शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

शिवाजी महाराजांचे राज्य विश्ववंदनीय --: संभाजीराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 01:26 IST

शिवाजी महाराजांचे राज्य विश्ववंदनीय होते. त्यांची नीतिमत्ता, राज्यकारभाराच्या नीतीचा राज्य सरकारने अंमल करण्याची गरज आहे. मराठा आरक्षण दिले पाहिजे, असे मत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने ३४५वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा गुरुवारी रायगड येथे शिवरायांच्या जयघोषात आणि हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी खासदार संभाजीराजे यांनी

डॉ. प्रकाश मुंज ।रायगड : शिवाजी महाराजांचे राज्य विश्ववंदनीय होते. त्यांची नीतिमत्ता, राज्यकारभाराच्या नीतीचा राज्य सरकारने अंमल करण्याची गरज आहे. मराठा आरक्षण दिले पाहिजे, असे मत खासदार संभाजीराजे यांनी व्यक्त केले.अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीच्यावतीने ३४५वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा गुरुवारी रायगड येथे शिवरायांच्या जयघोषात आणि हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी खासदार संभाजीराजे यांनी राजसदरेवरून शिवप्रेमींना संबोधित केले. ते म्हणाले, रायगडावर  पाण्याचे योग्य नियोजन करून १०० टक्के पाणी व्यवस्था केली जाईल. शिल्लक पाणी रायगड परिसरातील २१ गावांना देण्यात येईल. आतापर्यंत गडकिल्ल्यांसाठी कामकरत आहे. याचबरोबर इथून पुढे शेतकऱ्यांसाठी, बहुजनांसाठी काम करेन. गड-किल्ल्यांचे बनविलेले बिझनेस मॉडेल केंद्र शासनाला सादर केले जाईल, असे संभाजीराजे म्हणाले.

यावेळी चीनचे राजदूत लीयू बिंग, पोलंडचे कौन्सिल जनरल डॅमियन इरझॅक, सचिव इव्हा स्टॅनकिव्हिसिक, ट्युनिसियाचे राजदूत नेज्मेद्दिन लखाल, बल्गेरियाच्या राजदूत इलिनोरा डिमिट्रोव्हा, पालकमंत्री रवींद्र चव्हाण,आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी, तहसीलदार चंद्रसेन पवार,माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुखआदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठीइतिहास संशोधक, अभ्यासक, शिवभक्त, इतिहासप्रेमी हजारोंच्या संख्येने  उपस्थित होते. 

यावेळी रयतेचे प्रातिनिधिक स्वरूपात उस्मानाबादमधील मेडशिंगा येथील आत्महत्या केलेल्या आवचार या शेतकºयाच्या कुटुंबाला उपस्थित राहण्याची संधी दिली.चीनचे राजदूत लियू बिंग म्हणाले, चीन व भारताच्या संस्कृती जुन्या असून, छत्रपती शिवराय हे नॅशनल हिरो आहेत. भारत व चीनमध्ये राष्ट्रपुरुषांविषयी आदराची सामायिक भावना आहे. राष्ट्रपुरुषांकडून खूप काही शिकतो. त्यांचे स्मरण करतो.बल्गेरियाच्या राजदूत इलिनोरा डिमिट्रोव्हा यांनी शिवराय हे देशाचे स्फूर्तिस्थान आहेत, असे सांगितले. त्या म्हणाल्या, ‘हिंदवी स्वराज्याची स्थापना त्यांनी केली. मराठा इतिहास त्यांच्या कर्तृत्वाने समृद्ध झाला आहे.’

