शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

मराठ्यांचे वादळ पनवेलमध्ये धडकणार; लाखो लोकांच्या जेवणाची तयारी

By वैभव गायकर | Updated: January 24, 2024 16:05 IST

या पदयात्रेच्या स्वागतासाठी लाखोंच्या संखेने मराठा बांधव पनवेलमध्ये  एकवटणार आहे. 

वैभव गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेलः मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी ते आझाद मैदान पर्यंत 409 किमी पदयात्रा काढली आहे. गुरुवारी दि. 25 रोजी हि पदयात्रा सकाळी 10 च्या सुमारास पनवेल मध्ये धडकणार आहे.या पदयात्रेच्या स्वागतासाठी लाखोंच्या संखेने मराठा बांधव पनवेलमध्ये  एकवटणार आहे. 

मराठा समाजाला ओबीसी आरक्षण देण्याच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी आंदोलन पुकारले आहे.या लढ्यात जरांगे यांनी शासनाला अनेक अल्टिमेटम देखील दिले.मात्र शासन आरक्षण देण्यास टाळाटाळ करीत असल्याने जरांगे यांनी पदयात्रा काढत शासनाला जागे करण्याचा शेवटचा प्रयत्न सुरु केला आहे.आंतरवली सराटी ते मुंबईतील आझाद मैदान पर्यंत पदयात्रा काढली आहे. या पदयात्रेत लाखोंच्या संखेने मराठा समाज सामील झाला आहे.  बुधवारी लोणावळा येथे मुक्काम करून गुरुवारी सकाळी पदयात्रा पनवेलच्या दिशेने कूच करणार आहे.पदयात्रेत सामील आंदोलकांच्या जेवणाची व्यवस्था कळंबोली ते बेलापुर पर्यंतच्या मार्गावर स्टॉल मांडून करण्यात येणार आहे. या ठिकाणी सुमारे पाच लाखांपेक्षा जास्त लोक येण्याची शक्यता आहे.या सर्व लोकांच्या दुपारच्या जेवणाचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी पनवेल तालुक्यातील मराठा कार्यकर्त्यांवर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.मुस्लिम,शीख समाजाच्या वतीने यावेळी अन्न पदार्थांचे वाटप केले जाणार आहे.पदयात्रा रात्री मुक्कामी वाशी येथे थांबणार आहे. दुसऱ्या दिवशी चेंबूर मार्गे आझाद मैदानाकडे मार्गस्थ होणार आहे. 

सकल मराठा समाज मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे.पदयात्रेचे पनवेल तालुक्यात जंगी स्वागत आम्ही करणार आहोत.यावेळी लाखो  लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मुस्लिम,शीख समाजाने अन्नदानासाठी हात पुढे केला आहे.  -रामदास शेवाळे(समन्वयक सकल मराठा समाजक)

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षण