शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडून आलेल्याला २ कोटी मात्र आमदार नसतानाही मला २० कोटी मिळतात; सदा सरवणकरांचं वादग्रस्त विधान
2
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
3
हुंड्यासाठी सुनेला मारहाण, खोलीत कोंडून विषारी साप सोडला; सासरच्यांनी गाठला क्रूरतेचा कळस
4
स्वप्नातील एसयूव्ही खरेदीची संधी! महिंद्रा स्कॉर्पिओ झाली ₹२.१५ लाखांनी स्वस्त; जाणून घ्या नवीन किंमत
5
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
6
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
7
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
8
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
10
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
11
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
12
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
13
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
14
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
15
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
16
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
17
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
18
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
19
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
20
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम

महाडमध्ये काँग्रेसचे महामार्गावर रास्ता रोको

By admin | Updated: August 20, 2016 00:44 IST

प्रवाशांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या आणि मृत्यूचा सापळा बनलेल्या मुंबई - गोवा महामार्गाच्या दुरवस्थेची शासनाने त्वरित दखल घेतली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा

महाड : प्रवाशांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या आणि मृत्यूचा सापळा बनलेल्या मुंबई - गोवा महामार्गाच्या दुरवस्थेची शासनाने त्वरित दखल घेतली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आ. माणिक जगताप यांनी दिला. मुंबई - गोवा महामार्गाच्या दुरवस्थेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी काँग्रेस पक्षातर्फे माणिक जगताप यांच्या नेतृत्वाखाली महाडमध्ये रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. त्यावेळी आंदोलकांसमोर झालेल्या भाषणात जगताप बोलत होते. या आंदोलनात सुमारे तीन हजारांहून अधिक काँग्रेस कार्यकर्ते सामील झाले होते. आंदोलकांनी दीड तास महामार्ग रोखून धरल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. माणिक जगताप म्हणाले की, मुंबईतील बहुतांश आमदार हे कोकणातीलच आहेत. राज्याच्या सत्तेत कोकणाचे योगदान महत्वाचे असले तरी आजपर्यंत सत्ताधाऱ्यांनी कोकणाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले आहे, राज्यातील जवळजवळ सर्व महामार्गांचे चौपदरीकरण होते, मात्र शंभर वर्षांपूर्वीच्या या मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण मात्र पूर्ण होऊ शकत नाही. हे कोकणी माणसाचे दुर्दैव असल्याचे सांगून जगताप यांनी शासनाच्या बांधकाम विभागावर जोरदार टीका केली. कोकणातील मुंबईत राहणारे शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते यांनी देखील फोन करुन, आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगितल्याचे जगताप यांनी स्पष्ट के ले. शिवसैनिक म्हणून आम्हाला सांगायला लाज वाटते असेही ते शरमेने सांगतात. ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगून कोकणवासीयांची ही उपेक्षा कधी थांबणार, असा सवालही जगताप यांनी यावेळी केला. खा. हुसेन दलवाई यांनी आपल्या भाषणात रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर टीका केली. रायगडवासीयांच्या भावनांशी खेळणाऱ्या या पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी हकालपट्टी करावी, अशी मागणी दलवाई यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हवाई सफर करण्यापेक्षा पनवेल ते सावंतवाडी महामार्गाने प्रवास करण्याची हिंमत दाखवावी असे आव्हानही के ले. यावेळी श्याम म्हात्रे, विश्वनाथ पाटील, रमेश वैष्णव यांचीही भाषणे झाली. यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते खासदार हुसेन दलवाई, माजी आ. मुश्ताक अंतुले, माजी आ. मधुकर ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आर. सी. घरत, प्रदेश सरचिटणीस बाळकृष्ण पूर्णेकर, महिला जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा श्रध्दा ठाकूर, श्याम म्हात्रे, कुणबी समाजाचे कोकणचे नेते विश्वनाथ पाटील आदी नेते उपस्थित होते. (वार्ताहर)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले. गणेशोत्सवापूर्वी महामार्गाचे खड्डे भरावेत, महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम त्वरित सुरू करून ते दीड वर्षात पूर्ण करावे आदी प्रमुख मागण्यांचा या निवेदनात समावेश करण्यात आला आहे. आंदोलनाप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात होता. डीवायएसपी प्रांजली सोनावणे, माणगांव डीवायएसपी दत्ता नलावडे आदी पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.