पोलंडचे कौन्सिल जनरल डॅमियन इरझॅक म्हणाले, ‘पोलंडवासीयांच्या वळीवडे येथील आठवणी आजही त्यांच्या स्मरणात ताज्या आहेत. शिवरायांचा इतिहास स्फूर्तिदायी असून, आदरातिथ्य करण्याची भारतवासीयांची खासीयत आहे.’मेडसिंगा (जि. उस्मानाबाद) येथील गणपती नामदेव आवचार, चिवाबाई आवचार, रेश्मा आवचार या शेतकरी कुटुंबाला संभाजीराजे यांच्या हस्ते एक लाख रुपयांची मदत देण्यात आली.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या शेडमधून  शिवछत्रपतींची पालखी ढोल-ताशाच्या गजरात  शिरकाई देवीच्या मंदिराकडे मार्गस्थ झाली. हलगी, घुमकं, कैताळाच्या कडकडाटात पालखी राजसदरेवर रवाना झाली. पाठोपाठ खासदार संभाजीराजे आणि शहाजीराजे छत्रपती राजसदरेवर आले. पोलीस बँडने त्यांचे स्वागत केले. शाहीर राजेंद्र कांबळे यांनी ‘रयतेचाहा राजा झाला संभाजीराजा' हे स्वागतगीत गायिले. पोलंडच्या तिसºया सचिव इव्हा स्टॅनकिव्हिसिक, प्रांत विठ्ठल इनामदार, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, कार्याध्यक्ष हेमंत साळोखे उपस्थितहोते. समितीचे अध्यक्ष फत्तेसिंह सावंत यांनीप्रास्ताविक केले.गडकोटांसाठी स्वतंत्र  खात्याची गरजगडकोटांसाठी स्वतंत्र खाते निर्माण व्हावे,अशी अपेक्षा व्यक्त करत गडकोटांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होण्याकरिता जपानशी पत्रव्यवहार सुरू असल्याचेखासदार संभाजीराजे यांनी यावेळी येथे सांगितले.संभाजीराजे म्हणाले, ‘गडाचा विकास करत असताना अनेकजण त्यातून मला काय फायदा होणार नाही,’ असे सांगतात. ते भुरटे आहेत. महिन्यातील दहा दिवस मी रायगडावर असतो. इथला एकेक दगड म्हणजे इतिहास आहे. मात्र, या लोकांची टिमटिम बंद झाली पाहिजे.’

रायगडचा विकास करताना अडचणी येत आहेत तरीही त्याच्यावर मात करीत कामे सुरू आहेत, असे सांगत असताना संभाजीराजे भावनिक झाले. भाषण मध्येच थांबवून ते मेघडंबरीतील शिवछत्रपतींच्या पुतळ्याजवळ जाऊन नतमस्तक झाले.‘सोहळा पालखीचा स्वराज्याच्या ऐक्याचा’ संकल्पनेखाली काढलेल्या पालखी मिरवणुकीत अठरापगड जाती-धर्मातीललोक सहभागी झाले होते.यावेळी संभाजीराजे व शहाजीराजे यांनी मूर्तीचे पूजन केले. यावेळी शाहीर आझाद नायकवडी यांनी शिवराज्याभिषेक गीत सादर झाले. ‘जय भवानी, जय शिवराय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘जय जिजाऊ’, ‘जय शिवराय’ या घोषणा देण्यात आल्या. यंदा राजसदरेवर शेतकरी कुटुंबाला बसण्याचा मान मिळाला.इचलकरंजीचे १२०० शिवप्रेमीइचलकरंजीतून ५० गाड्यांमधून १२०० वर शिवप्रेमी रायगडावर उपस्थित होते. त्याचे नियोजन माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केले होते. यावेळी तेही उपस्थित होते.राज्याभिषेक, पालखी सोहळा....गुरुवारी सकाळी सात वाजता ध्वजपूजन व ध्वजारोहण झाले. त्यानंतर शाहीर रंगराव पाटील, आझाद नायकवडी यांनी शाहिरी सादर केली. साडेनऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पालखीचे आगमन झाले. त्यानंतर खासदार संभाजीराजे व शहाजीराजे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस राज्याभिषेक करण्यात आला.त्यानंतर मेघडंबरीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस सुवर्णनाण्यांचा अभिषेक घालण्यात आला. ‘सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा’ हा शिवराज्याभिषेक मुख्य पालखी सोहळा शिवमय वातावरणात पार पडला. जगदीश्वराचे दर्शन घेऊन पालखी सोहळ्याचा समारोप झाला. यावेळी खासदार संभाजीराजे यांच्या हस्ते समाधिस्थळी पुष्पहार अर्पण करण्यात आले.दरम्यान, दरबारातून पालखी होळीचा माळ, बाजारपेठ, जगदीश्वर मंदिराकडे जाताना पालखीवर ठिकठिकाणी पुष्पवृष्टी झाली. पारंपरिक वेशभूषेत महिला, शिवभक्त, मुली सोहळ्यात सहभागी झाल्या होत्या. लेझीमच्या प्रात्यक्षिकात पालखी जगदीश्वर मंदिराकडे रवाना झाली. शिवछत्रपतींच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर पालखी मिरवणुकीची सांगता झाली.रायगड येथे गुरुवारी ३४५वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा शिवरायांच्या जयघोषात पार पडला. रायगडावर दाखल झालेल्या शिवभक्तांमुळे परिसर असा फुलून गेला होता. यावेळी गडावर विविध युद्धकलांचे सादरीकरण करण्यात आले. 

टॅग्स :RaigadरायगडShivrajyabhishekशिवराज्याभिषेक