शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

वादळी वाऱ्यामुळे आदगाव शाळेचे छप्पर उडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2019 00:46 IST

समुद्रकिनारी वसलेल्या आदगाव येथे इयत्ता चौथी पर्यंत जिल्हा परिषदेची मराठी शाळा आहे.

दिघी : श्रीवर्धन तालुक्यातील आदगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे पत्रे व कौलारू छप्पर गुरुवारी वादळात उडाल्याने मोठे नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वा-यामुळे ही घटना घडली असून दुपारच्या सुट्टीमुळे शाळेतील विद्यार्थी बालंबाल बचावले. शाळेला वाळवी लागली असून ती धोकादायक बनली असून दुरुस्तीची मागणी गेल्या सात वर्षांपासून पालक तसेच ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. मात्र, संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात आला आहे.समुद्रकिनारी वसलेल्या आदगाव येथे इयत्ता चौथी पर्यंत जिल्हा परिषदेची मराठी शाळा आहे. सत्तर पटसंख्या असणाºया शाळेत चार खोल्या आहेत. गुरुवारी सुटलेल्या वादळी वाºयाने शाळेच्या चार पैकी तीन खोल्यांचे पत्रे व कौलारू छप्पर उडाले. यामध्ये डिजिटल रूमची प्लॅस्टिक शेड फाटल्याने डिजिटल शैक्षणिक साहित्यांचे नुकसान झाले आहे. दुपारी दीडच्या सुमारास शाळेला जेवणाची सुट्टी असल्याने विद्यार्थी वर्गात नव्हते. त्यामुळे थोडक्यात बचावले. मात्र या घटनेत शाळेचे संपूर्ण पत्रे व भिंतीची नासधूस झाल्याने सर्व विद्यार्थ्यांना सध्या एका वर्गखोली बसवण्यात आले आहे. त्यामुळे लवकरात लवकर शाळेची दुरुस्ती करण्याची मागणी शिक्षक व पालकांकडून करण्यात येत आहे.वाळवी लागल्याने आदगाव शाळा धोकादायक बनली आहे. छपरामधील पूर्ण लाकूड वाळवीने बाधित आहे. त्यामुळे पावसाळ्यात कायम गळकी असते. त्यामुळे वर्गखोल्या तसेच डिजिटल शैक्षणिक साहित्याचे नुकसान होत आहे. त्यामुळे संपूर्ण शाळा केव्हाही कोसळण्याची भीती पालकांमधून व्यक्त होत आहे.आदगाव शाळेच्या छप्पर दुरुस्तीसाठी शिक्षणविभागाकडे शाळा कमिटी २०१३ पासून मागणी करीत आहे. मात्र जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने आजतागायत शाळेची डागडुजी केली नाही. परिणामी अशा दुर्घटनेला सामोरे जावे लागत असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. सध्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी शाळेच्या छताची त्वरित डागडुजी करावी अशी मागणी उपसरपंच देवेंद्र मोरे सोबत ग्रामस्थ करत आहे.सर्वशिक्षण अभियानाने कार्यकारी अभियंत्यांनी अंदाजे खर्चपत्रक (इस्टिमेट) तयार केले आहे. ते मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे लवकरात लवकर सादर करून दुरुस्तीचे काम करण्यात येईल.- वाय. एन. प्रभे,गटविकास अधिकारीशिक्षण विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही शाळा दुरुस्तीसाठी कोणतेही पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे अशा दुर्घटनेचा विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. जिल्हा परिषद शाळांच्या देखभाल-दुरुस्तीकडे कायम दुर्लक्ष होत आहे.- सुदेश मोरे, माजी व्यवस्थापकशाळा समिती अध्यक्ष, आदगाव.

टॅग्स :Schoolशाळा