शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

चूलमुक्त, धूरमुक्त कुटुंबासाठी सरसावले राज्य सरकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 11:58 PM

शिधापत्रिका, गॅसजोडणी विशेष मोहीम 

राबगाव /पाली : सर्वसामान्य, गरीब गरजू लाभार्थींना शिधावाटप दुकानात नियमानुसार धान्य मिळावे, यासाठी महसूल विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. त्याच वेळी गॅसजोडणीमधील त्रुटी दूर करून जोडणी सहज उपलब्ध व्हावी, यासाठी मोहीम सुरू करण्यात आली आहे. मोहिमेची सुरुवात सुधागड तहसील कार्यालयात करण्यात आली. त्या वेळी संबंधित यंत्रणांना तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी मोहीम यशस्वी होण्यासाठी सूचना दिल्या.

राज्य सरकारच्या महसूल विभागाने चूलमुक्त महाराष्ट्र आणि धूरमुक्त कुटुंब निर्माण करून निरोगी महाराष्ट्र घडविण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. त्यात राज्यातील रहिवासी असलेल्या पात्र लाभार्थ्यांना शिधापत्रिका देणे, ज्यांना धान्य मिळत नाही, अशा पात्र कुटुंबांना प्राधान्य गटाचा लाभ मिळवून देणे, नवीन गॅस कनेक्शन देणे, ही कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. पुढील महिनाभर ही मोहीम राबवली जाणार असून त्याची सुरुवात सुधागड तहसील कार्यालयात तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी केली. १५ आॅगस्टपर्यंतच्या कालावधीत तहसील कार्यालय आणि पुरवठा विभागाच्या वतीने ही मोहीम राबवली जाणार आहे. या मोहिमेअंतर्गत गावोगावी शिबिरे भरवून १०० टक्के पात्र लाभार्थ्यांचा शोध घेतला जाणार आहे. त्यांना वेळेवर शिधावाटप दुकानात धान्य मिळण्यासाठी अन्न सुरक्षा कायदा २०१३ नुसार रेशन कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहेत. सुधागड तालुक्यातील ३४ ग्रामपंचायतींमध्ये ज्यांना अद्याप गॅसजोडणी मिळाली नाही, अशा पात्र कुटुंबांना ती जोडणी दिली जाणार आहे. चूलमुक्त महाराष्ट्र आणि धूरमुक्त कुटुंब अशा स्वरूपाची मोहिमेसाठी रेशन दुकानदार, सामाजिक संस्थांची मदत घेतली जाणार आहे.

प्रत्येक गावात पुरवठा विभागाच्या वतीने २१ जुलै ते २८ जुलै दरम्यान रेशन कार्डसाठी लागणारी कागदपत्रे जमा केली जाणार आहेत. अभियानाची यशस्वी अंमलबजावणीसाठी आणि अभियानाची सुरुवात तहसील कार्यालयात करण्यात आली. तहसीलदार रायन्नावर यांनी, चूल बंद झाली तर वृक्षतोड होणार नाही. परिणामी, नैसर्गिक समतोल राखण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे आधी चूलमुक्त अभियान यशस्वी करण्याचा शासनाचा निर्धार आहे.