शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

वादळी वाऱ्यामुळे आदगाव शाळेचे छप्पर उडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:46 IST

समुद्रकिनारी वसलेल्या आदगाव येथे इयत्ता चौथी पर्यंत जिल्हा परिषदेची मराठी शाळा आहे.

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे पत्रे व कौलारू छप्पर गुरुवारी वादळात उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वा-यामुळे ही घटना घडली असून दुपारच्या सुट्टीमुळे शाळेतील विद्यार्थी बालंबाल बचावले. शाळेला वाळवी लागली असून ती धोकादायक बनली असून दुरुस्तीची मागणी गेल्या सात वर्षांपासून पालक तसेच ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मात्र, संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे.समुद्रकिनारी वसलेल्या आदगाव येथे इयत्ता चौथी पर्यंत जिल्हा परिषदेची मराठी शाळा आहे. सत्तर पटसंख्या असणाºया शाळेत चार खोल्या आहेत. गुरुवारी सुटलेल्या वादळी वाºयाने शाळेच्या चार पैकी तीन खोल्यांचे पत्रे व कौलारू छप्पर उडाले. यामध्ये डिजिटल रूमची प्लॅस्टिक शेड फाटल्याने डिजिटल शैक्षणिक साहित्यांचे नुकसान झाले आहे. दुपारी दीडच्या सुमारास शाळेला जेवणाची सुट्टी असल्याने विद्यार्थी वर्गात नव्हते. त्यामुळे थोडक्यात बचावले. मात्र या घटनेत शाळेचे संपूर्ण पत्रे व भिंतीची नासधूस झाल्याने सर्व विद्यार्थ्यांना सध्या एका वर्गखोली बसवण्यात आले आहे. त्यामुळे लवकरात लवकर शाळेची दुरुस्ती करण्याची मागणी शिक्षक व पालकांकडून करण्यात येत आहे.वाळवी लागल्याने आदगाव शाळा धोकादायक बनली आहे. छपरामधील पूर्ण लाकूड वाळवीने बाधित आहे. त्यामुळे पावसाळ्यात कायम गळकी असते. त्यामुळे वर्गखोल्या तसेच डिजिटल शैक्षणिक साहित्याचे नुकसान होत आहे. त्यामुळे संपूर्ण शाळा केव्हाही कोसळण्याची भीती पालकांमधून व्यक्त होत आहे.आदगाव शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी शिक्षणविभागाकडे शाळा कमिटी २०१३ पासून मागणी करीत आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आजतागायत शाळेची डागडुजी केली नाही. परिणामी अशा दुर्घटनेला सामोरे जावे लागत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. सध्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेच्या छताची त्वरित डागडुजी करावी अशी मागणी उपसरपंच देवेंद्र मोरे सोबत ग्रामस्थ करत आहे.सर्वशिक्षण अभियानाने कार्यकारी अभियंत्यांनी अंदाजे खर्चपत्रक (इस्टिमेट) तयार केले आहे. ते मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे लवकरात लवकर सादर करून दुरुस्तीचे काम करण्यात येईल.- वाय. एन. प्रभे,गटविकास अधिकारीशिक्षण विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही शाळा दुरुस्तीसाठी कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे अशा दुर्घटनेचा विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. जिल्हा परिषद शाळांच्या देखभाल-दुरुस्तीकडे कायम दुर्लक्ष होत आहे.- सुदेश मोरे, माजी व्यवस्थापकशाळा समिती अध्यक्ष, आदगाव.

टॅग्स :Schoolशाळा