणी करणाºया यंत्रणांची आढावा बैठक यावलकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सहअधीक्षक सीमा झावरे, रोहा उप वन संरक्षक राकेश शेपट, अलिबाग उपवन संरक्षक मनीष कुमार, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक आदी उपस्थित होते.जिल्ह्यातील पर्यटनस्थळी पोलीस विभाग, वन विभाग, राज्य उत्पादन शुल्क विभाग यांची संयुक्त पथके तयार करून गस्त वाढविणे, धबधबे तसेच अन्य पर्यटन स्थळी मद्यपान करण्यास प्रतिबंध करणे यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग पोलीस विभागाच्या सहयोगाने अंमलबजावणी करेल. तसेच धबधबा व परिसरात मद्य विक्री व साठा करणाºयांविरु द्धही कारवाई करण्यात येईल. पर्यटन स्थळे व धबधबे यांच्या परिसरात सुरक्षित अंतरावर वाहने पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग व पोलीस विभाग आपापल्या कार्यक्षेत्रात अंमलबजावणी करेल. पर्यटकांना सावधगिरीचा इशारा देण्यासाठी चिन्हांकित माहिती फलक हे संबंधित उपविभागीय अधिकाºयांनी लावावेत असे आदेश देण्यात आले आहेत.पर्यटकांच्या सुरक्षेसाठी धबधबा परिसरात तत्कालीन परिस्थितीचा विचार करु न उपविभागीय अधिकारी जमाबंदीचे आदेश निर्गमित करतील. जिल्ह्यात प्रबळगड, ईशाळगड, पेठ किल्ला आदी ठिकाणी ट्रेकिंग व साहसी पर्यटनासाठी येणाºया पर्यटकांनी संबंधित उपवनसंरक्षकांकडे आपली नाव नोंदणी करावी, त्यासाठी उपवनसंरक्षकांनी पर्यटकांना वन क्षेत्राच्या प्रवेश ठिकाणी नाव नोंदणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी. स्थानिक तरुणांना गाइडचे प्रशिक्षण देऊन पर्यटकांचा ट्रेकिंगसाठी गाइड नेणे बंधनकारक करावे जेणे करून स्थानिक तरूणांना रोजगार उपलब्ध होईल व पर्यटक भरकटणार नाहीत, यासाठी उपविभागीय अधिकारी आणि उपवनसंरक्षक यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात उपाययोजना करावी, तसेच धोक्याच्या ठिकाणी, जलाशये, समुद्र किनारे आदी ठिकाणी जीवरक्षक तयार करून त्यांना पोषाख व ओळखपत्र देण्यात यावे अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी यावलकर यांनीकेल्या.