शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

महाडमध्ये काँग्रेसचे महामार्गावर रास्ता रोको

By admin | Updated: August 20, 2016 00:44 IST

प्रवाशांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या आणि मृत्यूचा सापळा बनलेल्या मुंबई - गोवा महामार्गाच्या दुरवस्थेची शासनाने त्वरित दखल घेतली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा

महाड : प्रवाशांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या आणि मृत्यूचा सापळा बनलेल्या मुंबई - गोवा महामार्गाच्या दुरवस्थेची शासनाने त्वरित दखल घेतली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आ. माणिक जगताप यांनी दिला. मुंबई - गोवा महामार्गाच्या दुरवस्थेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी काँग्रेस पक्षातर्फे माणिक जगताप यांच्या नेतृत्वाखाली महाडमध्ये रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. त्यावेळी आंदोलकांसमोर झालेल्या भाषणात जगताप बोलत होते. या आंदोलनात सुमारे तीन हजारांहून अधिक काँग्रेस कार्यकर्ते सामील झाले होते. आंदोलकांनी दीड तास महामार्ग रोखून धरल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. माणिक जगताप म्हणाले की, मुंबईतील बहुतांश आमदार हे कोकणातीलच आहेत. राज्याच्या सत्तेत कोकणाचे योगदान महत्वाचे असले तरी आजपर्यंत सत्ताधाऱ्यांनी कोकणाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले आहे, राज्यातील जवळजवळ सर्व महामार्गांचे चौपदरीकरण होते, मात्र शंभर वर्षांपूर्वीच्या या मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण मात्र पूर्ण होऊ शकत नाही. हे कोकणी माणसाचे दुर्दैव असल्याचे सांगून जगताप यांनी शासनाच्या बांधकाम विभागावर जोरदार टीका केली. कोकणातील मुंबईत राहणारे शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते यांनी देखील फोन करुन, आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगितल्याचे जगताप यांनी स्पष्ट के ले. शिवसैनिक म्हणून आम्हाला सांगायला लाज वाटते असेही ते शरमेने सांगतात. ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगून कोकणवासीयांची ही उपेक्षा कधी थांबणार, असा सवालही जगताप यांनी यावेळी केला. खा. हुसेन दलवाई यांनी आपल्या भाषणात रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर टीका केली. रायगडवासीयांच्या भावनांशी खेळणाऱ्या या पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी हकालपट्टी करावी, अशी मागणी दलवाई यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हवाई सफर करण्यापेक्षा पनवेल ते सावंतवाडी महामार्गाने प्रवास करण्याची हिंमत दाखवावी असे आव्हानही के ले. यावेळी श्याम म्हात्रे, विश्वनाथ पाटील, रमेश वैष्णव यांचीही भाषणे झाली. यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते खासदार हुसेन दलवाई, माजी आ. मुश्ताक अंतुले, माजी आ. मधुकर ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आर. सी. घरत, प्रदेश सरचिटणीस बाळकृष्ण पूर्णेकर, महिला जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा श्रध्दा ठाकूर, श्याम म्हात्रे, कुणबी समाजाचे कोकणचे नेते विश्वनाथ पाटील आदी नेते उपस्थित होते. (वार्ताहर)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले. गणेशोत्सवापूर्वी महामार्गाचे खड्डे भरावेत, महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम त्वरित सुरू करून ते दीड वर्षात पूर्ण करावे आदी प्रमुख मागण्यांचा या निवेदनात समावेश करण्यात आला आहे. आंदोलनाप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात होता. डीवायएसपी प्रांजली सोनावणे, माणगांव डीवायएसपी दत्ता नलावडे आदी पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.