शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

महाडमध्ये काँग्रेसचे महामार्गावर रास्ता रोको

By admin | Updated: August 20, 2016 00:44 IST

प्रवाशांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या आणि मृत्यूचा सापळा बनलेल्या मुंबई - गोवा महामार्गाच्या दुरवस्थेची शासनाने त्वरित दखल घेतली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा

महाड : प्रवाशांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या आणि मृत्यूचा सापळा बनलेल्या मुंबई - गोवा महामार्गाच्या दुरवस्थेची शासनाने त्वरित दखल घेतली नाही तर हे आंदोलन अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस माजी आ. माणिक जगताप यांनी दिला. मुंबई - गोवा महामार्गाच्या दुरवस्थेकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवारी काँग्रेस पक्षातर्फे माणिक जगताप यांच्या नेतृत्वाखाली महाडमध्ये रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले. त्यावेळी आंदोलकांसमोर झालेल्या भाषणात जगताप बोलत होते. या आंदोलनात सुमारे तीन हजारांहून अधिक काँग्रेस कार्यकर्ते सामील झाले होते. आंदोलकांनी दीड तास महामार्ग रोखून धरल्याने महामार्गाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. माणिक जगताप म्हणाले की, मुंबईतील बहुतांश आमदार हे कोकणातीलच आहेत. राज्याच्या सत्तेत कोकणाचे योगदान महत्वाचे असले तरी आजपर्यंत सत्ताधाऱ्यांनी कोकणाच्या विकासाकडे दुर्लक्ष केले आहे, राज्यातील जवळजवळ सर्व महामार्गांचे चौपदरीकरण होते, मात्र शंभर वर्षांपूर्वीच्या या मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरण मात्र पूर्ण होऊ शकत नाही. हे कोकणी माणसाचे दुर्दैव असल्याचे सांगून जगताप यांनी शासनाच्या बांधकाम विभागावर जोरदार टीका केली. कोकणातील मुंबईत राहणारे शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्ते यांनी देखील फोन करुन, आंदोलनाला पाठिंबा असल्याचे सांगितल्याचे जगताप यांनी स्पष्ट के ले. शिवसैनिक म्हणून आम्हाला सांगायला लाज वाटते असेही ते शरमेने सांगतात. ही बाब अत्यंत दुर्दैवी असल्याचे सांगून कोकणवासीयांची ही उपेक्षा कधी थांबणार, असा सवालही जगताप यांनी यावेळी केला. खा. हुसेन दलवाई यांनी आपल्या भाषणात रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांच्यावर टीका केली. रायगडवासीयांच्या भावनांशी खेळणाऱ्या या पालकमंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी हकालपट्टी करावी, अशी मागणी दलवाई यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हवाई सफर करण्यापेक्षा पनवेल ते सावंतवाडी महामार्गाने प्रवास करण्याची हिंमत दाखवावी असे आव्हानही के ले. यावेळी श्याम म्हात्रे, विश्वनाथ पाटील, रमेश वैष्णव यांचीही भाषणे झाली. यावेळी काँग्रेसचे प्रवक्ते खासदार हुसेन दलवाई, माजी आ. मुश्ताक अंतुले, माजी आ. मधुकर ठाकूर, रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आर. सी. घरत, प्रदेश सरचिटणीस बाळकृष्ण पूर्णेकर, महिला जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा श्रध्दा ठाकूर, श्याम म्हात्रे, कुणबी समाजाचे कोकणचे नेते विश्वनाथ पाटील आदी नेते उपस्थित होते. (वार्ताहर)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी तहसीलदारांकडे निवेदन देण्यात आले. गणेशोत्सवापूर्वी महामार्गाचे खड्डे भरावेत, महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम त्वरित सुरू करून ते दीड वर्षात पूर्ण करावे आदी प्रमुख मागण्यांचा या निवेदनात समावेश करण्यात आला आहे. आंदोलनाप्रसंगी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात होता. डीवायएसपी प्रांजली सोनावणे, माणगांव डीवायएसपी दत्ता नलावडे आदी पोलीस अधिकारी यावेळी उपस्थित होते.