शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
3
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
4
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
5
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
6
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
7
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
8
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
9
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
10
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
11
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
12
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
13
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
14
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
15
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
16
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
17
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
18
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
19
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
20
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!

केंबुर्ली गावाजवळ गंधकाने घेतला पेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2019 11:01 PM

महिन्याभरापूर्वी ट्रक उलटला : पोलीस प्रशासनाची तारांबळ

दासगाव : मुंबई-गोवा महामार्गावर केंबुर्ली गावाजवळ रसायन घेऊन जाणारा ट्रक जून महिन्यात पलटी झाला होता. यातील गंधकाची पावडर रस्त्यालगत अपघातामुळे पसरली गेली. या घटनेला आता महिना झाला असला तरी अद्याप हे गंधक काढण्यात आले नव्हते. गंधक पावडरला रविवारी अचानक आग लागली. यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली. नदी आणि महामार्गाच्या मध्ये पडलेल्या या गंधक पावडरकडे पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केले.

केंबुर्ली गावाजवळ २२ जून रोजी रात्री १० च्या सुमारास एक ट्रक पलटी झाला होता, यामध्ये दोन जण जखमी झाले होते तर ट्रकमधील गंधकही पसरले होते. आता या घटनेला एक महिना होत आला तरीदेखील संबंधित ट्रकमालक, कंपनी आणि प्रशासनाने याची दखल घेतली नाही. या ठिकाणी पडलेला ट्रक केवळ उचलून नेण्यात आला. मात्र, पिवळ्या रंगाचे गंधक तिथेच पडून राहिले. इंडस्ट्री वापरासाठी असलेल्या या गंधकाबाबत दुर्लक्ष केल्याने रविवारी या गंधकाने अचानक पेट घेतला. या घटनेची माहिती स्थानिक ग्रामस्थांकडून पोलिसांना समजताच पोलिसांची तारांबळ उडाली. नदी आणि महामार्ग यादरम्यान पडलेल्या गंधकाने नदीलादेखील धोका निर्माण होऊ शकत होता. या गंधकाबाबत दुर्लक्ष केल्याने हा प्रकार झाला असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

रविवारी सकाळी पडलेले गंधक धुमसू लागले आणि कालांतराने या गंधकाने पेट घेतला. त्यानंतर पोलिसांकडून महाड एम.आय.डी.सी.च्या अग्निशमन पथकाचे बंब मागवण्यात आले. मात्र, पाण्याशी संपर्क आल्याने या गंधकाने अधिकच पेट घेतला. यामुळे पोलीस प्रशासन चांगलेच हादरले. अखेर महामार्ग बांधकाम विभागाच्या ठेकेदार कंपनीकडून माती मागवण्यात आली आणि ही माती वरून टाकण्यात आली, यामुळे गंधकाला लागलेली आग आटोक्यात आली. घटनास्थळी नायब तहसीलदार अरविंद घेमुड हेदेखील दाखल झाले.

पोलीस प्रशासनाची डोळेझाकजून महिन्यातील २२ तारखेला हा अपघात झाला होता. या अपघातात ट्रक पलटी झाला, तर दोन जण जखमी झाले होते. या ठिकाणाहून ट्रक काढण्यात आला. मात्र, ज्या कंपनीचा माल होता त्याने मात्र हा माल येथून काढून नेला नाही. पोलीस प्रशासनानेही या कंपनीला बजावले नाही. यामुळे गंधकासारखे रसायन गावाशेजारी पडून राहिले. या गंधकाचा धोका जनावरे आणि लहान मुलांना असतानाही याबाबत बेजबाबदारी पोलीस प्रशासनाने दाखवली. या गंधकाबाबत आजही अनभिज्ञता आहे.